Monday, January 8, 2007

तप

आज मी रेणू गावस्करांना भेटले. तुळशीबागेजवळच्या पंतांचा गोट म्हणून ओळखल्या जाणाया भागातल्या एका इमारतीत त्या वेश्याच्या मुलांसाठी शाळा चालवतात. एका भागात बालवाडी, दुसया भागात कार्यालय अशी माण्डणी होती. अतिशय साधे कपडे घातलेल्या बायका आपल्या मुलांना नेण्यासाठी आलेल्या होत्या. कुठलाही भपका नसलेलं ते कार्यालय , आजूबाजूचा परिसर पाहून, काहीतरी उदात्त करण्यासाठी आसुसलेलं माझं मन एकदम खचलं. धीर एकवटून मी त्यांना माझ्या येण्याच कारण साम्गितलं. त्या मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी शिक्षकाची गरज होती, आणि ते काम करण्याची माझी इच्छा होती. रेणूताईनी या विचाराचं स्वागतच केलं, पण त्यांनी माझा उतरलेला चेहरा, भरून आलेले डोळे बघितले आणि मडक्याच कच्चेपण ओळखलं त्याना दुसर्या भागातही शिक्षकाची गरज होतीच, तेव्हा तिथे मी काम करावं असं त्यानी सुचवलं
बोलण्याच्या ओघात त्या आपले २५ वर्षांचे अनुभव सांगत होत्या. प्रथम तर त्या वेश्या वस्तीतच एखाद्या गोणपाटावर बसून शिकवायच्या.मुलाना सांगायच्या, एवढ्या भागात थुंकू नका म्हणजे मला इथे बसून शिकवता येइल. एखादी बाई आजारी आहे म्हणून तिला औषधपाणी करत रहावं तर काही दिवसातच तिच्या मरणाची बातमी कळायची. किती गोष्टी ऐकताना माझं पांढरपेशी मन फ़ाटत होतं,पण त्या शांतपणे सांगत होत्या. मी हा माझा मूर्खपणा आहे हे जाणवत असतानाही त्याना म्हटलं, केवल सहनुभूती दाखवणं हा यावरचा मार्ग नाही हे मला कळतं पण... त्यावर त्या हसून म्हणाल्या, तोच तुमच्या माझ्यात फ़रक आहे, कुठेही केव्हाही जाण्यात मला संकोच वाटला नाही, कुठलीच गोष्ट करायला मी मागेपुढे पाहिलं नाही. आज माझ्या अनुभवाला आलं की गेल्या २५ वर्षात माझ्या उघड्या पर्स मधून एकदाच२५ रुपये गेले तर ते वस्तीने दुसया दिवशी चोर पकडून परत केले. इथे मला " साखर " आहे म्हणून बिन साखरेचा चहा आवर्जून दिला जातो आणि " आप टीचर हो, तो आपको यहा कुछ नही होगा " हा दिलासाही मिळतो. हा सगळा संवाद मी कदाचित पुस्तकात वाचला असता तर एक सुस्कारा सोडून मी पान उलटल असतं, कदाचित याला एक दर्प आहे असंही वाटल असतं पण आज पोटात ढवळलं, त्या शांत हसया चेहयामागची तपष्चर्या जाणवली आणि आपलं खुजेपणही !

3 comments:

Asawari said...

It takes more than good intentions to do a good deed - as you realised after this visit. Because people like us who have been living protected lives do not know what it is to face the brutal realities of life. And when fate chances us to face them, we flounder. When I had tried to teach maths to the small orphan girls in Bal Kalyan Sankul during my school going age, I couldnt go there more than a few days after which I had to quit. Why??? Because I could not bear with seeing these kids (some even my age) living so very alone, facing their own problems, growing up the day they were born.......My heart broke and there was - rather stiil is - an ache in me which made me guilty of having MY home, MY family, MY so many things.......

Priyabhashini said...

I read this blog today. Very nicely put, although I must say it is bit short. I think you can elaborate further on experiences, efforts, feelings and so on.

त्या हसून म्हणाल्या, तोच तुमच्या माझ्यात फ़रक आहे, कुठेही केव्हाही जाण्यात मला संकोच वाटला नाही, कुठलीच गोष्ट करायला मी मागेपुढे पाहिलं नाही. ... This is the punch line.

Unknown said...

chhaan