Thursday, February 22, 2007

वय वाढताना

वयाची एक गंमतच असते. ते कधी वाढतं ते कळतच नाही. म्हणजे " अरे, किती मोठी झाली, एवढीशी होती ! " हे वाक्य मी आता आता ऐकल्यासारखं वाटत होतं पण लक्षात आलं की त्यालाही ४५ , ५० वर्षं झाली. मग अजूनही उडत्या चालीची गाणी ऐकताना पाय ठेका का धरतात ? एखाद्या " मासाहारी " विनोदाला खळखळून दाद का द्यावीशी वा्टते ? चार समवयस्क मैत्रिणी भेटल्यावर एखादीची " खेचण्यात" कोलेजच्या दिवसाइतकीच मजा येते. अजूनही मानसिक वय ३५ च्या पुढे गेलय असं वाटतच नाही. हे कसं काय ?
पण आपण अस म्हटलं तरी जग हे लक्षात ठेवतच. अगदी दारात येणारा भाजीवालासुध्दा "आजी, " म्हणायला लागतो आणि कोणाला त्यात काहीही गैर वाटत नाही हे विशेष. पहिल्या पहिल्याने मी दुसया कोणाला तरी असेल म्हणून दुर्लक्ष केलं , पण शेजारच्या षोडशीने हाताला धरून , "आजी, भाजीवाला तुम्हाला बोलावतोय." म्हणून आजीपणावर शिक्का मोर्तबच करून टाकलं. नंतर अर्धा तास माझ्या कानातून गरम वाफ़ा येत होत्या, पण आता मात्र सरावले. आजी म्हटलं की ती मीच हे पटकन लक्षात यायला लागलं. तरी मन अजून माने ना ही अंदरकी बात है !
आमच्या नातीही गमतीदार. गावाला निघताना सगळ्या मोठ्यांना नमस्कार करत माझ्यापर्यंत येतील आणि मिठी मारतील , म्हणतील, तुला कशाला नमस्कार? तुला तर आमच्यापेक्षा जास्त नवे सिनेमे माहीत आहेत आणि नट सुध्दा. तू तर आमच्या एवढीच आहेस.
पण आता त्याना सांगणार आहे, अग, आजी आता खरच म्हातारी झाली. परवा दिवे आगरच्या समुद्र किनायावर समुद्र लाटे लाटेने फ़ुटत होता. पोरासोरांच्या आरडा ओरड्याने किनारा दणाणला होता, समुद्राची गाज ऐकू आली की उचंबळून स्वत:ला लाटेवर झोकून देणारी मी, शांतपणे किनायावरून चालत होते, पाण्यात पावलंही न भिजवता, एक टक आकाशातले रंग न्याहळत,एखाद्या मित्राला खूप वर्षानंतर भेटावं आणि मधल्या विरहाने आतला रस आटून जावा तसं समुद्राला फ़क्त भेटून परत फ़िरले, मी कोरडी.
म्हणून म्हटलं वयाचं काही कळतच नाहे, कधी वाढलं ते समजतच नाही !

Wednesday, February 21, 2007

सागर

सागर सतत बोलवत असतो
कोवळ्या उन्हाच्या चमचमत्या लाटात
सिंदबादच्या गल्बताला
रत्नजडीत संदुकेला
एकडोळ्या चाच्याला
दूर क्षितिजावर झुलवत राहतो
सागर सतत बोलवत राहतो !
उधाणलेल्या लाटांनी,
उसळणाया तुषारांनी,
मत्त धुंद गाजेनी,
चिंब आवेगाने खुणावत राहतो
सागर सतत बोलवत राहतो !
अस्ताच्या रक्तवर्ण मित्रासह,
काजळणाया धूम्रवर्ण नभासह,
किनायाशी फ़ुटणाया फ़ेनपुष्पासह
थोपटत शांतवत राहतो
सागर सतत बोलवत राहतो !

Sunday, February 4, 2007

अंधार सर्वसाक्षी

अंधार गर्भवासी,
अंधार बीजरक्षी!
अंधारल्या उबदार कोषी,
पहुडल्या रक्तपेशी
स्पर्शण्या उन्मुक्त प्राची,वाट पाहती उद्याची!
अंधार सर्वसाक्षी
अंधार सर्वभक्षी !
अंधारल्या कालकोठी,
विसावल्या विदीर्ण पेशी
आसावल्या भयभीत नेत्री, वाट पाहती उद्याची!

कातरवेळी

Radhika
दिव्याच्या उजे्डाचा एक एक ठिपका, अंधार अधिकच गडद करत जातो,
पावलांच्या गलबल्याचं मैदान रिक्त, रिक्तसं होत जातं,
दारात उभी राहते मायमाउली, बाहू पसरून पिलासाठी!
' एक घास काऊचा, एक चिऊचा
साथीला विळखा उबदार मायेचा."
उसळे तरंग काळजात परतल्या बाळपावलांसाठी !
दिव्याच्या उजेडाचा एक एक ठिपका, अंधार अधिकच गडद करत जातो,
पावलांच्या गलबल्याचं मैदान रिक्त रिक्तसं होत जातं,
दारात उभी राहते मायमाउली , बाहू पसरून पिलासाठी !
"रंग विलोल नेत्रांनी, धुंद मत्त गात्रांनी,"
दडपे कल्लोळ काळजात परत फ़िरल्या बाळपावलासाठी !

delete

सोबती

अंधारही कधी कधी सखा बनतो, बंद पापणी आडचे अश्रू टिपून घेतो.
सुसाटणाया वायात,
भिरभिरणाया पाचोळ्यात,
गरगरणाया चक्रात
अंधारच सोबतीला येतो.
अशा वेळी दारं खिडक्या बंद कराव्यात, हवं तर गदद पडदेही सो्डावेत
गरगरणारं चक्र,
भिरभिरणारा पाचोळा
सुसाटणारा वारा
सगळं बाहेर ठेवावं
आत फ़क्त निस्तब्ध अंधार आणि साथीला विरह गंधार!
मग उधळून द्यावं स्वत:ला अश्रूवाटे नि:शंकपणे
खात्री असते

सोबतीचा अंधार टिपून घेइल अश्रू अलगद ह्ळूवारपणे
कारण... तेव्हाही तोच होता ना साथीला
सुसाटणाया वायात
भिरभिरणाया पाचोळ्यात
गरगरणाया चक्राच्या तप्त रंगोत्सवात !

Wednesday, January 24, 2007

काही सूर काही नाद

आवाजाचं, गंधाचं आपल्या स्म्रुतीशी नातं असतं. रोजच्या धावपळीत ते लक्षातही येत नाही, पण असा अचानक एखादा क्षण येतो, त्या आवाजाने मनाची तार झंकारते, आणि वढाय मन कुठल्या कुठे जाऊन पोचतं. त्या दिवशी पडद्याला लावलेल्या घुंगरांच्या आवाजाने माझी गत अशीच झाली.त्याचं काय झालं, लेकीकडे गेले होते, सकाळच्या गार वायाने झोप चाळवली. पडदाही थोडा हलला असावा.कारण एक वेगळीच किणकिण कानावर आली. झोपाळलेल्या डोळ्यांनीच समोर बघितलं. पूर्व उजळली होती कानात मघाची किण किण होती, पण कसली ते कळत नव्हतं. परत तोच आवाज आला. हे म्हणजे खूप वर्षांनी शाळेतल्या मैत्रिणीचा फ़ोन यावा आणि तिचा चेहरा धूसरपणे तरळत रहावा तसं झालं. डोळ्यावरची झोप उडवून नीट पाहिलं, सकाळच्या मंद वायाने पडदा हलत होता आणि पडद्याला लावलेले घुंगरू वाजत होते. नेहमीचे छोटे घुंगरू नव्हेत, बैलांच्या गळ्यात असतात तसे भले थोरले पितळेचे घुंगरू. त्या आवाजाने आणि सकाळच्या झुळकीने माझं मन परकया पोरीगत धावत माहेरी, कोल्हापूरला पोचले.कोल्हापूर हे शहर, गूळ, कुस्त्या, फ़ताड्या शिंगांच्या म्हशी, यासाठी जसं प्रसिध्द आहे तसं माझ्या लहानपणी , म्हणजे ४५-५० वर्षांपूर्वी दारात म्हशी पिळून घेण्याबद्दलही प्रसिध्द होतं. म्हणजे काय तर जवळपासची २-४ घर मिळून एक गवळी ठरवायचे. त्याने एका कोणाच्यातरी दारात म्हैस घेऊन यायचं आणि तिथेच म्हस पिळून दूध काढून द्यायचं. सगळाच संस्थानी खाक्या. तसा आमचा दूधवाला होता मधू आणि त्याची आई ' लक्क्षुंबाई'. दोघांपैकी कोणीतरी एकजण तांबडं फ़ुटता फ़ुटता दारात हजर. 'दोअईध' अशी त्याची आरोळी आली की समोरच्या मालुताई, शेजारच्या अक्का, वरच्या मजल्यावरच्या जाधवमामी आपापली भांडी घेऊन लगबगीनं यायच्या. मधूने म्हस पान्हवायला घेतली की अक्का हमखास म्हणणारच, " मधू, चरवी नीट पालथी करायचं बघ हं का ! नाहीतर तिरकी धरून वाटीभर पाणी घालचील बग." यावर मधूही मिशीला पीळ देत म्हणनार, " काय अक्का, इतकी वर्सं दूध घालायलोय तरी अजून विश्वास इना होय तुमास्नी ? काय एवड्या तेवड्यानं माडी बांदनार हाय काय ?" त्यावर जाधवमामीही त्याला चिडवायच्या, " कुनाला दक्कल माडी बांदतोस का बंगला ते! आमाला वास्तुकाला बोलीव म्हंजी जालं. ' चरवीत धारेचं पहिलं चुळुक वाजलं म्हणेपर्यंत चरवी दुधानं भरून जायची अणि धारोष्ण दूध प्रत्येकीच्या पातेल्यात मापाप्रमाणे ओतलं जायचं.तसं तुम्ही कधी डोंगरमाथ्यावर गेलाय ? गाडी वळणावळणाने वरवर चढता चढता आसमंताशी आपण कणाकणाने एकरूप व्हायला लागतो. गाडी बंद करून आपण जर विसावतो, सभोवार असते नि:शब्द शांतता! अस्पष्टशी कुठेतरी दुसरी गाडी वर चढते असं वाटत असतं, पण बाकी वेढून असते ती फ़क्त निरव शांती. अशा वेळी दूर झा्डीत कोणी एक पक्षी शीळ घालत असतो. शांतता चिरत तो स्वरांचा बाण आपल्या उरात घुसतो, अगदी " काबुलीवाल्याच्या ' ऐ मेरे प्यारे वतन' च्या अरेबिक सुरावटीसारखा.कधी घेतला आहे असा अनुभव ?आणखी एका आवाजाचा अनुभव मात्र मी कल्पनेतच घेतला आहे. नाताळातल्या नाताळबाबाच्या हो हो हो अशा आरोळीचा. आधीच जगाच्या एका थंड टोकाकडून नाताळबाबा रेनडियरच्या गाडीतून आपल्या घरी येणार ही कल्पनाच किती रोमांचक ! त्यात आणखी गंमत म्हणजे तो आपल्यासाठी गिफ़्ट आणणार !मला तर हा लाल डगल्याचा लाल टोपीवाला नाताळबाबा माझ्या आजोबांसारखाच वाटतो. कोकणातून ५ - ६ तासांचा प्रवास करून हे १०० वर्षांचे आजोबा जेव्हा टांग्यातून आमच्या दारात उतरत, तेव्हा त्यांचे मुळचे धुवट पांढरे कपडेही कोकणचा लाल मातीने लालेलाल झालेले असत. कारण ५०, ६० वर्षांपूर्वी कोकणात कुठली आली आहे डांबरी सडक ? पण त्यांना बघून त्यांचं सामान घ्यायला आम्ही पुढे धावलो की त्यांच्या चेहयावरही तसंच प्रेमळ हसू असे. आणि मग हात पाय धुतल्यावर ट्रंकेतू्न फ़णसपोळी, खाजं, साटं असं काही आमच्या हातावर ठेवताना त्यांचे डोळे चाळशीमागून मिष्कीलपणे लुकलुक त.किती नाद, किती स्वर आपण मनात साठवून ठेवलेले असतात ते आपल्यालाच माहीत नसतं. कधीतरी तार झंकारते आणि आनंदाची वलयं उठतात, आपल्याला वास्तवापासून दूर नेतात .... परत वास्तवात आनंदाने परतण्यासाठी !
draft

Sunday, January 21, 2007

शून्यातून शून्याकडे

महाराष्ट्राच्या नकाशात नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरपासून आठ कि. मी. अंतरावरील हरेगाव हा छोटासा ठिपका. दुष्काळी भागातील कमी पावसावर जगणारी शेतीभाती करून इथला शेतकरी जीव जगवत असतो. अशा या भागात विसाव्या शतकाच्या दुसया दशकाच्या आसपास महाराष्ट्रातला पहिला साखरकारखाना उभा राहिला. भंडारदरा धरणाच्या पाण्याचा वापर करून इथे ऊस पिकवण्याची जिद्द काही तरुणांनी मनाशी बाळगली आणि स्थानिक शेतकर्यांना हाताशी धरून त्यांना ऊस लागवडीचे शिक्षण देण्यास सुरवात केली.जावाहून 'पुष्ट उष्ट जावा ' बियाणे आणून ऊस लागवडीला प्रारंभ झाला आणि पाहता पाहता हरेगाव येथे 'बेलापूर कंपनी लिमिटेड ' उभी राहिली. लोकमान्य टिळकांचे भाचे कै. महाजन हे या साखरकारखान्याचे पहिले इस्टेट मनेजर होते. पुण्यातील शेतकी महाविद्यालयातील पदवीधारकांच्या पहिल्या तुकडीत त्यांचा समावेश होता. त्यांनी आपले द्यान स्वजनहितार्थ वापरले.छोट्या छोट्या चाळवजा घरात राहून इथला अधिकारी वर्ग शेतकर्याण्ना शेतीचे अद्यावत द्यान देऊ लागला. कारखान्यातील तांत्रिकी माहिती सांगू लागला. कारखान्याने चांगलेच मूळ धरले. जो शेतकरी शेतीवर कशीबशी गुजराण करत होता, त्याला कारखान्यामुळे कामधेनूच दारात आल्यागत झाले.कारखान्यात काम करून कामगार चार पैसे कमवू लागला.१९५४ साली जगप्रसिध्द वास्तुशास्त्रद्य जे. जे. बोधे यांच्या आराखड्यानुसार सुप्रसिध्द शापुरजी पालनजी आणि कंपनीने कारखान्याची दिमाखदार वसाहत उभी केली. एक नंबर बंगला कारखान्याच्या ब्रिटिश मनेजरसाठी असे,. अनेक खोल्या असलेली ही इमारत सभोवार देशी विदेशी फ़ळाफ़ुलांनी बहरलेल्या बगिच्यात एखाद्या गढीप्रमाणे शोभत असे. डायरक्टरचा बंगला, मनेजरचा बंगला व इतर वरिष्ठ अधिकार्यांचे बंगले म्हणजे वास्तुशास्त्राचे उत्क्रूष्ट नमुने होते.ए., बी, सी, डी अशा टाइपमध्ये विभागलेल्या या सुबक , रेखीव वसाहतीवर उंच उंच व्रुक्षांनी सावली धरली होती. मध्यभागी जिमखाना होता. त्यामध्ये होणाया टेबल टेनिस, बडमिंटन यांच्या स्पर्धांमध्ये राष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू भाग घेत असत.
draft