Sunday, January 21, 2007

शून्यातून शून्याकडे

महाराष्ट्राच्या नकाशात नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरपासून आठ कि. मी. अंतरावरील हरेगाव हा छोटासा ठिपका. दुष्काळी भागातील कमी पावसावर जगणारी शेतीभाती करून इथला शेतकरी जीव जगवत असतो. अशा या भागात विसाव्या शतकाच्या दुसया दशकाच्या आसपास महाराष्ट्रातला पहिला साखरकारखाना उभा राहिला. भंडारदरा धरणाच्या पाण्याचा वापर करून इथे ऊस पिकवण्याची जिद्द काही तरुणांनी मनाशी बाळगली आणि स्थानिक शेतकर्यांना हाताशी धरून त्यांना ऊस लागवडीचे शिक्षण देण्यास सुरवात केली.जावाहून 'पुष्ट उष्ट जावा ' बियाणे आणून ऊस लागवडीला प्रारंभ झाला आणि पाहता पाहता हरेगाव येथे 'बेलापूर कंपनी लिमिटेड ' उभी राहिली. लोकमान्य टिळकांचे भाचे कै. महाजन हे या साखरकारखान्याचे पहिले इस्टेट मनेजर होते. पुण्यातील शेतकी महाविद्यालयातील पदवीधारकांच्या पहिल्या तुकडीत त्यांचा समावेश होता. त्यांनी आपले द्यान स्वजनहितार्थ वापरले.छोट्या छोट्या चाळवजा घरात राहून इथला अधिकारी वर्ग शेतकर्याण्ना शेतीचे अद्यावत द्यान देऊ लागला. कारखान्यातील तांत्रिकी माहिती सांगू लागला. कारखान्याने चांगलेच मूळ धरले. जो शेतकरी शेतीवर कशीबशी गुजराण करत होता, त्याला कारखान्यामुळे कामधेनूच दारात आल्यागत झाले.कारखान्यात काम करून कामगार चार पैसे कमवू लागला.१९५४ साली जगप्रसिध्द वास्तुशास्त्रद्य जे. जे. बोधे यांच्या आराखड्यानुसार सुप्रसिध्द शापुरजी पालनजी आणि कंपनीने कारखान्याची दिमाखदार वसाहत उभी केली. एक नंबर बंगला कारखान्याच्या ब्रिटिश मनेजरसाठी असे,. अनेक खोल्या असलेली ही इमारत सभोवार देशी विदेशी फ़ळाफ़ुलांनी बहरलेल्या बगिच्यात एखाद्या गढीप्रमाणे शोभत असे. डायरक्टरचा बंगला, मनेजरचा बंगला व इतर वरिष्ठ अधिकार्यांचे बंगले म्हणजे वास्तुशास्त्राचे उत्क्रूष्ट नमुने होते.ए., बी, सी, डी अशा टाइपमध्ये विभागलेल्या या सुबक , रेखीव वसाहतीवर उंच उंच व्रुक्षांनी सावली धरली होती. मध्यभागी जिमखाना होता. त्यामध्ये होणाया टेबल टेनिस, बडमिंटन यांच्या स्पर्धांमध्ये राष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू भाग घेत असत.
draft

No comments: