<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740</id><updated>2012-01-16T10:13:53.787-08:00</updated><title type='text'>Sound of Mind</title><subtitle type='html'>लाटेच्या फुटण्याने एक एक पाऊल पुसत जाण्यापूर्वीचं मनोगत....</subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>52</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-4276098739276248029</id><published>2012-01-14T02:09:00.000-08:00</published><updated>2012-01-14T02:13:46.798-08:00</updated><title type='text'>जगरहाटीचा पहिला धडा</title><content type='html'>साठ वर्षांपूर्वी मूल पाच वर्षांचं झालं की, त्याला कुठल्यातरी शाळेत अडकवून टाकण्याचा विचार घरात सुरु व्हायचा. शाळा शक्यतो घराच्याजवळ असावी हा एकच निकष लावला जायचा किंवा जवळपास रहाणारी बरीचशी मुलं त्या शाळेत जाणारी असावीत अशी  माफक अपेक्षा ठेवली जायची. अर्थात त्यामागे, कळपातलं मेंढरु आपोआप योग्य ठिकाणी पोचतं, हा अनुभव कामी यायचा. &lt;br /&gt;काळ बदलत रहाण्याचं आपलं काम करत रहातॊ. साठ वर्षांपूर्वीचं मूल वाढतं, संसारात पडतं, आणि आपल्यासारख्याच क्रमाने करायच्या गोष्टी आपल्या मुलांबाबतही करत रहातं.तीसपस्तीस वर्षं उलटलेली असतात. परत कालचक्राने तोच फेरा घेतलेला असतो. पण आता गोष्टी खूपच बदलेल्या असतात. साठ वर्षांपूर्वीचं मूल आता आजी झालेलं असतं आणि तीस वर्षांपूर्वीचं मूल बाबा. आजी खुषीत. नातवाच्या बाललीलात दंग. वर्षांना काय त्याचं ? ती आपली पुढे पुढे सरतच असतात.बघता बघता नातू चक्क दोन वर्षांचा होतो आणि घरात वेगवेगळ्या शाळांच्या नावांची चर्चा सुरु होते. हे काय नवं आक्रित ? आजीला वाटतं. अजून चांगली अडीच वर्षं आहेत. आता तर सहा वर्षं पूर्ण झाल्याखेरीज शाळेत घेत नाहीत. आतापासूनच काय हा गोंधळ? असा मनात आलेला विचार मनातच ठेवून आजी नातवाला गोगलगाय दाखवण्यात, पानांवरचे कोवळ्या उन्हात चमकणारे दवबिंदू दाखवण्यात दंग असते.नातूही बापडा त्याला दिसणा-या नानो, एस्टेलो, आल्टो, औडी अशा गाड्या आजीला दाखवण्यात दंग असतो. डम्पर, ट्रक यातला फरक समजावून देत असतो." अग, कुकुली, पोकलेन आणि क्लेन(क्रेन) वेगली अशते" असं दटावत असतो.मजेत दिवस चाललेले असतात. आई आणि बाबा मात्र वेगवेगळ्या शाळांची माहिती मित्रांकडून, शाळेच्या माहितीपत्रकातून, इंटरनेटवरून मिळवण्यात दंग असतात.&lt;br /&gt;आणि अखेर एक दिवस असा उजाडतो की त्या दिवशीच्या आई बाबाच्या आनंदाची तुलना फक्त " आर्किमेडिज"च्या "युरेका"शीच होऊ शकेल. बहुगुणी, आखुडशिंगी, अशी घराच्या जवळची एक शाळा सापडते. आई बाबा त्या शाळेत जाऊन पैसेही भरुन आलेले असतात. किती ते विचारायचं नाही.  कारण आकडा ऐकून आकडी यायची वेळ येते हे आजीला आणि आबांना वारंवार माहीत झालेलं असतच. तरीही ’ पडिले वळण इंद्रिया’ असं असल्यामुळे ती लेकाला विचारतेच आणि लेकाला कळवळून म्हणतेच, " अरे, काय रे हे ? या हिशेबाने म्हटलं तर तुमचं शिक्षण फुकटच म्हणायला पाहिजे की रे.’ लेकही नेहमीच्याच धीरगंभीरपणानं सांगतो, " आई, ही तर सुरवात आहे." नातूही खुष असतो. कारण तोही नवा ’युलिफोर्म’, खाऊचा डबा, नवं दप्तर या सगळ्या गडबडीत असतो.आजी मात्र  काय बाई तरी एकेक फ्याडं’ असं मनाशीच पुटपुटत असते.मनातल्या मनात एवढसं पोर, कसं राहील शाळेत म्हणत उदास होत असते.  &lt;br /&gt;   दिवाळी संपते. शाळेचा पहिला दिवस. युनिफोर्ममध्ये पिल्लू अगदी साजरं दिसत असतं. नवे बूट, पाठीवर दप्तर, हातात  पाण्याची लालचुटुक बाटली ’ मी शालेत चालले " असं अख्ख्या गल्लीला सांगत पिल्लू स्कूटरवर बसून निघतं आणि आजीच्या डोळ्यासमोर मात्र पिल्लाच्या बाबाने त्याच्या शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत जायचं नाही म्हणून घातलेला धिंगाणा उभा राहतो. पाचदहा मिनिटात स्वारी परत येणार आणि " कुकुली गाड्या बघायला चल" म्हणत हाताला धरुन नेणार या विश्वासाने आजी पटकन आंघोळ उरकून घ्यायच्यामागे लागते. तासाभराने पिल्लू येतं ते नाचतच. कारण शाळेच्या बागेत भरपूर गाड्या खेळायला ठेवलेल्या असतात, घोडा, हत्ती वगैरे प्राण्यांचं तोंड असलेल्या. त्यामुळे तर नातवाची चंगळच झालेली असते.शाळा म्हणजे गाड्या असं समीकरण झाल्यामुळे पुढचे आठ दिवस सकाळी आठ वाजल्यापासूनच " शालेत जाऊ या" असा धोषा लावून नातू सगळ्यांना भंडावून सोडत असतो.&lt;br /&gt;आठ दिवसांची रंगीत तालीम पुरेशी झालीसं वाटून शाळेच्या " आत" जाण्याचा कार्यक्रम नवव्या दिवशी ठेवलेला असतो. एकेक पिल्लू आत जाताना आकांत सुरु करतं आणि नातवाचं आणि त्याला सोबत म्हणून बसलेल्या आजीचंही धैर्य खचायला लागतं. नातू आरडाओरडा करुन आपला निषेध व्यक्त करु शकत असतो पण आजी मात्र तटस्थपणाचा मुखवटा सांभाळता सांभाळता जेरीला आलेली असते. अर्धा तासच ’आत’ बसायचं असतं, पण त्या वेळानंतर ’बाहेर ’ आलेल्या सगळ्या पिल्लांची अवस्था ’ गाई पाण्यावर काय म्हणुनि गेल्या’ अशी झालेली असते. आजीच्या गाई तर पाण्यावर जाऊन परत येऊन आता त्या पाण्याची वाफ व्हायला लागलेली असते. नातवाला छातीशी कवटाळून घरी आल्यानंतार आजीने घोषणा करुन टाकते, " मी त्याला पोचवायला मुळीच जायची नाही. काही बिघडत नाही आणखी वर्षाने  शाळेत गेला तरी."म्हणजे आता आजी आणि नातू दोघंही एका बाजूला आणि इतर घर दुस-या बाजूला.मग दुस-या दिवसापासून आई कंबर कसते आणि घरातली सकाळच मुळी " शालेत नाही जायच्यं’ या भूपाळीने आणि " बघ, आज तुला डब्यात गंमत देणार आहे, आज तुला शाळेतून आल्यावर चाकलेट देणार आहे" अशा ख्यालापासून सुरु होऊन अखेर " सगळे हसतील, तुला हम्मा आणून देऊ या. तू हम्माबरोबर जा. रस्त्यावर हम्मा शेण टाकते ते गोळा करावं लागेल" अशा ध्रुपद धमाराने याचा शेवट होई. नातवाची यालाही संमती असते. फक्त तो " हम्माला डायपर घालू या का? म्हनजे तिची शी लश्त्यावल पडनार नाही" असा मौलिक सल्ला देऊन आईच्या रागातली हवा काढून टाकतो. पण अखेर " बरं , तू आत जाऊ नको. बागेत खेळ. " असं करता करता " नीलाक्षी टीचर असल्या तर आत जा" इथपर्यंत मानसिक तयारी करण्यात आई यशस्वी होते. &lt;br /&gt;मग एक दिवशी आजी आणि नातू स्कूटरवरुन शाळेला निघतात. आपल्या धडधडणा-या छातीचे ठोके नातवाला ऐकू येऊ नयेत म्हणून आजी चेहरा हसरा करुन नातवाशी काहीतरी गमतीदार बोलण्याचा प्रयत्न करत असते. नातू आपल्याच नादात रस्त्यावरच्या गाड्या बघण्यात दंग.शाळेच्या फाटकाशी आल्यावर तर आजीला आपले पायही थरथरताहेत अशी सूक्ष्म जाणीव होते आणि घशालाही कोरड पडलीय की काय असं पुसटसं वाटायला लागतं. नातू आता फाटकापासून उलटा फिरणार, आपल्या कमरेला विळखा घालणार आणि भोकाड पसरणार या भयाने ती गळाठून जात. पण पाच मिनिटं झाली तरीही काहीच आवाज येई ना म्हटल्यावर , पोरगं पळालं की काय या विचाराने ती दचकते तर नातू तिच्याकडेच पहात असतो. तिची नजर त्याच्या नजरेला भिडताच तो म्हणातो, " कुकुली, माजं दप्तल दे ना. मी न ललता आत जानाल आहे.आज आमी भालतमाताकी जय अशं मोठ्यंदा म्हननार हाये’&lt;br /&gt;पाठीवर चिमुकलं दप्तर घेऊन जाणा-या पाठमो-या नातवाकडे पहाताना आजीचे डोळे जरासे चुरचुरतात.जगरहाटीचा पहिला धडा नातवाने किती लवकर गिरवला या विचाराने ती किंचित हसते, पण परतीच्या वाटेवर ती मुकाटच असते आणि रोज पटकन संपणारी वाट आज सरता सरत नसते.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-4276098739276248029?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/4276098739276248029/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=4276098739276248029' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/4276098739276248029'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/4276098739276248029'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2012/01/blog-post.html' title='जगरहाटीचा पहिला धडा'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-1936995311106506495</id><published>2011-12-24T21:25:00.000-08:00</published><updated>2011-12-24T21:34:54.546-08:00</updated><title type='text'>एक बालकथा</title><content type='html'>गोष्ट तशी फार जुनी नाही. अगदी अलिकडची. गेल्या साठ वर्षांपूर्वीची. आटपाट नगरातल्या एका ब्राह्मणाच्या ब्राह्मणीला तीन पुत्रांपाठी एक  कन्यारत्न झालं. ते म्हणजे अस्मादिक, हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलं असणारच. माझी आई म्हणायची की, मी जन्मले तेव्हा माझ्या अंगात फारसं रक्त नव्हतं म्हणे. (कोण रे ते खुसू खुसू हसतय?) अगदी कमी वजनाची होते म्हणे मी. अर्थात ती सगळी कसर मी पुढे भरूऊऊऊऊऊऊऊऊऊऊन काढली ती गोष्ट वेगळी. पण हे कमी रक्त असण्याचा संबंध तिने माझे केस पांढरे असण्याशी जोडला. आणि लोकांनाही ती तसंच सांगू लागली अर्थात मलाही ते खरं वाटून मीही कोणी माझ्या केसांबद्दल विचारलं तर तसंच सांगू लागले. पण ब-याच वर्षांनंतर माझ्या लक्षात आलं की केसांच्याबाबतीत आपण आपल्या वडलांवर गेलो आहोत. म्हणजे असं की साहित्य, कला, क्रीडा यांची आवड, चार लोकात गा असं सांगितलं तर आजूबाजूच्या लोकांना पळापळ करायला लागणार नाही इतपत (आणि इतपतच) गोड गळा या गोष्टी जशा त्यांनी आपल्याला दिल्या तशीच ही भेट आपल्याला दिली आहे. त्यामुळे यात आपला काही दोष नसून ही "वंशपरंपरेने" लाभलेली विरासत आहे समजून मी निश्चिंत झाले. पण आईचं ह्रदय. त्याला कोण समजावणार? आणि तिने मनाची समजूत घातलीच तरी आजूबाजूच्या बायाबापड्या तिला थोड्याच सोडणार? "वैनी, काय तरी उपाय करा बरं का, न्हाय तर पुरीला कायमची घरात ठेवून घ्याची येळ ईल." एक सईबाईला भिववून सोडी. "क्यास पिकल्यात म्हंजी पोरीला डोकं कमीच असनार. दर वरसाला पास झाली तरी घोडं न्हालच म्हनायचं की." "तर वो, त्यात या आजकालच्या पोरी फ्याशनी कराय पायजेत. केसाला त्याल म्हनून लावाय नगं. "असं करुन आईला बिचारीला भंडावून सोडत. मग तीही आपापल्या परीने माझे पांढरे केस झाकायचे प्रयत्न करी. एका बाईने तिला सल्ला दिला की, एका विशिष्ट प्रकारची केरसुणी जाळून त्याची काळीकुट्ट राख (एरवी राख पांढरट असते, पण या जातीच्या केरसुणीची राख काळी व्हायची.) खोबरेल तेलात खलवून डोक्याला लावा. बघा, केस काळे होतात की नाही. आई बिचारी लागली कामाला. बाजारात जाऊन केरसुणी आणून ती जाळली. आणि तिने ते मलम तयार केलं. माझे काळेभोर केस बघून तिच्या चेह-यावर जो अवर्णनीय आनंद पसरला, तो आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. पण खरी गंमत तर पुढेच आहे. ते मलम लावलं की मला मात्र माझं डोकं संभाळता संभाळता पुरेवाट व्हायची. कारण जरा जरी कोणाचा हात माझ्या डोक्याला लागला तरी तो काळा व्हायचा. अखेर माझ्या आरडा ओरड्याला कंटाळून तिने हा उद्योग बंद केला. कदाचित तिलाही त्यातला फोलपणा जाणवला असावा. मी साधारण नववीत असताना आमच्या घरासमोर एक मालुताई रहात होत्या. त्या एक दिवशी आईला म्हणाल्या, बाजारात एक नवीन औषध आलय. ती पावडर पाण्यात खलवून ब्रशने केसाला लावायची आणि वाळल्यावर केस धुवायचे. थोडक्यात म्हणजे तो एक डाय होता. संजिवनी बुटी सापडल्यावर हनुमानाला व्हावा तसा आनंद आईला झाला. (उपमा चुकली वाटतं, खैर, मतलब समझो) उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर हा डाय लावून मी शाळेत गेल्यानंतर खोटं वाटेल, पण खरं सांगते, मला पहायला शाळेतल्या मुली मधल्या सुट्टीत माझ्या वर्गाच्या दारात लोटल्या होत्या. त्यांच्या आश्चर्ययुक्त प्रश्नांना माझं (अर्थात आईने पढवलेलं) उत्तर तयार होतच. "अग, माझ्या आईचे वडील वैद्य आहेत ना, त्यांनी एक औषध शोधून काढलय ते तेल लावल्यामुळे माझे केस असे झाले." माझे आजोबा वैद्य होते आणि पंचक्रोशीत नावजलेले होते हे सत्य होतं पण त्याबरोबरच दुसरं सत्य असं होतं की ते कोकणात रहात असल्याने त्यांच्या "औषधाची" छाननी कोणीही करु शकणार नव्हतं. त्यामुळे लग्न होईपर्यंत मी आरामात "मून अन्ड स्टार" या डायने माझे केस काळे करू लागले.&lt;br /&gt;पुढे मग ’गोदरेज’ माझा कायमचा डाय झाला आणि "वैनी तुमचे केस किती लांबसडक आणि काळेभोर आहेत नाही?" अशा कौतुकालाही मी पात्र ठरले. पण कालान्तराने दर महिन्याच्या महिन्याला या लपंडावाचा कंटाळा येऊ लागला. जवळजवळ पंचवीस वर्षं डाय लावल्यामुळे डोक्याची कातडी नाजुक झाली. सतत खाजू लागली. हे रंगकाम नको वाटू लागलं. पण धीर होत नव्हता. नव-याचा सल्ला घेतला. त्याला बापड्याला तरुण असतानाही केसांच्या रंगांमुळे काही  फरक पडत नव्हता. आता तर त्याचं म्हणणं असं होतं की, केस तुझे, तर ते कसे असावे हे ठरवायचा अधिकार फक्त तुझा आहे. बस्स! एक साक्षात्कारच झाला मला. मनाची बंधनं गळून पडली आणि ठरवलं. अभी नहीं और कभी नहीं. ते सहा महिने म्हणजे माझ्या द्रूश्टीने नाही  तरी लोकांच्या नजरेने भयंकरच गेले असणार. कारण डोक्यावर वाढून नवे आलेले पांढरे केस, डाय न केल्यामुळे झालेले तांबूस केस आणि नैसर्गिक असलेले काळे केस असे तीन रंग दिसत असल्याने मैत्रिणी कळवळून परत केस काळे करायचा सल्ला  द्यायला लागल्या. पण माझा बाणेदारपणा त्यामुळे मुळीच कमी झाला नाही केसाची लांबी एकदम कमी करुन टाकली आणि त्याचं फळ मला सात -आठ महिन्यात मिळालं. सगळं डोकं पांढ-या केसांनी भरुन गेलं. पूर्वी राठ लागणा-या केसांचं रुपान्तर मऊ मऊ कापसात झालं. आणि बघणा-याच्या नजरेत खुषीची दाद मिळू लागली. लहान मुलं केसातून हात फिरवत "आजी तुझे केस किती मऊ आहेत ग," असं लाडिकपणे म्हणतात तेव्हा मी भरुन पावते, आणि माझ्या समवयस्क मैत्रिणी "किती छान दिसतात ग तुझे केस. आम्हाला पण करावेसे वाटतात पण धीर होत नाही." असं म्हणतात तेव्हा मी घेतलेल्या निर्णयाचा मला अभिमान वाटतो. खरोखर आज साठीला आलेल्या आमच्या पिढीला किती तरी बंधनांना निष्कारणच बळी पडावं लागलं. कोण जाड म्हणून, कोणाचं रुप तर कोणाचा रंग  त्यांचं बालपण करपवून गेला. प्रत्येक ठिकाणी लोक काय म्हणतील ही भीती. आणि त्या द्डपणामुळे मनात नसतानाही काही गोष्टी रुढी पाळव्या लागत असत. एकदा ती बंधनं तोडली की आनंदच आनंद! आजची पिढी या दडपणाखाली वावरत नाही. मस्तपैकी केस रंगवून घेते आणि वर अभिमानाने सांगते. "आय अ‍म वर्थ इट".&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-1936995311106506495?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/1936995311106506495/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=1936995311106506495' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/1936995311106506495'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/1936995311106506495'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2011/12/blog-post_24.html' title='एक बालकथा'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-6723992214987085585</id><published>2011-12-24T20:58:00.000-08:00</published><updated>2011-12-24T20:59:52.865-08:00</updated><title type='text'>बचपनके दिन</title><content type='html'>माझिया माहेरा जा असं म्हणताना माझ्या डोळ्यापुढं येते ती कोल्हापुरातली खासबाग. त्यातलं "राज अंजुमन ताज" असं नाव धारण करणारी बी. नांद्रेकर या जुन्या जमान्यातल्या एका गाजलेल्या नटाची भली मोठी वास्तू आणि एकापुढे एक अशी भली मोठी तीन मैदानं असलेला खासबागेचा परिसर. इथेच माझं लहानपण गेलं. त्या वेळी सकाळी दहा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी सातनंतर रहाण्याचं ठिकाण म्हणजे घर, अशी समस्त गल्लीकर बच्चे कंपनीची धारणा असल्याने उरलेला वेळ मैदानावर धुडगुस घालण्यात जायचा. लपंडाव, लगोरी, साखळी, बशीबोल, दगड का माती, उन का सावली असे आजच्या पिढीला अगम्य असलेले खेळ खेळण्यात आमचा वेळ कसा जायचा ते कळतही नव्हतं. तीनही मैदानं सकाळ संध्याकाळ मुला मुलींनी ओसंडून वाहत असत. कोल्हापूर ही कलानगरीबरोबरच क्रीडानगरीही असल्यामुळे खेळ खेळणं ही श्वासोच्छ्वासाइतकीच सहज गोष्ट वाटायची आम्हाला. घर किंवा मैदान अशी दोनच ठिकाणं चुकल्या पिराला शोधायला उपयोगी असायची. पंचगंगा नदीवर पोहायला जाणं, हा एक आनंदाचा भाग असायचा. घरापासून चारेक किलोमीटरवर असलेल्या नदीवर चालत जायचं आणि पोहून परत चालत यायचं म्हणजे भरपूर भूक लागायची. मग आईने केलेल्या गरम गरम भाकरी, त्यावर लोण्याचा गोळा आणि खोब-याची लसूण घालून केलेली चटणी. अहाहा! मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतय, मला ते पुढच्या ताटात दिसतय अशी अवस्था व्हायची. &lt;br /&gt;वेगवेगळ्या दिवसातले खेळ वेगवेगळे असायचे. श्रावणात सगळ्यांच्या बागांमध्ये फुलं, पत्री बहरून आलेली असे आणि पूजेसाठी त्यांची गरजही असे. त्यामुळे बागेतल्या निसरड्या जागा चुकवत, मधूनच झाडावरुन पडणारे भले मोठे लांबलचक केसांचे सुरवंट चुकवत फुलं, पत्री गोळा करणं हा एक आनंद सोहळाच असे. त्यावेळी बागेच्या कुंपणाला मेंदीसारखीच दिसणारी पण मोठी पानं असणारी झुडपं वापरत. त्याचं नाव माहीत नाही, पण आम्ही त्याला "मेंदा" म्हणत असू. त्याला पांढ-या रंगाची नाजूक फुलं येत. ती गोळा करून आम्ही त्याचे वेणीसारखे गुंफून गजरे करत असू आणि केसात माळत असू. शिवाय गुलबक्षी, बुच यांच्या फुलांच्या वेण्याही करायच्या असल्यामुळे ती गोळा करतानाही बराच वेळ सत्कारणी लागायचा. गुलबक्षीच्या फुलांचा आणखी एक उपयोग म्हणजे हात रंगवणे. मेंदी गोळा करा, मग एखाद्या मैत्रिणीच्या आईकडे लाडीगोडी लावून वरवंटा, पाटा मिळवा आणि त्यावर मेंदी वाटा मग हातावर मेंदीचे गोळे ठेवा. या सगळ्यात खूप वेळ आणि शक्ती जात असल्यामुळे पाच सहा वर्षाच्या वयात गुलबक्षी आमच्या मदतीला धावून येत असे. तसे आमचे खेळ सगळे पाना फुलांच्या सोबतीनेच होत. म्हणजे असं की, रस्त्याच्या कडेला, बागेच्या कडेला रान गवत, वनस्पती उगवत. त्यात एक आळूच्या पानांसारखी पानं असणारी पण आकाराने अगदी चिमुकली अशी पानं असत. ती आमच्यासाठी आळूची भाजी असे. त्यालाच केळ्यासारखी दिसणारी चिमुकली फळं लागत ती आम्ही "भाजीवाली, भाजीवाली" खेळताना विकायला ठेवत असू आणि घरच्या लोकांना ती कंपल्सरी "विकत" घ्यावी लागत.रस्त्याच्या कडेला उगवणारी भगव्या रंगाच्या फुलांची घाणेरी आणि त्याला लागणारी काळ्या रंगाची फळं. त्यांना आम्ही कांगुण्या म्हणत असू. ती गोड फळं येता जाता तोंडात  टाकायला फार मजा यायची. बाभळीची पिवळीधमक फुलं कानात घालून नटताना बाभळीचे काटेही पायात घुसत. आता आठवलं की गंमत वाटते, पण आमच्या खेळातल्या बहुतेक वस्तू फुकटच्या असत, तशीच आमची औषधही फुकटचीच असत. म्हणजे खेळताना ब-याच वेळा पडायला व्हायचं आणि पडेल तो वाढेल अशीच धारणा त्या काळी असल्याने  आमच्या आयाही "कुठे धडपडलात" असं आदरार्थी बहुवचन वापरुन लागलेल्या ठिकाणी हळद थापून आम्हाला परत खेळायला पिटाळत. क्वचित पाठीवर फारतर एखादी "प्रेमळ थाप" बसे. पण तेही टाळायचं असल्यास आमच्याकडे सब दुखोंकी एक दवा होती. ती म्हणजे "दगडी पाला". म्हणजे टणटणीचा पाला. त्याला पिवळ्या रंगाची फुलं येत. ती आम्ही "म्हातारे, म्हातारे, पैसा देतेस का मुंडकं उडवू" असं म्हणत टिचकीने उडवत असू. असा हा भीषण क्रूर खेळ आम्ही हसत हसत का  खेळत असू हे एक कोडच वाटतं. तर हा दगडीपाला रस्त्याच्याकडेला कुठेही उगवायचा. त्यामुळे सहजच उपलब्ध असायचा. मग एखादा चपटा दगड शोधला जायचा. तो धुवून त्यावर दगडीपाला ठेवला जायचा. दुस-या दगडाने ठेचून त्याचा रस काढून तो जखमेवर पिळला जायचा. यात आम्ही ना कधी दगडीपाला धुतला ना कधी ठेचायचा दगड धुतला ना जखम ना आमचे हात. देव तारी त्याला कोण मारी हेच खरं!  आणि आता दुखणा-या गुडघ्यांना बाम चोळताना हे सगळं आठवताना बरं वाटतं हेही तितकंच खरं. पण त्याचबरोबर काही प्रासंगिक औषधोपचारांनाही आम्हाला दर महिन्याला सामोरं जायला लागायचच. एक म्हणजे एरंडेल तेल पिण्याचा मासिक कार्यक्रम असायचा. ते अतिशय शुध्द स्वरुपात असल्यामुळे त्याला एक प्रकारचा भयानक वास येत असे. त्यात ते तेल. आजच्या मुलांना कल्पनाच येणार नाही त्याच्या चवीची. बरं, पोटातल्या जंत मारण्यासाठी हे पिणं आवश्यकच आहे अशी समस्त आयांची ठाम समजूत असल्याने महिन्याच्या पहिल्या रविवारी सकाळी सकाळी घराघरातून "पी लवकर. गीळ चटकन. गीळ म्हणते ना" असे दरडावणीचे आणि "नको ना ग आई" असे आर्त की काय म्हणतात तसे आवाज घुमत असत. मग दिवसभर "कोठा" साफ केल्यानंतर दुपारी गळून अंथरूणावर पडल्यानंतर थोडासा वरणभात मिळत असे. मला तर अजूनही तो एरंडेलाचा मोठा चमचा, लिंबाची फोड, लोणच्याची फोड असा सरंजाम आठवला तरी "भावना" होते. इतक्या वर्षांनंतरही! दुसरा एक अत्याचार म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात कांदे किसून डोक्यावर थापले जात आणि डोकं फडक्याने बांधून दिवसभर घरात डांबून ठेवलं जाई. किसलेल्या कांद्याचं पाणी डोळ्यात जाई. डोळ्याची प्रचंड चुरचुर होई. पण तेही चांगलच असे. कारण त्यामुळे डोळे स्वछ होतात आणि म्हातारपणी चष्मा लागत नाही "म्हणे". पण ही म्हातारपणाची लहानपणी केलेली तरतूद पुढे उपयोगी पडली नाही आणि लागायचा तेव्हा चष्मा लागला ती गोष्ट वेगळी. परत केसांना येणारा कांद्याचा वास पुढे महिनाभर डोकं उठवी (ज्याच्या डोक्यावर घातलेला असे त्याचं स्वत:चं आणि घरच्यांचं ते वेगळच.)  मुलींना आणखी एका दिव्याला सामोरं जावं लागायचं ते म्हणजे केसात झालेल्या उवांचा नि:पात करणं. तेव्हा सगळ्याच मुलींचे केस लांब असत. मग पावसात भिजले म्हणून म्हणा, किंवा घामाने भिजले म्हणून म्हणा, पण केसातले "हत्ती घोडे" काढण्याचं साप्ताहिक काम असे. त्यासाठी बारीक दातांची एक फणी असे. तिने प्रथम डोक्याची सालटी काढेपर्यंत केस विंचरले जात. त्यानेही भागले नाही तर मग शिपिचंदन नावाचं एक भगव्या रंगाचं केमिकल मिळत असे. ते विषारी असे, पण उवांवर रामबाण उपाय. ते केसाला लवून आंघोळ घातली जाई. शिपिचंदन आंघोळ करताना  डोळ्यात गेलं तर आंधळेपण येईल या भीतीने डोळे इतके घट्त दाबून धरले जात की काही काळापुरतं खरच आंधळेपण आल्यागत गत होई. मग पुढे लायसिल आल्यानंतर आणि छोट्या केसांची चलती झाल्यामुळे समस्त महिलावर्गाने सुटकेचा नि:श्वास टाकला.&lt;br /&gt;पण या हालांबरोबरच लहानपण म्हणजे एक स्वप्नांचा देश होता. निदान साठ वर्षांपूर्वी तरी तो तसा असायचा. कारण बहुतेक वाचायची पुस्तकंही आम्हाला राक्षस, प-या अशांच्याच प्रदेशातून हिंडवून आणायची. चांदोबा हे तेव्हाचं अगदी बालप्रिय मासिक. त्यातली चित्रं दाक्षिणात्य पध्दतीची असायची.त्यातल्या गोष्टी बोधपर असल्या तरी एकंदर कल्पनेच्या जगातल्या असायच्या. त्यामुळे तेव्हा वेगवेगळ्या समजुतींचा आमच्या मनावर पगडा असायचा. त्यातली एक गोष्ट म्हणजे रस्त्यावर रेघ ओढली आणि त्यावर गाईचा पाय पडला तर आपली आई मरते. त्यामुळे खेळताना बाऊन्डरीज आखताना मैदानावरच्या मातीत काटकीने किंवा दगडाने आखलेली रेघ पुसल्याशिवाय कोणीच घरी परतत नसे. चुकून जर रेघ पुसायची राहिली तर जिवाच्या आकांताने कुण्या मैत्रिणीला सोबत घेऊन परत मैदानावर जाऊन ती रेघ पुसल्याशिवाय आम्हाला चैन पडत नसे. दुसरं म्हणजे उंब-यावर बसून शिंकलं तर मामा मरतो. अरे, काय हे? सगळे अपशकुन आपले आईकडच्या बाजूच्याच लोकांना. पण आम्ही या समजुतींना टरकून असायचो हे नक्की. चुकून जरी त्यांचं उल्लंघन आमच्या हातून झालं तर देवळात जाऊन रावणेश्वरापुढे नाक घासल्याशिवाय आमच्या जीवाला समाधान मिळत नसे. हळू हळू काळाबरोबर जगाच्या व्यवहाराची जाणीव व्हायला लागली. मनाची निरागसता कमी व्हायला लागली आणि या सगळ्या गोष्टी आठवल्या की हा असला वेडेपणा आपणच करत होतो का असं वाटायला लागलं. पण तरीही हा असला वेडेपणा आठवताना मनाला एक प्रकारचा थंडावा का मिळतो बरं? आणि अंगावरुन मोरपीस फिरवल्यागत कोवळेपणा ?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-6723992214987085585?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/6723992214987085585/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=6723992214987085585' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/6723992214987085585'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/6723992214987085585'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2011/12/blog-post.html' title='बचपनके दिन'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-3217672106696541785</id><published>2009-11-24T06:48:00.000-08:00</published><updated>2009-11-28T10:20:52.511-08:00</updated><title type='text'>दुनिया रंगरंगीली</title><content type='html'>वेगस --- Welcome to Fabulous Las Vegas अशी पाटी आपलं स्वागत करते, तेव्हा आपल्याला तो एक जाहिरातीचा प्रकार वाटतो, पण जाहिरातीतला दावा प्रत्यक्षात आणणारी जागा म्हणजे लास वेगास. मोहमयी, what you do in Vegas remains in Vegas असा दिलासाच हे शहर, नव्हे नगरी देत असल्यामुळे या पापनगरीत येऊन पाप करण्यात लोक अहमहमिकेने सामील होतात.&lt;br /&gt;एक वेगळीच दुनिया इथली रात्र आपल्यापुढे उलगडते. अशी दुनिया जी आपण केवळ सिनेमात, आणि त्यानंतर स्वप्नातच बघत असतो. इथला झगमगाट ज्या भागात आहे, त्याला strip म्हणतात. स्ट्रिप पाच साडेपाच मैलांची आहे. या जागी तुम्ही भर रस्त्यावरही कायद्याने दारु पिवू शकता, इथल्या कॅसिनोमध्ये जुगार खेळू शकता पण इथे कुठेही वेश्याव्यवसायाला कायद्याने बंदी आहे त्यासाठी तुम्हाला स्ट्रिपपासून थोडं लांब म्हणजे 60 मैलावर असलेल्या दुसऱ्या गावी जावं लागतं.   स्ट्रिपवर शेकडो कॅसिनोज आहेत आणि प्रत्येक कॅसिनोमध्ये शेकडो लोक रोज रात्री पैशाची उधळण करत असतात तर त्यांच्या दिमतीला प्रत्येक कॅसिनोत हजारो लोक राबत असतात. इथल्या प्रत्येक हॉटेलला एक थीम आहे. त्यानुसार त्याची सजावट केलेली असते. Hard Rock या हॉटेलच्या बाहेर भलंमोठं गिटार दिव्यांनी चमकत असतं तर Venetian ची सजावट व्हेनिससारखी केलेली आहे. या हॉटेल्समध्ये तुम्ही राहू शकता, दरही शहरातल्या इतर हॉटेल्स इतकाच. इथे कोणत्याही हॉटेलच्या self parkingमध्ये तुम्ही गाडी ठेवू शकता आणि तेही फ़ुकट. कारण इथे पैसा मिळवण्याचं प्रमुख साधन म्हणजे कॅसिनो.इथल्या ब-याच हॉटेल्समध्ये नाटक, जादूचे प्रयोग, टॉक शोज यासाठी कायमची थिएटर्स बांधलेली आहेत. आम्ही पाहिलेल्या "का" या फ़्रेंच नाटकाचं थिएटर अखाद्या खेळाच्या स्टेडियम इतकच प्रचंड होतं. आम्ही पहिल्या दिवशी गेलो ते हॉटेल होतं बेलाजियो. एक तळं आणि त्याच्या सभोवार वेगवेगळी हॉटेल्स. पॅरिस, बेलाजियो, प्लॅनेट हॉलिवूड ही त्यातलीच काही. यातलं प्रत्येक हॉटेल प्रासादतुल्य. इथे रहाण्याची सोय असते आणि खाली जुगार खेळण्याची.तिथे अप्रतीम पोषाख केलेले स्त्री पुरुष हातात हात घलून येतात आणि कॅसिनोत शिरतात. आम्हीही "कॅसिनो म्हणजे काय रे भाऊ" म्हणत आत शिरलो तर अनेक टेबल्सवर बहुतांश म्हातारी मंडळीच खेळत होती आणि त्यातही म्हाता-या स्त्रियांचा भरणा अधिक होता. इथे १ डॉलरपासून तुम्ही खेळू शकता. आणि ते सगळ्या हॉलमध्ये मांडलेल्या टेबल्सवर. कोटींची भाषा करणारे खास आतल्या दालनात असतात आणि तिथे ऐ-यागै-यांना प्रवेश नसतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;बेलाजियोमध्ये आम्ही गेलो तेव्हा हॅलोविन हा विषय घेऊन सजावट केली होती. मेपलची प्रचंड पानं, भोपळे, भाज्या अशा काही मांडल्या होत्या की ख-याच वाटाव्यात.  एका कोप-यात प्रचंड आकाराचं रहाटगाडग्याचं चाक विहिरीतलं पाणी काढून ओतत होतं. त्या बागेतल्या  दोन झाडात भुतं कोरलेली होती. आपल्याकडे झाडातून रोखून पाहणारी भुतं इतकी गोड होती की त्यांची भीती वाटण्याऐवजी त्यांनी आपल्या घरच्या बागेत रोज येऊन आपल्याला रोज दूरदेशीच्या गोष्टी सांगाव्यात असं वाटावं. एक भूत तर आम्हालाच विचारत होतं आपल्या खर्जातल्या आवाजात, " Do you want me to smile? say cheese" आणि मग हसत होतं. फ़ोटो काढायला मग झुंबड उडणार नाही तर काय?&lt;br /&gt;&lt;br /&gt;बेलाजियोच्याबाहेरच्या तळ्यात संध्याकाळी ६ ते रात्री ८ या वेळात दर अर्ध्या तासाने आणि तिथून पुढे दर पंधरा मिनिटांनी musical fountain चा शो होतो. तो रात्री १२ वाजेपर्यंत असतो. तो पाहण्यासाठी लोक वेड्यासारखे उभे असतात. आम्हीही त्यात सामील झालो. अतिशय तोकडे कपडे घातलेल्या तरुणी म्हणजे ज्यांना बघून पाप करायला उद्युक्त व्हावच लागेल अशा, हसत खिदळत चाललेल्या होत्या. या स्ट्रिपवर तुम्ही भर रस्त्यावरही वारुणी चाखू शकता. त्यामुळे ब-याचजणींच्या हातात लहान मोठ्या सुंदर आकाराच्या बाटल्या होत्या. यामध्ये पुरुष होते तशाच स्त्रियाही होत्या. सगळे आपले एकच धुन आळवत होते, "चला जाता हूं खुषीकी धुनमें धडकते दिलके तराने लिये" पण मला मजा वाटली ती ही की यात कुठीही बिभत्सपणा किंवा छचोरपणा, टपोरीपणा नव्हता. जे काही चाललं होतं त्यातही एक नजाकत होती. सारा परस्पर खुषीचा मामला असल्याने आणि बाकीच्यांच्या नजरा तिकडे वळत नसल्याने चोरटेपणा आणि त्यातून येणारी बुभुक्षितता नव्हती. मला तर आपण गोष्टीत वाचतो त्या गंधर्वनगरीतले यक्ष, किन्नर, गंधर्व आणि अप्सरा विहरत चालल्या आहेत असंच वाटत होतं. आमच्यासारखे जे कुटुंबवत्सल लोक ’काय आहे वेगास ते बघूया तरी’ म्हणून आलेले होते, तेच त्यांच्याकडे हळूच चोरटा कटाक्ष टाकत होते.&lt;br /&gt;आणि एकाएकी तळ्यातल्या पाण्यात हलके हलके तरंग उमटायला लागले. पाश्चात्य संगीताची हलकीच धुन उमटली आणि एकदम सगळं तळंच उजळून निघालं. पुढची पंधरा मिनिटं त्या तळ्यात कारंजांच्या माध्यमातून जे काही घडलं ते केवळ अवर्णनीय होतं. शेकडो कारंजी जाझच्या तालावर थिरकत होती. लवत होती. उचंबळून स्वत:ला उधळून देत होती. आणि गाणारा प्रियकर गीतातून प्रेयसीला आपण अनुभवलेल्या मधूर क्षणांची आठवण करून देत उमलवत होता. त्या कारंज्यांच्या उसळण्यातून एक प्रेमी युगुल, आपल्यातच मग्न, असं नाचत असल्याचा जो एक अनुभव येत होता, तो केवळ शब्दातीत होता. पहिलं कारंज उसळल्यावर मी कॅमेरा सरसावला आणि  दुस-याच क्षणी भारावून बंद केला. ते सगळं डोळ्यात साठवण्याऐवजी निर्जीव कॅमे-यात बंदिस्त करायला माझं मन मानेना. त्यासाठी दुस-यांदा तो नजारा बघायचा होताच ना!&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुस-या दिवशी आम्ही गेलो ते हॉटेल होतं व्हेनेशियन. हॉटेलच्या कलाकुसरीकडे डोळे फ़ाडून आणि तोंड उघड टाकून बघत आम्ही आत शिरलो आणि ब्रॅंडेड वस्तूंच्या नुमाइशीतून वाट काढत पोचलो ते एकदम मोकळ्या निळ्या आकाशाखाली. त्यात कुठे कुठे पांढरे ढग आणि मंद चमकणा-या चांदण्याही होत्या. क्षणभर काहीतरी चुकतय असं वाटलं . कारण इथे ५ वाजताच अंधार पडतो.  इथल्या आसमंताने पांघरलेल्या काळ्या शालीवरची हि-या माणकांची कलाकुसर बघतच आम्ही आत आलो होतो, मग इथे अजून उजेड कसा? आणि नीट निरखून पाहिलं तर जाणवलं की हे मानवनिर्मित आकाश अहे. इथे काळ थांबलेला आहे. उंच इमारतींच्याहीवर आकाशाचा आभास करणारा निळा घुमट आणि त्यावर ता-यांप्रमाणे चमकणारे दिवे. मधल्या भव्य चौकात खाण्यासाठी मांडलेली टेबल्स आणि बाजूच्या कालव्यातून तरंगत जाणा-या बोटी. इटालियन संगीत आळवणारे इटालियन पोषाख केलेले माझी. अर्थात त्या माझींच्या बेल्टला वॉकीटॉकी लावलेला होता आणि त्यावरून त्यांचं परस्परांशी आपापल्या गि-हाइकाबद्दल आणि कामाबद्दल बोलणं अर्थात इटालियनमध्ये चाललं होतं तो भाग वेगळा.&lt;br /&gt;इथे आम्ही नावेतून फ़ेरी मारण्यासाठी रात्री पावणेआठ वाजता उभे राहिलो. आमचा नंबर साडेआठ वाजता लागणार असल्याबादाल आम्हाला आधीच कल्पना देण्यात आलेली होती.एका नावेत चार माणसं बसू शकतात.या चारजणात छोट्या मल्हार वय वर्षे ५ महिने याचाही समावेश असल्याने ते तिघे एका नावेत आणि आम्ही दोघे आणि मूळचं चेन्नईचं आणि सध्या बोस्टनला कामानिमित्त रहात असलेलं एक तरुण जोडपं दुस-या नावेत अशी विभागणी झाली. आम्ही ज्या नावेत बसलो होतो त्या नावाड्याने सुरवातीलाच कमरेत झुकून आम्हाला सांगूनच टाकलं की आता पुढची पंधरा मिनिटं तो आमचा मित्र आहे. आणि तात्काळ जुन्या मित्रासारख्या त्याने गप्पा मारायलाही सुरवात केली. पण ते गप्पा मारणं बहुतांशी एकतर्फ़ीच होतं. कारण मराठीने केला इटालिअयन मित्र. आमचे उच्चार त्याला आणि त्याचे उच्चार आम्हाला समजून येईपर्यंत १५ मिनिटं कधी उलटून गेली ते समजलंच नाही. आम्हाला आमच्या मित्राबद्दल एवढं मात्र कळलं की "फ़िफ़्तीन देज बॅक ही एत इंदियन फ़ूद अंन इत वॉज वेरी हॉत." अर्थात पुढचे प्रवासी ज्या कुठल्या देशातले असतील त्या देशाची माहिती त्याला असली तर तो ते त्यांना मैत्रीत सांगणार होताच. फ़क्त आमच्या या मित्राला त्याच्या नावेतले चौघे प्रवासी इंदियन आहे हे कळल्यानंतर खात्रीने वाटत होतं की "यू मस्त बी नोइंग ईचादर, बिकॉज इंदिय इज अ स्मॉल कंत्री." ज्यावर आम्ही चौघांनी जोरदार आक्षेप घेतल्याने त्याने मान्य केलं की "ही वॉज जस्त किदिंग." सगळ्याच नावांचे नावाडी उत्तम गाणारे असावेत. यात नावाडी मुलीही होत्या. कारण त्यांची गाणी संपली की नावेतले लोक हसत हसत टाळ्या वाजवत होते. त्यातले कितीजण कळून आणि कितीजण सुटकेच्या भावनेने हे कळायला मात्र वाव नव्हता. मल्हारने फ़ेरी मारताना नावेतल्या आईवडिलानाच आनंद दिला असं नाही तर बाजूला उभे राहून बघत असलेल्या लोकांकडे खिदळून बघत त्यांच्याही चेह-यावर हसू उमटवलं. त्याच्यासाठी नावाड्याने ललबाय गाइलं. आमच्या नावाड्याने बहुधा प्रेमगीत गायलं असावं. कारण एका कमी उजेड असलेल्या पुलाखाली आल्यावर त्याने विचारलं, "दोन्च्यू वॉन्त तु किस ?" तेवढं आम्हाला बरोबर कळलं. पण सध्या मल्हारचाच पापा घ्यायची सवय असल्याने गोंधळ झाला, तोपर्यंत नाव पुढे गेली होती. उतरताना मात्र पोराने हाताला धरून उतरवलन हो, आणि वर म्हणाला, "हॅव हॅपी ताईम ममा!"  &lt;br /&gt;&lt;br /&gt;याच हॉटेलात मादाम तुसा म्युझियम आहे. म्हणजे मूळ म्युझियममधले काही पुतळे इथे आणि काही न्यूयॉर्कला आलटून पालटून रहायला जातात. आम्ही प्रवेश केला तेव्हा बहुतेक सगळे आम्हाला अगम्य असलेली माणसंच होती. पण जी काही होती त्यांच्याबरोबर फ़ोटो काढून घेताना मजा आली. एका मजल्यावरून खाली जाताना निकेतकडे स्ट्रोलर असल्याने तो लिफ़्टने गेला आणि आम्ही दोघे एका अंधा-या वाकड्या जिन्याने खाली जायला निघालो. वाटेतच स्पायडरमॅन आपल्या नेहमीच्या पोजमध्ये आमची वाट बघत होता. त्याला हाय करून खाली आलो तर अंधारात एका बाजूला एक बंदिस्त खोलीकडे जायला पडदा लावलेला होता. तिथून आपण आत गेलो की आपल्याला घाबरवून किंचाळायला लावणारी, अंगावर येणारी भयानक भुतं तयार असतातच. मागच्यावेळी निकेत आणि स्वप्नील कसे घाबरले होते ते मी हसत हसत विलासला सांगत असतानाच माझी नजर एका कोप-यात गेली.  डोक्यातून रक्ताची धार एक लागलेला उघडाबंब तरुण कसाबसा गलितगात्रसा भिंतीला टेकून उभा असलेला मला दिसला. ५ मिनिटांपूर्वी तो तिथे नव्हता. माझ्या मनात शंकांचं मोहोळ. कुठल्यातरी टोळीयुध्दात मार खाऊन आलेला हा तरुण इथे लपून बसलेला असावा या विचाराने मी पावलं चटकन उचलली आणि तो एकटक बघणारा तरुण एकदम हलला. माझ्या काळजाचा ठोका चुकला. ही कसली बिलामत. मरतोय आता हा पुढे आला तर या विचाराने माझी बो बो बोबडी वळली. मी पळत निकेत होता तिथे पोचले आणि त्याला सांगितलं तर तो हसायला लागला. "अग, तो तिथे याच कामाला ठेवलाय." पण यावर विलासचाही विश्वास बसेना. "अरे, डोक्यातून केवढं रक्त येतय त्याच्या" असं म्हणतच तो परत डोकावून बघायला लागला तर तिथे कोणीच नव्हतं. मग निकेतने सांगितलेलं आठवलं त्या अंधा-या बोळकांडीत पाटीच लावलेली असते म्हणे. "Don't beat the ghosts. They are humans like you." कारण घाबरलेले लोक कधीकधी अंगावर आलेल्या भुतांना हातात असेल ते फ़ेकून मारतात.पहिला भीतीचा धक्का ओसरल्यावर माझ्या मनात आलं, कोणीतरी येणार आणि मी त्याला घाबरवणार या कामासाठी अंधारात वाट बघत नुसतं बसून रहायचं हे किती कंटाळवाणं होत असेल.&lt;br /&gt;स्ट्रिपवर आम्ही चार दिवस फ़िरत होतो. कारण मल्हाररावांच्या झोपण्याच्या, खाण्या पिण्याच्या वेळा आम्हाला जास्त महत्त्वाच्या वाटत होत्या. तिस-या आणि चौथ्या रात्री त्या झगझगाटाचा खरं तर कंटाळा आला. अगदी "तिथे निसर्ग म्हणजे अगदी कच-यासारखा पडलेला असतो" या धर्तीवर वैभव तिथे नुसतं कच-यासारखं पडलेलं असतं असं म्हणायची वेळ आली. पण तरीही एका हॉटेलवर मंद प्रकाशात उजळलेले ग्रीक पुतळे त्यांची सभा, हातात भाले घेऊन दक्ष असलेले रखवालदार आम्हाला त्या काळात घेऊन गेले. अखेरच्या दिवशी आम्ही मिराज हॉटेलच्याबाहेर असलेला वोल्कॅनोचा शो बघितला. तिथेही फ़ूटपाथवर लोक आधीपासूनच जागा धरून होते. मोठे मोठे खडक कौशल्याने मांडून एक छोटासा डोंगर तयार केलेला होता. त्यावरून झुळूझुळू पाणी वहात होतं. आजूबाजूला हिरवीगार झाडं होती. शो बरोबर ८ वाजता सुरु होणार होता. आणि बरोबर आठ वाजता स्फ़ोटासारखे प्रचंड मोठे आवाज यायला लागले. एकाएकी डोंगराआडून लाल पिवळा प्रकाश दिसायला लागला. आणि पुढची दहा मिनिटं हळूहळू संपूर्ण डोंगरच पेटत गेला. आकाशात उंचच उंच लाव्हा उसळायला लागला. डोंगराच्या कपारीतून पिवळ्या प्रकाशाच्या शलाका डोकावायला लागल्या. इतकच नाही तर डोंगराच्या जवळच्या परिसरात पाण्यात पिवळ्या आगीचा लोळ उसळायला लागला. लाल पिवळया प्रकाशाच्या त्या नर्तनाकडे पहात असतानाच हळूहळू आग कमी होऊ लागली. आणि पेटलेला डोंगर शांत झाला. परत झुळूझुळू पाणी वहायला लागलं. थोड्या वेळापूर्वीच्या तांडवाचा मागमूसही उरला नाही. पहिल्या दिवशी जलाचं शांतवणारं नर्तन पाहिलं तर शेवटच्या दिवशी संहाराचं आगीचं नर्तन पाहिलं. दोन्हीही खिळवून ठेवणारं. &lt;br /&gt;स्ट्रिप सोडल्यास इथे बाकीच्या शहरात एक आरामदायी वातावरण आहे.इतर शहरात असतं तसच कुटुंबवत्सल.  सुंदर सुंदर बंगले किंवा अपार्टमेंटस. मोठ मोठी ऑफ़िसेस. गंमत म्हणजे जागेची विपुलता असल्याने बहुतांश ऑफ़िसेस आडवी वाढलेली. रस्त्यावर फ़ुलांची सुंदर सजावट. पण वाळवंट असल्याने घनदाट झाडीचा अभाव. आम्ही गेलो त्यावेळी मंदीचा प्रभाव इथेही दिसला. ब-याच इमारतीवर "विकणे आहे" किंवा "भाड्याने देणे आहे" च्या पाट्या लटकलेल्या होत्या. कुठल्याशा कॅसिनोतले १२०० कर्मचारी काढले. कुठलासा कॅसिनो पूर्ण बंद पडला असं ऐकण्यात येत होतं.रस्त्यावर मळलेले कपडे घातलेले भकास चेह-याचे पुरुष हातात पाटी धरून चालताना दिसत होते. नोकरी गेल्यामुळे दोन मुलं आणि बायको यांना पोसू शकत नाही अशी पाटी घेऊन चालणारा भकास चेह-याचा एक तरुण अजूनही माझ्या चेह-यापुढून हलत नाही. हे शहर पर्यटनासाठी प्रसिध्द आहे. इथे या कॅसिनोत जुगार खेळून जीव रमवा आणि आम्हाला प्रचंड पैसा कमवून द्या. त्यासाठी आम्ही तुम्हाला ऐषोआराम मिळवून देऊ. एखादी थीम जुनी झाली म्हणून काही वर्षांनी संपूर्ण कॅसिनो पाडून नवीन थीम घेऊन पहिल्यापेक्षाही भव्य कॅसिनो बांधू, पण माणसांसाठी आमच्याकडे वेळ नाही. इथे जाहिरातींचे फ़लक हातात घेऊन भर उन्हात चौका चौकात माणसं उभी असलेली दिसतात. कारण कुठेही फ़लक लावून शहराच्या सौंदर्यात बाधा आणून पर्यटकांना नाराज करणं आम्हाला परवडणारं नसतं. सॅनहोसे-सॅनफ़्रान्सिस्कोमध्ये कुठल्याही मोठ्या मॉलमध्ये गेलं की लहान बाळाला पाजण्यासाठी किंवा त्याचे डायपर बदलण्यासाठी एक फ़ॅमिलीरुम असते. पण अशी रुम कुठल्याही मॅलमध्ये सोडाच पण विमानतळावरही नाही. याचं कारण असं सांगितलं जातं की १८ वर्षाखालील मुलांनी इथे येणं अपेक्षितच नाही. आणि बाळाची भूक काय तुम्ही बाटलीने भागवू शकता, जी तुम्ही कुठेही देऊ शकता. वारे वा, उध्दवा अजब तुझे सरकार. वेगासने निघताना तिथल्या अनेक आनंददायी, सुखकारक क्षणांबरोबरच ही काही प्रश्नचिन्हं माझ्या मनात उमटवली खरी! निकेत स्वानंदीचे डोळे मात्र भरून आले होते आणि डोळे पुटपुटत होते, Vegas we will be back again ! कारण त्यांच्या तिथल्या वास्तव्याला केवळ स्ट्रिपचं आकर्षण नव्हतं तर त्यांनी अनुभवलेला, आपलेपणाचा सुगंधही होता, त्यांनी मनात जपलेला, रेशमी कपड्यात ठेवलेल्या केवड्याच्या पानासारखा.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-3217672106696541785?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/3217672106696541785/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=3217672106696541785' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/3217672106696541785'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/3217672106696541785'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2009/11/blog-post_24.html' title='दुनिया रंगरंगीली'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-6465813475903939603</id><published>2009-11-21T19:26:00.000-08:00</published><updated>2009-11-25T09:14:00.544-08:00</updated><title type='text'>लास वेगास ---- प्रथम दर्शन !</title><content type='html'>सॅनफ़्रान्सिस्कोपासून, म्हणजे सॅनहोजेहून लास वेगास, इकडचा उच्चार वेगस, विमानाने सारं मिळून दीड तासाचं अंतर बसल्यावर बेल्ट बांधा ही घोषणा कानात शिरेपर्यंत उतरायच्यावेळचे बेल्ट बांधायची वेळ येते. विमान जसजसं खालच्या दिशेने सरकायला लागलं तसं तसे निकेत आणि स्वानंदीचे चेहरे उजळायला लागले. गेली ३ वर्षं ते वेगासलाच होते, एका सुंदर नात्याची वीण त्यांनी इथे विणली होती. म्हणजे त्यांच्या परस्पर नात्याचीच नव्हे तर मैत्रीचा एक सुंदर गोफ़ त्यांनी एथे विणला होता. अनेक मित्र , मैत्रिणी जोडल्या होत्या, अनेक सुंदर क्षण त्यांच्या डोळ्यात मला तरारलेल्या पाण्याच्या आड मला दिसले. अनेक जुन्या खुणा ते शोधत होते,नवीन बांधकामं पाहून आनंदाने त्या बांधकामाची सुरवात आठवत होते. मला मात्र जमीन जवळ येता येता एक अतिशय सुबक, आखीव रेखीव शहर दिसत होतं, मधूनच गोल्फ़ मैदानांच्या हिरव्या रंगाने सजलेलं.&lt;br /&gt;गाडी विमानतळावरून बाहेर पडता पडता काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटायला लागलं. सगळा परिसर मोकळा मोकळा वाटत होता. मग लक्षात आलं ते हे की इथे झाडांची गर्दी नाही. सगळी पामची झाडं किंवा खुरटी झुडपं. सॅनफ़्रान्सिस्कोसारख्या हिरव्यागार परिसरातून आल्यामुळे तर हे अधिकच जाणवलं. आणि जाता जाता एकदम जाणवलं तो म्हणजे वाहनांचा वेग. सगळ्या वातावरणात एक सुशेगातपणा भरून राहिला होता, आपल्या गोव्यासारखा.  रहदारी आरामात चालली होती. कोणालाच गडबड नव्हती. कारण ही एक रंगिली जागा आहे, मौजमजा करायची.सगळे ताण विसरून मदिरा आणि मदिराक्षींचा सहवास लुटायची. अर्थात इथे ही रंगीनमिजाज हवा फ़क्त पुरषांसाठीच आहे असं नाही, स्त्रियाही सगळ्या गोष्टी तितक्याच सहजतेने उपभोगू शकतात. म्हणजे पाहिलेल्या जाहिरातीत पोरी जशा आव्हान देत होत्या, तसेच तरुण पोरंही " निधड्या छातीने" उभी होती.&lt;br /&gt;या सगळ्या रंगीन हवेची झुळूक विमानतळावरच येत होती. विमानतळावर  आव्हानात्मक , चेतवणा-या जाहिराती रंगीत टीव्हीवर झळकत होत्या. आजूबाजूच्या गर्दीत एखादी का होईना, मदमस्त तरुणी गर्दीचं लक्ष वेधून घेत होती. माझं लक्ष मात्र वयामुळे असेल, पण विमानतळावरच दिसलेल्या तीन म्हाता-यांनी वेधून घेतलं. एक विमानतळावरच व्हिडिओ गेम्सच्या स्टॉलवर काम करत होती. दुसरा माणूस बसमध्ये काम करत होता, बॅगा वगैरे उचलून ठेवत होता.आणखी एक म्हातारी होती. तरुनपणी ते नक्कीच सुंदर दिसत असावी. पण तिचा झगझगीत मिनी स्कर्ट, उंच टाचेचे बूट, चेह-यावरचा मेकप बाजारु वाटत नसला तरी ती कुठे काम करत असेल ते सांगत होता. वाईट वाटलं मला,. तीनही व्यक्ती ६० ते ७० वर्ष वयाच्या होत्या.पोटासाठी त्यांना या वयातही काम करावं लागत होतं. कदाचित हीच या रंगीन दुनियेची काळी बाजू असावी.अर्थात वयाने पिकलेल्या माणसांनी अखेरपर्यंत काम करत राहणं हा अमेरिकन व्यक्तिस्वातंत्र्याचा एक साइड इफ़ेक्ट असावा. वयाच्या १६व्या वर्षी घर सोडून स्वतंत्र राहण्याच्या अट्टाहासापायी शिक्षण, नोकरी या रहाटगाडग्यात कितीतरीजण पिसले जात असतील दमछाक होऊन शिक्षण सोडून मिळेल ती नोकरी पटकावून जीवनाच्या प्रवाहात वहात जात असतील. मग त्यांची अखेर आणखी वेगळी कशी असणार? आपल्याकडे दारिद्र्य म्हणून आणि इथे  सुबत्तेचा महापूर म्हणून पण परिणाम एकच.&lt;br /&gt;हॉटेलवर जाता जाता या नगरीच्या प्रथम दर्शनाने मला थोडसं अंतर्मुख केलं खरं!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-6465813475903939603?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/6465813475903939603/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=6465813475903939603' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/6465813475903939603'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/6465813475903939603'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2009/11/blog-post_21.html' title='लास वेगास ---- प्रथम दर्शन !'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-8493352849283056482</id><published>2009-11-13T07:41:00.000-08:00</published><updated>2009-11-13T07:59:48.366-08:00</updated><title type='text'>पियर ३९</title><content type='html'>या रविवारी आम्ही पियर ३९ या ठिकाणी गेलो होतो. हे शिप यार्ड आहे. त्यातल्या ३९व्या गेटकडे वेगवेगळी दुकानं , गमतीचे खेळ जादूचे प्रयोग असले प्रकार असल्याने आम्ही तिकडे गेलो. अर्थातच रविवार असल्याने पार्किंगला जागा मिळवण्यासाठी कसरत करावी लागलीच. हल्ली कोणत्याही पर्यटनस्थळाकडे असतात तशी दुकानं, ( शिंपल्यांच्या वस्तू वगैरे विकणारी, शो पिसेसची) होती. एक नुसतं मोज्यांचं एक नुसतं टोप्यांचं. माशांचे प्रकार खिलवणारी.एका दुकानात शंख शिंपल्यापासून केलेल्या वस्तू होत्या. त्यात एकावर एक अशी मोठ्यापासून लहान अशी दहा कासवं ठेवलेली होती, शंखाची. आपण पेपरवेट म्हणून ठेवतो तसे शंख एका बाजूला कापून तिथे स्प्रिंग बसवलेली होती. तिला कवडी लावून त्यावर मणी चिकटवून डोळे केले होते. आणि  मोठ्या कासवावर छोटं कासव बसवलं होतं. जरा हात लावला की कासवं मान हलवायला लागायची. मोहमयी वस्तू होत्या, पण आमचा ५०चा पाढा चांगलाच पाठ असल्याने नयनसुख की काय म्हणतात ते भरपूर घेतलं.असो. एक मोत्यांचं दुकान होतं. तिथे शिंपले ठेवलेले होते( पाण्यात, एका भांड्यात). आपण चिमट्याने त्यातला एक शिंपला उचलायचाआणि वेगळ्या डिशमध्ये ठेवायचा. मग ज्याने उचलला त्याने शिंपला ठेवलेल्या डिशला हात लावायचा आणि अलोऊऊऊऊऊऊऊओहा( Aloha) असं म्हणायचं. आपल्याबरोबर तिथले लोकही म्हणतात आणि एक बाई घंटा बडवते. मग अगदी श्टाईलमध्ये ती बाई शिंपला सुरीने कापते. शिंपला उघडल्यावर आत मोती सापडला तर तो आपला. ( अर्थात pearl farming असल्याने तो सापडतोच.)मला गुलाबी छटा असलेला मिळाला आणि स्वानंदीला क्रीम कलरचा. दोन सारखे हवे असतील तर बदलून मिळतात, पण मग त्यांच्याकडच्या दागिन्यात तो बसवून घेतला तरच. अशी ती मीठी छुरी असते. पण ते ड्राम्यॅटायझेशन इतकं भारी असतं की आपण क्षणभर हवाई बेटावर जातो आणि पैसे वसूल होतात.&lt;br /&gt;तिथून पुढचा गाळा मिठाचा. दिवाळीच्या रंगीत रांगोळ्यांचे ढीग ठेवल्यासारखे मिठाचे ढीग होते आणि ते वेगवेगळ्या सुगंधाचे होते ( असं त्यावरच्या पेट्यांवर लिहिलेलं होतं) हे Hand made मीठ होतं आणि ते पाण्यात टाकून ( म्हणजे टबमध्ये , बादलीत) टाकून अंगावर घेतल्यास अंग दुखत असल्यास बरं वाटतं.अंग  हलकं होतं असं मला सांगितलं गेलं.. मला सगळ्याला उदबत्तीच्या दुकानात गेल्यावर एक उग्र वास येतो तसा येत होता. मग आम्ही तिथून एक बाटली विकत घेतली आणि अपल्याला हव्या त्या रंगाचं मीठ त्यात भरलं. त्या माणसाने बूच लावून " कसं गंडिवलं " असं मनातल्या मनात म्हणत बाटली दिली. पण अशा ठिकाणी आपण गंडण्याची मजा लुटायला तर जात असतो.&lt;br /&gt;सगळी दुकानं पालथी घालत आम्ही टोकाला पोचलो. तिथून समुद्र पाऊलभर अंतरावर होता. अथांग पसरलेला समुद्र, त्यावरून जाणा-या बोटी, फ़ेरी बोट्स मधूनच  डोकं वर काढून सुळकांडी मारणारे सी लायन्स, तरंगणारी छोटी बदकं, आकाशातून पंख पसरून उडत असतानाच पाण्यात सूर मारणारे पक्षी आणि आजूबाजूला असणारी गर्दी. अशा ठिकाणी आपल्याला समुद्र जिवलगासारखा भेटत नाही. लग्नसमारंभात भेटलेल्या बालमैत्रिणीसारखा वाटतो . भेट तर होते पण पोटभर गप्पा होत नाहीत.&lt;br /&gt;याठिकाणी सी लायन्सच्या झुंडी बघायला मिळाल्या.तिथे सी लायन्सचं अभयारण्य आहे. म्हणजे त्यांच्याबद्दल माहिती दिली जाते.त्यांचं संवर्धन केलं जाते. कदाचित एक एकटे भेटले असते तर मजा वाटते पण  ते समुद्रात स्टॅंडवर पसरलेले मासाचे लडदू आणि त्यांचा तो आवाज, वास. ५ मिनिटातच तिथून निघाले मी.&lt;br /&gt;एवढं सगळं होईतो ५ वाजून अंधार पडला होता. समुद्रकिनारी येऊन परमेश्वराच्या आद्य अवताराला भेटल्याशिवाय निघणं शक्यच नव्हतं. तिथे एक हॉटेल होतं. त्याचं नाव बुब्बा गम्प्स. Forest Gump नावाच्या सिनेमावरून प्रेरणा घेऊन Bubba Gump shrimps  नावाची हॉटेल्सची चेन अमेरिकेत प्रसिध्द आहे. आम्ही गेलेल्या हॉटेलमध्ये त्या सिनेमासारखंच वातावरण निर्माण केलेलं होतं. Tom Hanks या सिनेमाचा हिरो आहे .त्याचं सिनेमातलं नाव Forest Gump. तो डोक्याने अधू असतो आणि ज्या गोष्टी करतो त्यात प्रथम स्थानावर असतो. मी हा सिनेमा निकेतबरोबर टी.व्ही वर पुण्यात बघितला होता, खूप वर्षांपूर्वी. माझ्या मते या सिनेमात त्यांनी कमर्शियल सिनेमाच्या हिरोची खिल्ली उडवली आहे. त्या सिनेमातले प्रसंग, वाक्य हॉटेलात  लावलेले आहेत. टेबलावर त्या सिनेमात वापरलेल्या वस्तूंसारख्या वस्तू ठेवलेल्या आहेत. आमच्या टेबलावर टेबल टेनिसच्या रॅकेटस साखळीने बांधून ठेवलेल्या होत्याआणि त्यावर ड्रिंक्सचं मेन्यु कार्ड होतं. त्या सिनेमात हिरो टे. टे. खेळतो. आम्ही आत गेल्यावर रिसेप्शनिस्टने निकेतला एका रिकाम्या टेबलाकडे बोट दाखवून साम्गितलं, "Run Forest to that point".सिनेमातला फ़ॉरेस्ट हा नायक पळण्याच्या शर्यतीत पळतही असतो आणि पहिला येतो. आमची वेट्रेस मागवलेले खाद्यपदार्थ ( म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराने तळलेली कोलंबी) येईपर्यंत निकेतशी त्या सिनेमातल्या माहितीवरून क्विझ खेळत होती. अगदी हसतमुख होती. कुठे वेटर्स आलेल्यांशी चेष्टामस्करी करत होते. कुठे वाढदिवस असलेल्या मुलीसाठी गाणी म्हणत होते. एकंदर तिथे बहुतेक तरुण मंडळी होती आणि मस्त गप्पा गोष्टी करत होती. मस्त महोल तयार झाला होता. सगळं हॉटेल लाकडी , वेगवेगळ्या, पातळ्यांवर टेबल्स मांडलेली होती. काचेच्या खिडक्या त्यातून दिसणारा समुद्र, आणि लांबवर गेलेली ब्रिजवरची दिव्यांची माळ आणि चमचमणारे सॅनफ़्रॅन्सिस्कोचे दिवे. आणखी एक तरल संध्याकाळ. लक्षात रहावी अशी!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-8493352849283056482?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/8493352849283056482/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=8493352849283056482' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/8493352849283056482'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/8493352849283056482'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2009/11/blog-post.html' title='पियर ३९'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-4789680398179698917</id><published>2009-10-29T15:21:00.000-07:00</published><updated>2009-10-29T17:13:47.304-07:00</updated><title type='text'>मिस्ट्री स्पॉट</title><content type='html'>पुन्हा एकदा बिग बेसिनचा रस्ता. झाडीने आच्छादलेला, मधून मधून सूर्यप्रकाशाला अटकाव करणारा. शांततेची दुलई पांघरलेला. वळणा वळणाचा. पण यावेळी फरक एवढाच होता की आठ मैल हेअरपिन नव्हती तर अडीच मैलावर एका मस्त वळणानंतर आम्ही मिस्ट्री स्पॉटच्या रस्त्याला लागलो. मी आणि विलासने मारे स्वेटर वगैरे घातले होते, पण लहान लहान मुलं आणि त्यांचे मोठे मोठे आई वडील छोट्या छोट्या कपड्यात होते.&lt;br /&gt;मिस्ट्री स्पॉट हा सॅंताक्रुजजवळच्या रेडवुडचा एक भाग आहे. त्यामुळे निकेतच्या घरापासून तीन तासात आम्ही तिथे जाऊन , पाहून आणि खाऊन परतलो.हे अमेरिकन लोक व्यापारात किंवा प्रेझेंटेशनमध्ये एकदम माहीर. आत प्रवेश करण्याचा आणि बाहेर पडण्याचा रस्ता दुभागला होता मोठ्या झाडांनी. त्यामुळे गाडीचं लायसन्स काढताना आठचा आकडा काढताना कसं वाटत असेल ते कळलं. ( मला गाडी चालवायला येत नसल्यामुळे लायसन्सचा प्रश्नच नाही.)आत प्रवेश केल्यावर गाड्या लावायला प्रशस्त जागा. आणि एका झाडाच्या बुंध्यावरच तिकिट खिडकी, कॅंटीन, रेस्टरूम या सर्वांची जागा बाणांनी दाखवली होती. आम्ही तिकीट काढून वाट बघत बसलो. आमची १७ वी टूर होती. तेव्हा दुपारचा १ वाजला होता आणि संध्याकाळपर्यंत हे चालू रहाणार होतं.आम्ही जिथे बसलो होतो तिथे इतकी सुंदर फुलं बघायला मिळाली! दोन रंगातली ती नाजूक फुलं बघेपर्यंत आमच्या टूरची घोषणा झाली. निकेत बरोबर असल्याचा फायदा व्हायचा तो असा. कारण आमच्या पिढीतले आई बाप आईच्या भाषेत शिकलेले असल्यामुळे अमेरिकन उच्चारातलं इंग्लिश आमच्या हिंग्लीश कानांना समजेपर्यंत निम्मी टूर संपली असती.सगळा घोळका जमल्यावर आमच्या गाईड पोरीने जमिनीची लेव्हल दाखवणारी पट्टी काढून जमिनीवर ठेवून जमीन लेव्हलमध्ये असल्याचं दाखवलं आणि तिथे दोन सारख्या उंचीच्या व्यक्तींना उभं केलं. त्या म्हणजे मी आणि दुसरी एक भारतीय बाई ( आणि ती चक्क मराठी बोलणारी निघाली).मग आम्ही जागा बदलली तर बघ्यांना आमच्या उंचीत फरक भासला . त्यावर ती मुलगी म्हणाली की म्हणून पट्टीच्या या बाजूला उभं रहाण्याचे ५ डॉलर्स आहेत. ( लोक हसले म्हणून मी लेकाला कारण विचारलं तर त्याने सांगितलं.मलाआपल्याला समजलं नाही म्हणून  त्यात लाजण्यासारखं काही वाटलं नाही. कारण थोड्या वेळाने त्या मुलीने दोन वेगवेगळ्या उंचीच्या व्यक्तींना बोलावलं तेव्हा माझ्या मागचा माणूस ( तोही भारतीय होता साऊथकडचा) आपल्या बायकोला सांगत होता की वेगवेगवेगळ्या वयाची माणसं बोलावताहेत म्हणून आणि त्याच्या मुलाने गडबडीने त्याला दुरुस्त केलं आप्पा, not age, heightम्हणून. म्हणजे त्यालाही इंग्लीश येत होतच की. तेव्हा होता है, उसमे क्या. मी तर अशा ठिकाणी आपलं वय ५ वर्षं आहे असं मानूनच जाते आणि मस्त एन्जॉय करते.उगीच आमचे केस काय उन्हाने पांढरे झालेत का? असं म्हणण्यात काय अर्थ आहे? उच्चाराच्या बाबतीत तर मी लग्न कोल्हापूरहून होऊन नगर जिल्ह्यात गेल्यानंतर आमचा घरगडी जे काही बोलायचा ते कळायला मला दोन महिने लागले होते. तो म्हणायचा, " मी वजेवजे उजुक जाऊन येतो. ( मी हळूहळू परत जाऊन येतो). मी आपली , बावळटासारखं तोंड करून सासूबाईंकडे बघायची.&lt;br /&gt;वळणावळणाच्या रस्त्याने आम्ही वर गेलो. पाय भरून आले पण मजा वाटत होती. कारण वातावरण निर्मिती मस्त केली होती. वर एक लाकडाचं तिरकं घर होतं. आत आपण सरळ चालूच शकत नाही.सगळे आपले बुध्दीबळातल्या  उंटाची चाल चालतात. घरात नकली जळमटं करून घर भुताटकीचं करण्याचा प्रयत्न केला होता.त्या ठिकाणी सरळ ठेवलेल्या फळीवरून चेंडू एका बाजूला घरंगळतो, पाणीही उतार असल्यासारखं एका बाजूला सांडतं. लोखंडाचा टांगलेला गोळा एका बाजूलाच ढकलता येतो.घराबाहेर एका ओंडक्यावर वेगवेगळ्या उंचीची माणसं जागा बदलली की एकाच उंचीची किंवा उंच माणूस बुटका आणि बुटका माणूस उंच दिसतो.( तिथल्या झाडांनाही एकाच बाजूला फांद्या होत्या.)लहान मुलं जास्त एन्जॉय करत होती. तरुण मुलं माफक हसत मजा लुटत होती. आमच्या पिढीची माणसं, जी थोडीच होती, ती, नको रे बाबा डोकं गरगरेल, पडलं तर हाड मोडेल या भीतीने भिंतीला धरून धरून काठावरून मजा लुटत होती.डोकं गरगरलं हे खरं, पण पडायला काही झालं नाही. कारण हात धरून संभाळून नेणारा होता ना बरोबर. &lt;br /&gt;घरी आल्यानंतर नेटवर या चमत्काराबद्दल वाचायला सुरवात केली तर आपण गंडलो की काय असं वाटावं इतक्या टोकाची मतं वाचायला मिळाली. कोणी म्हणे ही सगळी धूळफेक आहे. टेकडीवर घर असल्यामुळे घरच तिरकं बांधलय. कोणी शास्त्रीय उदाहरणं देऊन त्यातला फोलपणा सिध्द केलेला होता तर कोणी आपला अनुभव सांगून त्याचं समर्थन केलं होतं. मला इतकच वा्टतं होतं की ५ डॉलरमध्ये परत लहान होऊन जादूई नगरीत जायला मिळत असेल तर काय हरकत आहे?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-4789680398179698917?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/4789680398179698917/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=4789680398179698917' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/4789680398179698917'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/4789680398179698917'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2009/10/blog-post_29.html' title='मिस्ट्री स्पॉट'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-7189289040209797096</id><published>2009-10-18T08:07:00.000-07:00</published><updated>2009-10-18T09:25:13.449-07:00</updated><title type='text'>भाऊबीज</title><content type='html'>लहानपणी चांदोबात एक लोककथा वाचली होती. एका आदिवासी स्त्रीचा नवरा, मुलगा आणि भाऊ युध्दात मारले जातात. सर्वत्र पडलेल्या शवांच्या गर्दीत तिला आपली माणसं ओळखू येत नाहीत. ती देवाची करुणा भाकते. देव प्रसन्न होऊन तिला वर देतो की, तुला हवा असेल तो नातेवाईक मी जिवंत करून देतो. सगळेच जवळचे असल्याने ती स्त्री विचारात पडते. पण निर्धाराने देवाला सांगते की, माझ्या भावाला जिवंत कर. देव कारण विचारतो , तर ती सांगते, " नवरा परत मिळेल कारण मी परत लग्न करेन. त्यामुळे मला मुलगाही मिळेल. पण भाऊ परत मिळणार नाही." त्या लहान वयात हे विधान धक्कादायक वाटलं. पण आता विचार केल्यावर जाणवतं ते हे की आदिवासी स्त्री असल्यामुळे ती निसर्गाच्या अधिक जवळ होती. त्यांचे नियम हे वास्तवाला धरून होते. एक नवरा मेल्यावर दुसरा करणं हे त्यांच्यासाठी अगदी नैसर्गिक होतं. देव तिच्या चतुराईवर प्रसन्न होऊन सगळ्यांना जिवंत करतो हा भाग वेगळा.&lt;br /&gt;आज सकाळीच ही गोष्ट आठवायचं कारण म्हणजे, आज भारतात आणि उद्या अमेरिकेत भाऊबीज. लांब अंतरावर असलेल्या माझ्या भावांची सहज आठवण आली , जे आता सत्तरी ओलांडलेले आहेत , आणि त्यापाठोपाठ ही गोष्ट आठवली. या गोष्टीतला बाकीचा भाग वगळता भावाचं आपल्या आयुष्यातलं स्थान परत एकदा आतून जाणवलं.&lt;br /&gt;सहोदर. एकाच आईच्या उदरात वाढलेले, एकाच आईशी नाळेने बांधलेले , तिचं रक्त आपल्या धमन्यातून वाहून नेणारे जीव ते सहोदर. त्यांनी तिच्या रक्तातले कोणते गुण- दोष घेतले यावर त्यांच्यातली जवळीक वाढत जाते. माझ्याबाबतीत हा प्रश्नच आला नाही. कारण सगळ्यात मोठा भाऊ १७ वर्षांनी मोठा  दुसरा पंधरा वर्षांनी तर तिसरा आठ वर्षांनी. पहिल्या दोघांच्या विद्वत्तेच्या दबावाखाली आम्ही धकटे दोघे दबून. निदान मी तरी. त्यामुळे भावा बहिणीची भांडणं, मारामारी हे सूख मला कधी मिळालच नाही. कारण हे दोघे नेहमी जाड्या जाड्या पुस्तकांच्या गराड्यात. पण त्यामुळे एक झालं की लहानपणापासूनच पुस्तक ही मोठी जादूभरी गोष्ट आहे हे कळलं. त्यातही आम्ही वाचणार म्हणजे fiction. जे आप्पाला वाटायचं बांडगूळ. काहीतरी. शास्त्रीय माहिती वाचावी, मुळात गादीवर पालथं पडून वाचू नये यासाठी मी लहानपणी त्याच्या कितीदातरी शिव्या खालेल्या आहेत. ( आता शिव्या म्हणजे जास्तीजास्त " मूर्ख". कारण वरच्या दोघांनी कधी च्यायला किंवा साल्या इतके साधे शब्दही उच्चारलेले मी आजतागायत ऐकले नाहीत. तो मान माझा आणि भैय्याचा).सगळ्यात मोठा बाबा तर माझा गुरु. कारण कॉलेजात आम्हाला शिकवायला तो होता. ( त्यामुळे त्याच्या तासाला (attendance compulsary). त्यामुळे मारामारी झालीच तर थोडीशी भैय्याशी ज्याचं पर्यवसान नेहमी भैय्याला बोलणी किंवा मार बसण्यात व्हायचं .कारण तीनही भावात मी एकटी, सगळ्यात लहान. यांनी त्यांच्या रडक्या बहिणीला शांत करण्यासाठी किती तरी वेळ फ़िरवलं आहे.उत्तमोत्तम सिनेमे दाखवले आहेत, स्वत: वाचून चांगलं साहित्य वाचायची सवय लावली आहे. ( आज सांगायला हरकत नाही, की, जे वाचायला निषिध्द होतं ते मी त्यांच्या अपरोक्ष गुपगूप वाचून काढलं होतं)त्यामुळे निकेत चैत्रा म्हणतात तसं " आई, तू कोल्हापूरला असलीस की मामा लोक जितक्या खुषीत येऊन जोक मारतात तितके आम्ही तुझ्याविना गेलो की मारत नाहीत. आता याला काही सयुक्तिक अर्थ आहे का? "खरच नाही . पण काय करणार? सहोदर हेच त्यामागचं कारण.&lt;br /&gt;आज हे सगळं आठवायचं कारण, केवळ दूरच्या देशात मी आहे हेच. कारण गेल्या ३५ वर्षात लग्न झाल्यापासून मी त्यांना दोन तीनदाच ओवाळलं असेल. कारण घरची लक्ष्मी दिवाळीतपूजनाला घरीच असली पाहिजे हा सासरचा नियम. आणि आता मी या वयाला येऊन पोचले आहे की, हे बाह्य उपचार माझ्यासाठी अगदी गौण आहेत. पण आजच्या दिवशी माझ्या भावांना मला सांगावसं वाटतं, की तुम्ही मला वडिलांची माया दिलीत आणि भावाचं प्रेमही. माझं आयुष्य तुमच्यामुळे समृध्द झालं . तुम्ही माझ्यासाठी आहात, " द्रौपदीसी बंधु शोभे नारायण " असे!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-7189289040209797096?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/7189289040209797096/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=7189289040209797096' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/7189289040209797096'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/7189289040209797096'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2009/10/blog-post_18.html' title='भाऊबीज'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-4680664306851783877</id><published>2009-10-15T16:32:00.000-07:00</published><updated>2009-10-15T18:45:34.470-07:00</updated><title type='text'>हॅलोविन</title><content type='html'>कुपरटिनोला येऊन दोन दिवस झाले होते आणि मी " अय्या, किती छान, किती वेगळं " या मूडमध्ये असल्याने पानांचे आकार, फ़ुलांचे रंग, माणसं, रहदारीचे नियम, फ़ूटपाथ सगळं सगळं मला म्हणजे देवाच्या बागेत फिरणा-या ईव्ह इतकच नवं नवं होतं.त्यामुळे काही खरेदीसाठी एका मॉलमध्ये शिरताना दारात, शेल्व्हजवर सगळीकडे भोपळेच भोपळे दिसल्यावर मी स्वानंदीला विचारलं, " बाई ग, म्हातारी भोपळ्यात बसून लेकीकडे गेली ही आपली गोष्ट इकडे माहीत आहे का? " सासूने केलेल्या इनोदावर जेवढा प्रतिसाद देता येईल तितका देऊन तिने नम्रपणे सांगितलं, " काकू, आता हॅलोविन आहे ना, त्याची तयारी म्हणून हे भोपळे आहेत."&lt;br /&gt;आत गेल्यावर भोपळ्यांच्या जोडीला वाळलेल्या पाचटाच्या मोठ मोठ्या जुडग्या उभ्या केल्या होत्या शिवाय " Happy Harvest " अशा पाट्याही विकायला होत्या.हा सण म्हणजे सुगी झाल्यानंतरचा सण असावा असं म्हणून मी मॉलमध्ये हिंडायला लागले. तर एका शेल्फ़वर कवट्या, हाडं, कोळ्याची जाळी, सुनसान बंगलीसारखी बंगली असलं काय काय विकायला ठेवलेलं दिसलं " आता काय करु या कर्माला " असं मनात मी म्हणतेय तर माझ्यामागून अमेरिकन ऍक्सेंटमध्ये कोणीतरी काहीतरी बोलायला लागलं . कोण बोलतय म्हणून बघायला वळले तर बेशुध्द पडायचीच राहिले. कारण माझ्यामागे एक सहा फ़ुटी भूत, काळ्या वेषात, दात विचकून, आपले लाल लाल डोळे रोखून बोलत होतं. चालता चालता माझाच धक्का लागून तो सांगाडा बोलायला लागला होता. आणि तो सांगाडा कवट्या सगळं हॅलोविनसाठीच होतं.&lt;br /&gt;म्हणजे हॅलोविन हा सण सुगीचा सण आहे की भुताखेतांचा. काही समजेना.कारण इकडे निकेत स्वानंदी मल्हारसाठी हॅलोविनचे ड्रेस बघत होते ते किती छान होते. अगदी नवजात बाळापासून ते अगदी मोठ्या माणसांपर्यंतचे पोषाख दुकाना दुकानातून दिमाखाने झळकत होते. आणि हे कवट्या बिवट्या म्हणजे अगदीच कसंतरी वाटत होतं. अखेर आपल्या पितरपाठासारखं गेलेल्या लोकांसाठीचा दिवस असावा अशी मनाची समजूत घातली आणि मॉलमधून बाहेर पडले.&lt;br /&gt; मल्हारसाठी ऑन लाइन बघितलेल्या केळं, वाटाणा, अळी, फ़ुलपाखरु, माकड, अस्वल अशा अनेकानेक पोषाखातून अखेर भोपळ्याची निवड झाली आणि आम्ही प्रत्यक्ष खरेदीसाठी " Babies r us" नावाच्या दुकानात जायला निघालो. त्याआधी एक हॅलोविन नावाच्या दुकानात कदाचित अधिक व्हरायटी मिळेल असं वाटल्याने तिकडे वळलो. दाराशी गेल्यावरच आत जावं की नाही असं वाटावं असा प्रकार होता. आत सगळं धुरकट वातावरण होतं. बाळ आणि त्याचे आई वडील आत शिरल्यामुळे मीही धीर  एकवटून आत शिरले. म्हटलं कसल्या दुकानात आलो आपण . सगळीकडे धूर सोडून वातावरण निर्मिती केली होती. भुतांचे मोठ मोठे सांगाडे सगळीकडे उभे. कोयता, सुरा, चक्क त्रिशूळ, तलवार आणि जी जी म्हणून शस्त्र असतील ती विकण्यासाठी ठेवलेली होती.त्यावर रक्त सांडलेलं होत. जोडीला भूतबंगले होतेच. त्यातला हिडीस भाग असा की छोटी छोटी रांगती बाळं केली होती आणि  त्यांची तोंडं रक्ताने बरबटलेली होती. म्हणजे तशी रंगवलेली होती. जमिनीवर रिमोट होते .त्यावर पाय दाबला की एखादं भूत कबरीतून खदखद हसत उठत होतं तर कोणी दात विचकत होतं.सुन्न होऊन आम्ही दुकानाच्या बाहेर पडलो. प्रत्येकाच्या चेह-यावर हाच भाव होता  की आधी कल्पना असती तर या दुकानात गेलोच नसतो.मी घरी येताच रामरक्षा म्हणून मल्हारला देवापुढचा अंगारा लावला.&lt;br /&gt;या सगळ्या प्रकाराने माझी उत्सुकता चाळवली आणि मी जाळं उघडलं त्यात मला मिळालेली माहिती अशी की, celtic ही जमात ३०० देवांची पूजा करायची, पण त्यांचा मुख्य देव सूर्य होता. त्यामुळे सूर्य प्रभावशाली असताना Beltane सण आणि सूर्यावर मात करणा-या Samhain  या म्रुत्युदेवतेचा सण असे त्यांचे दोन मुख्य सण असत. या जमातीचा भुता खेतांवर विश्वास होता.Samhain हा देव आदल्या वर्षी मरण पावलेल्या evil spirits ना आपल्या घरी भेट द्यायला पाठवतो अशी समजूत असल्याने  भुतांना प्रसन्न करण्यासाठी खेड्यात घराबाहेर खाणं ठेवलं जाऊ लागलं आजच्या Trick or Treat चं मूळ त्यात असावं किंवा भुतांना घाबरवण्यासाठी त्यांच्यासारखाच पोषाख केला की भुतांपासून सुटका होईल अशीही एक समजूत. पण नंतर रोमन व ख्रिश्चन लोकांच्या संपर्काने यात खूप बदल झाले आणि हा दिवस सुगीचा सण म्हणूनही साजरा केला जाऊ लागला. &lt;br /&gt;गेला महिनाभर अनेक घरांच्याबाहेर भोपळे टांगून ठेवलेले दिसतात. भुतांच्या आकाराची बुजगावणी, पाचटाच्या पेंड्या बागेत दिसतात. आता ३१ तारखेला लहान मुलं वेगवेगळे पोषाख करूनलोकांच्या घराची दारं ठोठावतील आणि घरातल्या माणसांना घाबरवून त्यांच्याकडून कॅंडीज उकळतील.मोठी मुलं भीतिपट बघतील. मोठी माणसं , मुलं पार्ट्या करून आपली पार्टी जास्स्तीजास्त भीतिदायक कशी होईल याची आखणी करतील.&lt;br /&gt;मला हे सगळं बघितल्यावर असं वाटलं की आपल्या आणि पाश्चिमात्यांच्या आचारात जरी फ़रक असला तरी त्यात काही साम्यस्थळही आहेत. फ़रक असा की आपणही पितरपाठात गेलेल्या माणसांच्या नावाने जेवण घालतो, पण त्यात भीतीची, दुष्ट शक्ती ही भावना नसून त्यांची पुण्याई आपल्या पाठी असावी ही आदराची भावना असते. दुसरं असं की मी बघितलेल्या त्या भीतीदायक दुकानात ७ - ८ वर्षांची मुलं रिमोटवर उड्या मारून भुतांना कबरीतून बिनदिक्कत उठवत होती. ५ वर्षाची मुलगी आपल्याला कोणतं शस्त्र हवं ते निवडत होती. &lt;br /&gt;साम्य असं वाटलं की आपल्याकडेही पितरपाठात भोपळ्याला महत्त्व असतं आणि इथेही भोपळे टांगून ठेवलेले असतात. विचार केला की मानवी इतिहासाची मजा वाटते हे खरं!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-4680664306851783877?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/4680664306851783877/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=4680664306851783877' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/4680664306851783877'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/4680664306851783877'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2009/10/blog-post_15.html' title='हॅलोविन'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-4521861135062359084</id><published>2009-10-11T15:01:00.000-07:00</published><updated>2009-10-11T15:19:42.286-07:00</updated><title type='text'>आमचं मालक मल्हारराव</title><content type='html'>सकाळचे ७&lt;br /&gt;त्यांच्या खोलीचं दार उघडून निकेत डोकावतो. उकळी आलेल्या आधणात चहाची पावडर टाकता टाकता, मी: &lt;br /&gt;"काय रे झोपला का नीट?"&lt;br /&gt;यावर "हो, आज झोपला बाबा नीट. एकदाच उठला." किंवा "नाही ग, आज सारखा उठतच होता" शक्य तितक्या हळू दार लावत निकेत.&lt;br /&gt;आता पुढच्या सगळ्या क्रिया ’हळू’च करायच्या असतात. काही वेगाने व काही फ़ारच वेगाने . पण त्या वेळी आपोआपच उमगतील.&lt;br /&gt;यानंतर स्वानंदी बाहेर येतानाही  तोच सावधपणा तिच्या हालचालीत असेल.&lt;br /&gt;"काय उठले का महाशय?" जन्मभर विळीवर भाजी चिरलेली मी, सुरीने आवाज न करता भाजी चिरण्याचा प्रयत्न करत विचारते.&lt;br /&gt;"चुळबुळ चालली आहे, उठेलच एवढ्यात"&lt;br /&gt;असं जर उत्तर आलं तर "शस्त्र न धरि करी" म्हणत मी सुरी खाली ठेऊन तयारीत. निकेत ब्रेकफास्टचा घास गपकन गिळून अर्धा डोळा लॅपटॉपवर आणि अर्धा खोलीच्या दाराकडे. मॉर्निंगवॉक आटोपून आलेला विलास बुटाच्या लेसेस पटकन सोडण्यात मग्न, पण चेह-यावरचे उत्सुकतेचे भाव लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत. आणि केव्हातरी खोलीतून जोरात आवाज येतो की मग जो कोणी असेल तिथून सायरन वाजल्यावर शेल्टरकडे धावणा-यांच्या वेगाने खोलीकडे धावत सुटतो.&lt;br /&gt;"चिंगी, झिंगाणी" "शोनामोना" "बबिता" "गुनाश्का" असे सगळीकडून आवाज उठतात, मालक उठलेले असतात, त्यांना गुडमॉर्निंग करायला. "ए आज मी घेणार आहे, मला ऑफिस आहे". "ए नाही रे मी घरात असले म्हणून काय झालं मी पण माझ्या ऑफिसमध्येच असते." तेवढ्यात शोनामोनावाल्याने मालकांच्या पोटाला हात लावून संधी साधलेली असते, आणि गुनाश्कावाली तर अर्धवट उचलण्यात यशस्वी झालेली असते. पण आता दुसरं कोणी नको असतं, कारण आता मालकांच्या जेवणाची वेळ झालेली असते. मग ऑफिसवाले त्याला शांत करण्यासाठी जवळ घेतात. तोही क्षणभर त्याच्या खांद्यावर मान टेकवतो आणि परत आठवण झाल्यासारखी जोराने आपली मागणी पुढे चालू ठेवतो. नाईलाजाने इतर खोलीच्याबाहेर पडतात.&lt;br /&gt;दुपारचे ४&lt;br /&gt;मालक झोप काढून ताजे तवाने झालेले असतात.आता त्यांना घोडेसवारीची लहर आलेलीअसते. दोन घोडे पागेत त्याच कामासाठी तयार असतात.&lt;br /&gt;"हे बघ, दिवसभर तुझं काही ना काही चाललच असतं. तू बस आता जरा वाचत. मी फ़िरवतो."&lt;br /&gt;"ए बाबा, माझ्या दमण्याची एवढी तुला काळजी आहे ना, तर तू चहा ठेव, मी फ़िरवते.. घरात घरात कंटा्ळतो तो" अखेर चहा होईतो परत फ़िरायच्या बोलीवर घोडीला परवानगी मिळते.&lt;br /&gt;एका हातात मुटकुळं संभाळत जिना उतरायची सर्कस करत घोडी फूटपाथवर येते, जरा झाडं दाखवायला थांबते तर लगेच पोटावर एक चिमुकली लाथ. मग मात्र घोडी "घोडे जल्दी चलो, जल्दी चलो रे" च्या तालावर चालायला लागते. शिवाय वर घरात गेल्यावर चहा झालेला असणार  याचही तिला भान ठेवायला लागतच.&lt;br /&gt;संध्याकाळचे बाहेर जाणे &lt;br /&gt;सगळे कपडे करून तयार. &lt;br /&gt;चला, आता कार सीटमध्ये बसायचं. मनु आमचा कुथे जानाल? &lt;br /&gt;मनुला कल्पना असते की आता भूर्र्र जायचय. म्हणजे सरकत जाणारं काहीतरी दिसणार आणि आपण जरा जरी आवाज केला तरी सगळ्यांची तारांबळ उडणार.  तो आपला दोन्ही हाताने कथकली मुद्रा करून तोंडातून लाळेच्या फ़ेसाचे भले मोठे फ़ुगे काढण्यात मग्न.&lt;br /&gt;"अरे, मान धर," "अग, हात आला बघ अंगाखाली" अशा सूचनांच्या गदारोळात मालक स्थानापन्न होतात. मग महाराजांची पालखी मावळ्यांनी नेली नसेल इतक्या वेगाने बाबा कारसीट उचलून जिन्यावरून पळायला सुरवात करतो. त्याच्यामागून आई. खांद्यावर छोटी पिशवी. त्यात बर्पिंग क्लॉथ, सॅनिटायझर, शिवाय पॅसिफ़ायर. मागून आजी आबांना सांगत "आता बरं आहे नाही, नुसतं डायपर, तोंड पुसायचं फ़डकं, बोथी घेतली की झालं. आपल्यावेळी तो लंगोटांचा, दुपट्यांचा पसारा इतका की ते बाहेर जाणं नको आणि काही नको.त्यात तुम्हा पुरषांना त्यावेळी आपणही काही ओझं उचलावं हे भानच नसायचं. आपले छाती पुढे काढून पुढे चालणार. बायको आपली लोंबकाळतेय मागून पोरांचं आणि पिशवीचं ओझं संभाळत."आबाही इतक्या वर्षांच्या सहवासाने कान बंद करून ऐकायला शिकलेले असल्यामुळे चेह-यावर आजीसला पटेल इतकीच ओशाळगत आणून वाटेत असलेल्या सोसायटीच्या  पोहण्याच्या तलावातलं "निळशार पाणी" पहात चाललेले असतात.&lt;br /&gt;तोवर मालक कारमध्ये बसून दोन्ही हाताची बोटं एकदम कशी तोंडात घालता येतील याचा गंभीरपणे विचार करत असतात.&lt;br /&gt;"चला बबुजी आता निघायचं का?" गाडीवान विचारतो. बबुजींचा तोंडातल्या तोंडात गुरगुराट.&lt;br /&gt; "चल रे बाबा, लौकर. आपल्याला हॅलोविनचा द्लेश आनायच्या आहे ना?" किंवा "च्यला लवकल नाही तल आमी ललू हं" हा कारच्यामागच्या बाजूने प्रतिसाद मिळतो. कारण मालकांच्या सगळ्या लहरी संभाळून त्यांना शांत करायला आईच शेजारी हवी असते. शिवाय गाडीत मधेच मालकांना त्यांची जागा सोडून मांडीवर येता येता नसल्याने त्यांना आनंदी ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी आईवर असते. मग मालक कधी सम्पूर्ण प्रवासभर बाहेर बघतात, कधी १० मिनिटातच प-यांच्या राज्यात जातात, तर कधी मधेच ऐन रहदारीच्या रस्त्यावर गाडी  दणाणून टाकणारा आवाज करून सगळ्यांची घाबरगुंडी उडवून टाकतात. मग कधी हसत तर कधी दमून मंडळी परतात, पण मालकांची सकाळी हाक आली की सगळ्यात आधी आघाडी मारून मालकांना कसं उचलायचं याची मनोमनी आखणी करतच दुस-या दिवसाची वाट बघत झोपी जातात.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-4521861135062359084?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/4521861135062359084/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=4521861135062359084' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/4521861135062359084'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/4521861135062359084'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2009/10/blog-post_11.html' title='आमचं मालक मल्हारराव'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-6342665257028827517</id><published>2009-10-04T22:47:00.000-07:00</published><updated>2009-10-04T22:48:46.581-07:00</updated><title type='text'>आमचं फिरणं</title><content type='html'>निकेतच्या घराच्या भल्यामोठ्या खिडकीतून सुंदर झाडी दिसते. समोरच्या बाजूला एका कंपनीचं भलं मोठं आवार आहे, आणि तिथेही जागेच्या विपुलतेमुळे हिरवळ आणि भली मोठी झाडी आहे. अशा रस्त्यावरून फेरफटका मारायला कोणाला आवडणार नाही बरें?  त्यात आणखी चाकलेट, आइसक्रिम वगैरे मोहमयी वस्तूंच्या सहवासात असताना तर हे फ़िरणं एक कर्तव्यच ठरत नाही का आपलें? तर असो.&lt;br /&gt;तर सुप्रभाती म्हणजे सकाळी सात साडे सातच्या सुमारास मी आणि विलास घराबाहेर पडतो. जिना उतरून खाली आलं की थोडी बाग आहे. एक फ़ाटक आहे (ते आतल्या बाजूने तुम्ही उघडू शकता, पण बाहेरून आत येताना मात्र ठरलेले आकडे फ़िरवावे लागतात) ते उघडून बाहेर आलं की या कॉम्प्लेक्सचं आवार. डावीकडे वळून रस्त्याला लागा आणि परत डावीकडे वळून चालालला लागा, पण पदपथावरून. मग तुम्ही कुपरटिनो चौकात येता. त्या चौकात सिग्नल्स आहेत. पादचा-यांसाठी अणि वाहनधारकांसाठी. (हे म्हणजे जरा लईच हुतय.) त्या सिग्नल्सपर्यंत पोचायला एक २५ पावलांची जागा आहे. आपण त्या लेनमधून जात असताना डावीकडून जर एखादी गाडी आली तर तिचा मालक, "माझ्या अपराधाबद्दल क्षमा करा आणि रस्ता ओलांडा सरकार" असा चेहरा करून वाट बघत रहातो. थेट पुण्याहून आल्यामुळे तर हे सौजन्य फ़ारच जाणवतं. चौकात एक आपल्या कमरेच्या उंचीइतका खांब आहे आणि त्याला एक बटन आहे. ते दाबून आपण चौकात जरा निरिक्षण करत उभं रहायचं आपल्याला असं थांबून रहायची सवय नसल्याने प्रथम ऑकवर्ड आणि नंतर इरिटेटिंग वाटतं, पण मग सवय होते. ठराविक वेळाने समोरच्या बाजूचा लाल हात नाहिसा होऊन चालणारा पंढरा माणूस येतो की आपण पळा रे पळा म्हणोन चालायला सुरवात करायची. कारण आपल्या हातात (की पायात?) २० सेकंद असतात. तेवढ्यात आपण रस्ता ओलांडायचा असतो. ही पध्दत रहदारीच्याच चौकात असते असं नाही तर निर्मनुष्य चौकातही हा नियम पाळला जातो. हा चौक ओलांडला की आपण मोठ्या झाडांनी केलेल्या हिरव्यागार कमानीत येतो. उजव्या बाजूला नीट कापलेली हिरवळ, तिला लागून असलेली उंचच उंच झाडं, आणि डाव्या बाजूला वाहता रस्ता. त्यामुळे विलासचं तोंड डावीकडे तर मी उजवीकडे बघत. वाटेत दोन ठिकाणी बाक आहेत पण ते बसण्यासाठी नसून बसने जाणा-या लोकांसाठी आहेत. या बाकांची गंमत म्हणजे, त्यातल्या काही बाकावर लिहिलेलं असतं, "A seat in the past". आणि त्या बाकावर चित्रं रंगवलेली असतात जुन्या काळातली. एका बाकावर आहे, "J. W. Shaw Grocery Shop 1890" दुस-या एका बाकावर लिहिलय, "Red Star Laundry. 1860" तिस-याएका बाकावर लिहिलय, "A cable car in the street". वाचता वाचता माझ्याभोवतीची ती मोठी ऑफ़िसेस, त्या भरधाव धावणा-या गाड्या नाहिशाच झाल्या आणि जुन्या इंग्रजी सिनेमात बघितलेले स्त्री - पुरुष कोणी चालत, कोणी कोणी घोडागाडीतून तर कोणी केबलकारमधून जाताना दिसायला लागले. २०० वर्षांपूर्वी इथेही हिरवीगार शेतं असतील, स्वस्थ शांत ग्रामीण आयुष्य माणसं जगत असतील हे जाणवून वेगळंच वाटायला लागलं, म्हणजे आपल्या सेझ सारखं इथेही शहरीकरण होऊन ती माणसं नुकसानभरपाई घेऊन यंत्रांच्या घरघराटात हरवली हे जाणवून मन उदास झालं. मला तर त्या न बघितलेल्या जे. डब्लू शॉ चे वंशज कुठे काय करत असतील असं वाटून मन त्यांच्यासाठी क्षणभर हळवंही झालं, पण जुनं गेलं तरी जे काही नवं झालय, ते मनाला सुखवणारं गारवा देणारें आहे, हे नक्कीच. म्हणजे आपण "a m c" मॉलच्या बाजूने गेलो आणि तिथल्या पुलावर उभे राहिलो तर खालच्या फ़्री वे वरून जाणा-या गाड्यांचा वेग आपल्याच अंगातून निघाला आहे की काय असं वाटतं, पण त्याचबरोबर रस्त्याच्या दुभाजकावर लावलेले फ़ुलांचे ताटवे मनाला आल्हादही देतात. &lt;br /&gt;आम्ही चालत जातो तो रस्ता वुल्फ़ रोड आणि त्याच्या पुढच्या चौकात एक ली नावाचा डेंटिस्ट आहे. मी त्याच्या घरावर सोन्याची कौलं आहेत का ते रोज बघत असते. तिथून आम्ही परत उजवीकडे वळतो. आता रस्त्याच्या दुस-या बाजूला घरं आहेत, त्यांच्या आवारात फ़ुलझाडं आहेत. त्याला कुंपण नाही पण फ़ुलं सुखरुप असतात. एका घराबाहेरचा भलामोठा निवडुंग पूर्णपणे लाल फ़ुलांनी फ़ुललेला आहे. एका घराबाहेर वेगवेगळ्या गुलाबांची दाटी आहे. एका घराबाहेर माशाच्या आकाराचा कापडाचा, निळ्या गुलाबी रंगाचा आकाशदिवा टांगलेला आहे. एका घराबाहेर बोनसाय केल्यासारखी झाडं छाटली आहेत तर दुस-या घराबाहेर तसलीच झाडं भलं मोठं जात्याचं पाळं, अर्थात हिरवंगार, ठेवल्यासारखी छाटणी केली आहे. त्या रस्त्यावरच्या चौकात परत उजवीकडे वळलं की आम्ही मेमरी हॉस्पिटलच्या रस्त्याला लागतो. हा रस्ताही सुरेख आहे. तिथे चिंचेच्या आकाराची पानं आहेत आणि त्यांच्या टोकाला दवबिंदू लटकावेत तसे गोल आहेत. तिथून टोकाला जाऊन आम्ही परत फ़िरतो.&lt;br /&gt;या सगळ्या फ़िरण्यात आम्हाला फ़ूटपाथवर एक भलीमोठी म्हातारी आखूड स्कर्टमध्ये, एक सडपातळ मुलगा अर्धी चड्डी आणि हातकाप्या (स्लीव्हलेस) बनियनमध्ये आणि एक ठीकठाक माणूस त्याच्या कुत्र्यासह दिसतो. शिवाय एक काळा कावळा आणि दोन तितक्याच काळ्या खारीपण दिसतात या रस्त्यावर. नाहीतर हम और हमारी तनहाई, (जी आम्ही एन्जॉय करतो) अक्सर बातें करते है, तुम सब होते तो हम ऐसा करते, वैसा करते!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-6342665257028827517?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/6342665257028827517/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=6342665257028827517' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/6342665257028827517'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/6342665257028827517'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2009/10/blog-post_04.html' title='आमचं फिरणं'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-6652466880043934465</id><published>2009-10-03T12:05:00.000-07:00</published><updated>2009-10-03T21:57:19.898-07:00</updated><title type='text'>अजि म्या झाले आजी आज !</title><content type='html'>गाडी निकेतच्या घराच्या जवळ जवळ लागली तसं तसं मन आणखी आणखी उचंबळायला लागलं. अर्जुनाला जसा पोपटाचा डोळा तसं मला फ़क्त सावळे सुंदर रुप मनोहर दिसायला लागलं. मी आजी होऊनही आता दोन अडीच महिने झाले होते, पण अजून ते " फील" आललं नव्हतं. म्हणजे मी कसलेल्या अभिनेत्रीप्रमाणे सगळ्या गोष्टी करत होते, म्हणजे स्वेटर विणत होते, अंगडी टोपडी शिवत होते, बाळलेण्याचे प्रकार निरखत होते, पण मनात समाधान नव्हतं. मनातली हुरहूर कसली होती ते गाडीतून उतरून निकेतच्या घराच्या दारात उभी राहिल्यानंतर कळलं. आतापर्यंत सगुण निर्गुण भक्तीच्या वादात मी बहुधा निर्गुण भक्तीच्या बाजूने होते, पण या वेळी मात्र विठ्ठलाला उराउरी भेटायचा ध्यास वारकरी का घेतात ते कळलं. दार उघडलं आणि "अजि म्या ब्रह्म पाहिले " अशी अवस्था झाली. त्या चिमुकल्या गाठोड्याला उराशी घट्ट कवटाळावं अशी सर्वांगातून उर्मी सळसळत गेली. पण......&lt;br /&gt;एक तर २४ तासांचा प्रवास, त्यात आम्ही स्वाइन फ़्लू च्या आगारातून ( पुण्यपत्तन) आलेलो आणि भरीस भर म्हणजे माझ्याशेजारी बसलेली कोरियन मुलगी सगळ्या प्रवासभर सीटवर मान टेकून झोपली होती ती फक्त टिश्यू पेपर नाकाला लावून त्यांचा बोळा बाजूला टाकण्यापुरतीच उठत होती. म्हणजे तिथोनही सर्दीचा प्रसाद मिळण्याची शक्यता होतीच. त्यामुळे पंढरपूरला जावून कळसाचं दर्शन घेऊन परतणा-या वारक-यासारखी मी आंघोळीसाठी बाथरुमकडे वळले.&lt;br /&gt;बस्स! आता मी खरी आजी झाले. उराशी उबदार मुटकुळं, त्याचं चिमुकलं डोकं आपल्या खांद्याजवळ आणि आपले डोळे आनंदाने मिटलेले. हाच तो क्षण, ज्यासाठी आपण धावत आलो. आमच्या शेजारच्या निमोणकरकाकूंच्या नातवाला भेटायला गेले असता त्या नातवाला कवटाळून अशाच उद्गारल्या होत्या, "आईपेक्षा आजी होणं किती सुखाचं असतं नाही? आई असताना ज्या सुखाला मुकलो त्या सुखाची आता भरपाई करता येते." तेव्हा वाटलं, अगदी त्यांच्या चेह-यावरचे कृतार्थतेचे भाव बघूनही असं वाटलं, की आई होण्याच्या सुखाची कशाची तुलना कशी होऊ शकेल? पण आंघोळ करून आल्यावर मल्हारला छातीशी कवटाळल्यावर पटलं, आजी या हाकेत जगातला सगळ्यात मोठा आनंद दडलेला आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-6652466880043934465?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/6652466880043934465/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=6652466880043934465' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/6652466880043934465'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/6652466880043934465'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2009/10/blog-post_03.html' title='अजि म्या झाले आजी आज !'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-173080160557367840</id><published>2009-10-01T13:39:00.000-07:00</published><updated>2009-10-03T22:17:43.135-07:00</updated><title type='text'>मल्हारवारी</title><content type='html'>अमेरिकन पोर्टरच्यामागून आम्ही एका प्रचंड दाराकडे आलो, सामानाची ट्रॉली पुढे झाली, दार उघडलं, वा-याचा एक शहारा उठवणारा झोत अंगावर आला. दारातून पाऊल पुढे टाकलं आणि आता लिहितानाही आठवत नाही की मी धावत पुढे गेले, की तो पुढे धावला, पण तरळत्या पाण्याच्या पडद्यापुढे त्याचा हसरा, जग जिंकल्याचा आनंद झाल्यासारखा चेहरा होता आणि आम्ही एकमेकांच्या मिठीत होतो. तसाच तो बाबांच्याही मिठीत क्षणभर विसावला आणि सामान हातात घेऊन पुढे चालू लागला, त्याच्या मागून आम्ही, त्या प्रचंडपणाने भांबावलेले.&lt;br /&gt;अमेरिकेला जाणं हे आम्हा दोघांनाही किंचितही आकर्षक वाटत नव्हतं. त्यासाठी लोक आम्हाला अगदी मूर्खात नाही तरी वेड्यात काढत होते, पण २२-२४ तास प्रवास करून तिथे जावं असं आम्हा दोघांनाही वाटत नव्हतं. यात विलासला एवढा वेळ बसायचं, ते आपल्याला झेपेल की नाही ही चिंता असायची तर बंद जागेत बसणं म्हणजे साक्षात मरणाला आमंत्रण ही माझी तीव्र भावना. म्हणून तर निकेत लास वेगसला असतानाही आम्ही त्याची विनवणी धुडकावून लावलेली होती. पण आता गोष्ट वेगळी होती. आता आम्ही बढती मिळून आजी - आजोबा होणार होतो आणि आताच्या अलिखित नियमाप्रमाणे आम्हाला जावं लागणार होतं. आणि तिथेच तर वांदे होते. आपण बाबा होणार हे कळल्यापासूनच निकेतने माझा मेंदू धुवायला सुरवात केली होती. त्याचं बोलणं संपेपर्यंत मला पटत होतं की बंद खोलीत काहीही होत नाही, श्वास नेहमीसारखाच करता येतो, पण त्यासाठी सिनेमाला जा, ए सी गाडीतून प्रवास कर हे उपाय करून बघायची वेळ आली की माझं भिजलं मांजर  व्हायचं. प्रथम प्रथम हसण्यावारी नेणारा नवराही मनातून हबकला. परस्पर फोनवर लेकाला म्हणायला लागला, "अरे, कराल का तुम्ही मेनेज? अवघड वाटतय बुवा." पण आमची मुलं हार मारणारी नाहीतच. त्यांनी हळूहळू खिंड लढवायला सुरवात केली. कारण मदतीपेक्षा आपण इथे कसे राहतो, त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी आईवडिलांबरोबर शेअर करायची त्यांची आस होती. आणि ती त्याच्या बहिणीला कळत होती. आम्हाला कळत असून काय उपयोग? कारण वळत नव्हती. अखेर सायकोलोजिस्टसबरोबर चर्चा करून त्यांनी सांगितलेले व्यायाम करून, औषधं घेऊन मन तर तयार झालं आणि १० सप्टेंबरची तिकिटं हातात पडली. दरम्यानच्या काळात येणार हे माहीतच असलेला आमचा नातू आला, सगळ्यांची गडबड उडवत आधीच आणि मग जाण्याचे खरे वेध लागले.&lt;br /&gt;मुंबई विमानतळावर जाण्यापूर्वी कितीही कान बंद करून ऐकलं तरी विमानप्रवासाबद्दल भरपूर मौलिक माहिती गोळा झाली होती त्यामुळे विमानतळावर पोचल्यावर त्यातल्या बहुतेक सगळ्या सूचना आम्ही विसरलो होतो आणि हम करेसो कायदा या न्यायाने सामान चेक इन करा म्हणजे तुम्हाला ओझं वहायला नको हे कानाआड टाकून नवरा भरायचे फॉर्म आणायला गेला आणि मी सामानाच्या डोंगराआड उभी राहून "अरे, किती ही गोरी माणसे एकदम पहायला मिळतात बरे" म्हणत नव-याची वाट बघत एका कोप-यात उभी. पण नंतर ३५ वर्षांच्या संसाराच्या शहाणपणाच्या जोरावर तगून आम्ही विमानात जायच्या रांगेत उभे राहिलो. सिक्युरिटी चेकनंतर चालतोय, चालतोय. आता जिना येणार त्यावर चढून आम्ही विमानात प्रवेश करणार, आणि आमच्या तरुणपणाच्या काळातल्यासारखी हवाईसुंदरी आम्हाला अभिवादन करून आमची सीट दाखवणार असा आम्ही विचार करत असतानाच आम्ही चालत असलेली बोळकांडी संपली तिथे दारात दोन छानशा प-या आणि एक भलामोठा परा हसून आमचं स्वागत करत असलेले दिसले. हा धक्का एवढा मोठा होता की आपण कोरियन विमानात पोचलो, हे समजलंच नाही. तेवढ्यातल्या तेवढ्यात मी विमान किती मोठं आहे हे पाहून घेतलं. म्हणजे अगदी यष्टी नाही, तेव्हा काळजी नको. अर्थात मन:शांन्तीच्या गोळ्या मला चांगलच धीट बनवत होत्याच. तेवढ्यात नव-याने सामान जागेवर ठेवलं आणि आम्ही स्थानापन्न झालो. मग मात्र आम्ही सगळी मोठेपणाची जोखडं झुगारून दिली, नेहमी प्रवास करणारे आपल्याला हसतील की काय हा विचारही मुंबई विमानतळावरच सोडून दिला आणि बाहेर बघायला लागलो, लहान मुलांच्या निरागसतेने! कितीतरी विमानं उभी होती आणि आम्ही अगदी हे वडिंग्याला, हे कवठेमहांकाळला, हे कुडित्र्याला या थाटात ते कुठल्या देशाचं आहे ते न्याहाळत होतो..&lt;br /&gt;पण आम्हाला फार वेळ मिळालाच नाही, कारण एक गोरी गोरी काळ्याभोर डोळ्याची परी आमच्याजवळ झुकून अगम्य इंग्रजीत आम्हाला पट्टा बांधायला सांगत होती. त्या सगळ्याच पोरींचं बोलणं म्हणजे कारवारी हेलात एखाद्या प्रेमळ म्हातारीने "पट्टा बांधतेस का बाळा?" विचारावं असं मधाळ वाटत होतं. त्यांचा चटपटीतपणा, अदबीने वाकून बोलण्याची पध्दत (भले ती कमावलेली का असेना) आणि हसरा चेहरा मनाला सुखवत होता.  झगमगणारी मुंबई सोडून आम्ही अंतराळात झेप घेतली, आणि खाण्या - जेवण्याचा तोबरा सुरु झाला. निघतानाच वजनाचा विचार करायचा नाही हा आम्हा दोघात ठराव झालेला असल्याने समोर येईल ते परब्रह्म उदरात न्यायचं काम आम्ही इमाने एतबारे केलं, विमानप्रवासात काहीच करायचं नसल्याने आणि सक्तीची झोप घ्यायची असल्याने पडदे सरकवून डोळे मिटण्याखेरीज काहीच काम नव्हतं. पण विमानप्रवासात मुरलेल्या मुरब्बींनी सांगितलेलं ऐनवेळेला विसरले असतेतरमात्र माझ्यासारखी करंटी मीच म्हणावं लागलं असतं. विमानात आम्ही घड्याळाची वेळ बदलली नव्हती ती याच कारणाने. सकाळ होतेय हे जाणवताच मी वर्ग चालू असताना बाईंच्या नकळत लिमलेटची गोळी तोंडात टाकावी त्याच खोडकरपणाने पडदा हळूच सरकवला. (हळूच म्हणण्याचं कारण म्हणजे, जरा आत उजेड आला की त्या परीचं खाष्ट हेडमास्तरीणीत रुपांतर व्हायचं. त्यातल्या त्यात जरबेचा आवाज काढायचा ती प्रयत्न करायची जो प्रत्यक्षात तितकाच मधाळ असायचा, "दोन्त ओपन, अदर पिपल आर स्लीपिंग"). आम्ही  उंचावर होतो आणि खाली आकाशात लाल रंगाची उधळण चाललेली होती, ती केवळ दैवी होती, केवळ दैवी. त्यानंतर मला तो चाळाच लागला, हळूच पडदा सरकवला की आपण पुढे आणि खाली आपल्यामागून कापूस पिंजून ढीग करावे तसे ढग पांढरेशुभ्र, तेजस्वी. कुठे लाबलचक पट्टा. कुठे वेगवेगळे आकार. डोळ्याचं पारणं फिटावं आणि आपण आपल्याला भाग्यवान समजावं असेच ते देखावे होते.&lt;br /&gt;सेऊलपासून विमानप्रवासाला आम्ही सरावल्यासारखे झालो होतो आणि पुढे १२ तास काढायचे हे मनाला पटवत होतो. पण हे विमान पहिल्यापेक्षा मोठं असल्याने प्याशिंजरंही जादा होती, आणि कोरियन असली तरी सगळीकडे स्वभाव सारखेच असल्याने त्यांचं निरिक्षण करतानाही मजा येत होती. त्यामुळे विमान सॅनफ्रॅन्सिस्कोला कधी पोचलं ते जाणवलंही नाही.&lt;br /&gt;आता सामान घेतलं की झालं असा विचार करत पट्ट्याजवळ आलो तर तिथे ही गर्दी. शोधतोय, शोधतोय, दोनदा पट्टा समोरून गेला तरीही लाल  पिवळ्या रिबिनींची खूण कुठे दिसेना. गेल्या वाटतं आपल्याही ब्यागा अमिताभसारख्या. आता कुठल्या चितळ्यांच्या बाकरवड्या आणि कुठली आंबा बर्फी असा विचार करत असताताच तिथेच दुसरा पट्टा असल्याची मौलिक माहिती कळली आणि आमच्या ब्यागाही भूमीवर आलेल्या दिसल्या. आपली आंबलेली कंबर आणखी ओझं सहन करू शकणार नाही याची खात्री असल्याने नव-याने पोर्टर शोधला आणि आम्ही विमानतळाबाहेर आलो. सगळी सूत्रं मुलाने आपल्या हाती घेतली, सामान गाडीत टाकलं आणि सारथ्य करता करता तो वडिलांना त्यांच्या आवडीची माहिती देऊ लागला. म्हणजे रस्त्यांची नावं समोरून चाललेल्या गाड्यांचे मेक. पण वडलांनी एक अनपेक्षित प्रश्न विचारून त्याची मतीच गुंग केली. "अरे, झोपलेला असेल की जागा असेल रे मल्हार यावेळी?".&lt;br /&gt;त्याच विचारात असलेल्या माझ्या मनात आलं, "पुरुषही बदलतो तर आजोबा झाल्यावर!" आम्हा दोघांकडे हसून एक कटाक्ष टाकून मुलाने गाडी चालवण्याकडे लक्ष दिलं कारण त्यालाही आपल्या मुलाला आपले आई वडील दाखवण्याची तितकीच ओढ लागली होती!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-173080160557367840?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/173080160557367840/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=173080160557367840' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/173080160557367840'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/173080160557367840'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2009/10/blog-post.html' title='मल्हारवारी'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-1377620677773403915</id><published>2009-05-16T04:46:00.000-07:00</published><updated>2009-05-16T05:43:45.553-07:00</updated><title type='text'>झोपाळा</title><content type='html'>फ़ार फ़ार वर्षांपासूनचं एक स्वप्न होतं, घराभोवती बाग आणि तिच्या एका कोप-यात झोपाळा। त्यातलं घराभोवती बाग हे स्वप्न साकार झालं पण बागेतला झोपाळा यायला माझ्या वयाची साठ वर्षं उलटावी लागली। ३० जानेवारीच्या संध्याकाळी बागेच्या मोठ्या फ़ाटकाच्या समोरच्या जागेवर झोपाळा उभा राहिला। अगदी मला जसा हवा होता तसाच। दोन माणसं बसू शकतील एवढीच रुंदी, बळकट पण तरीही आटोपशीर दिसणा-या कड्या आणि खांब आणि मुख्य म्हणजे वर कौलारु छप्पर। बसल्यानंतर उजव्या हाताला मधुमालतीचा वेल आणि डाव्या बाजूला बोगनवेलीचा फ़ुलोरा। एक हिरवी खोलीच तयार झाली , घरापासून वेगळी आणि तरीही घराच्या इतक्या जवळ। जिथे बसून घरातून बाहेर पडून घर न्याहाळताही येतं तुकड्या तुकड्याने आणि रमताही येतं एखाद्या तुकड्यात।&lt;br /&gt;लहानपणी घराजवळच्या मैदानात खेळून झाल्यावर सरिताच्या घरातल्या भल्यामोठ्या झोपाळ्यावर आम्ही सगळ्या मैत्रिणी दाटीदाटीने बसून गाणी गायचो, आणि गाता गाता झोपाळाइतका उंच चढवायचो की अखेर काकू येऊन ओरडायच्या । तीच झोक्याची झिंग हा झोपाळा झुलवतानाही येते। लहानपणी मनात नुसतीच आनम्दाची कारंजी उसळत असतात.... अकारणच! पण आता कधी कधी  अकारणच कातर होणा-या मनाला परत प्रवाहात आणण्यासाठी अशा एखाद्या सख्याची, " चौथ्या कम-याची' गरज असते। कोणाला तो देवळात मिळतो कोणाला वाचनात, तर कोणाला मित्रमंडळीच्या गराड्यात ।     माझा चौथा कमरा मला माझ्या या झोपाळ्यात मिळतो। मुलांच्या आठवणींनी व्याकुळलेल्या मनाला तो चार व्यवहाराचे बोल समजावतो, एखादंसुंदर पुस्तक वाचल्यानंतर स्वत:शीच संवाद करताना साथ देतो,चांदण्या  नि:शब्द रात्री लपेटून आपल्या सावलीत मुरवून घेतो, मंद वा-यावर सळाळणा-या सांजेला मधुमालतीच्या गंधाने जोजवत राहतो तर सोनसळी सकाळी चैतन्याने न्हाणतो।&lt;br /&gt;आभारी आहे बाळांनो, मनापासून आभारी आहे मी तुमची, माझ्यातल्या मी ला माझीच साथ घ्यायला मदत  करण्यासाठी! दूर राहूनही माझाजवळच असण्यासाठी! या झोपाळ्याच्या रुपाने.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-1377620677773403915?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/1377620677773403915/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=1377620677773403915' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/1377620677773403915'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/1377620677773403915'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2009/05/blog-post.html' title='झोपाळा'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-3928729192626243882</id><published>2009-04-30T06:03:00.000-07:00</published><updated>2009-04-30T07:00:11.939-07:00</updated><title type='text'>झावळ्या</title><content type='html'>खिडकीतून दिसणा-या नारळाच्या झावळ्या इतक्या सुंदर दिसत असतील हे मला इतक्या वर्षात कधीच कसं जाणवलं नाही याचं आश्चर्य वाटतय। कारण नारळाच्या झावळांचं आणि माझं नातं अगदी लहानपणापासूनचं आहे।आमच्या घरासमोर एक घर मुनिश्वरांचं। त्यांनी दारातच नारळाचं झाड लावलेलं होतं। रात्रीच्यावेळी, विशेषत: चांदण्या रात्री त्या झावळ्या अशा काही झळाळून निघायच्या , की वाटायचं म्यानातून निधणा-या तलवारी अशाचतळपत असतील।त्या शांत रात्री वा-यावर डुलणा-या चमकणा-या झावळ्या न्याहाळताना मनात गूढ देशीचे राजपुत्र शस्त्रागारात आपल्या या तलवारी न्यायला कोणत्याही क्षणी येतील असं वाटत रहायचं.&lt;br /&gt;शिरोड्याला, आजोळी गेलं की, सगळीकडे नारळाचीच झाडं। गेल्या गेल्या मामांनी कोणातरी बाबल्याला किंवा पांडग्याला नारळाच्या झाडावर चढवून शहाळी काढवून घेतलेली असत। खास बहिणीच्या, भाचरांच्या स्वागतासाठी। शहाळ्याचं पाणी पिताना आठवत रहायची ती झाडाची उंची आणि इतक्या उंचीवरून डोलणा-या झावळ्या! मग आईशी गजाली करायला पणग्या किंवा जनग्या किंवा नानीबाय यायची , कोणी बागेतलीच झावळी ओढून आणायची आणि सुख - दु:खाच्या देवाण घेवाणीबरोबरच झावळीचे हीर साळून भलेमोठे खराटे तयार व्हायचे.&lt;br /&gt;शिरोड्यालाच ओसरीवर बसलं की बागेत डावीकडे दोन माड गळामिठी घालून बसलेले होते। दिवसभराची कामं आटपून मामा आणि आई बसलेले असत। मिणमिणते कंदील आजूबाजूचा अंधार आणखीनच गडद करत असायचे। वा-याबरोबर ते माडही किंचितसे डोलायचे आणि त्यांचा करकर आवाज माझं बाल- काळीज कातरत जायचा। उंचच उंच माड राक्षसात बदलून जायचे आणि मामांना चेष्टा करायला स्फ़ुरण चढायचं। " इंदू असा काय गो तुजा चेडू, माडाक भिता? मगे रात्री देवचार बघलो तर काय करीत?'' नुसत्या कल्पनेनेच माझ्या काळजाचं पाणी पाणी व्हायचं ।पण रात्र सरल्यानंतर तेच माड सकाळी झावळ्या डोलवत उभे असयायचे तेव्हा मात्र एखाद्या खोडकर मुलासारखे वाटायचे।&lt;br /&gt;माझ्या घराच्या दारात बसलं की समोर माडाची झाडंच झाडं आहेत। पुण्यासारख्या शहरात प्रत्येकाने आपल्या बागेत एखाद दुसरं तरी नारळाचं झाड लावलेलंच आहे। त्या झाडांच्या हिरव्यागार झावळ्या दिवसाच्या कोणत्याही वेळी बघितल्या तरी मनाला सोबत करत असतात। सकाळी हातात चहाचा कप घेऊन वर्तमानपत्रात डोकावत असावं, आणि सहज म्हणून समोर नजर टाकावी तर सूर्यकिरणाचं कोवळेपण घेऊन शेजारी खेळणं घेऊन स्वत:तच रमलेल्या छोट्या मुलासारख्या त्या झावळ्या माझ्याही मनात एक कोवळीक पसरून देतात। दुपारच्यावेळी जेवणानंतर बडिशेप चघळत सहज नजर टाकावी तर " काय आवरलं का? माझंपण आत्ताच आटपलं, पण आज कामवाली आली नाही ना, त्यामुळे भांडी घासायचीत'' असं साम्गणा-या शेजीबाईसारख्या त्या झावळ्या मला पुढच्या कामाला  बळ देतात। एखाद्या संध्याकाळी कातर झालेल्या मनाला आपल्या नि:शब्द हेलकाव्यातून गोंजारतात। कधीकधी एखादी वाळलेली झावळी खाली कोसळते, आवाज होतो, पण तो ऐकताच जाणवतं की थोड्याच वेळात बाजूच्या झोपडपट्टीतून सावळ्यामामा येऊन तिला उचलून नेईल , रस्त्याच्या कडेला बसून तिची पानं साळेल, त्याचे हात सराईतपणे त्या हिरांचा खराटा करण्यात गुंततील, ... तेवढेच दहा रुपये मिळतील त्याच्या घरच्या मीठ मिरचीला !&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-3928729192626243882?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/3928729192626243882/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=3928729192626243882' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/3928729192626243882'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/3928729192626243882'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2009/04/blog-post.html' title='झावळ्या'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-8848906080515850942</id><published>2009-03-25T01:02:00.000-07:00</published><updated>2009-03-26T19:58:04.558-07:00</updated><title type='text'></title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;"त्याची माझी ओळख होऊनही आता ३५पेक्षा जास्त वर्षं उलटली तरीही मला त्याच्या छंदाची सवय होऊ नये याचं मलाच आश्चर्य वाटतं। तसा तो साधा, सरल मार्गी। आपण बरं की आपल्या हातातलं वर्तमानपत्र बरं या विचारसरणीचा। देवाचा कोणतासा  भक्त "" मी देव सेवतो, देव प्राशन करतो आणि देवचि पांघरतो '' असं म्हटल्याचं सांगितलं जातं तसा तो कायावाचामनाने वर्तमानपत्रमय झालेला आहे।  म्हणजे हे सगळं मी त्याच्या बायकोकडून ऐकलं आहे। नाहीतर त्यांच्या हनीमूनच्या कथा मला माहीत असण्याचं काय कारण? सुचरिता , म्हणजे अर्थातच आपल्या प्रमुख पात्राची अर्धांगी , एकदा करवादून मला सांगत होती, की ताई, आमच्यावेळी असं दोघांनीच बाहेर फ़िरायला जायची पध्दत नव्हती, पण घरच्यानी आम्हाला महाबळेश्वरला पाठावलं हौसेनं। हिंडावं फ़िराव ह्यांच्याहातून गजरा माळून घ्यावा या स्वप्नात मी दंग  । तर "हे'' बाजारात गेलं की प्रथम वर्तमानपत्राच्या स्टॊलवर जाऊन थडकायचे। पेपर साग्रसंगीत वाचून झाल्याखेरीज त्यांच्या कानात मी काहीही बोललेलं शिरायचच नाही। मी मात्र त्या चार दिवसातच समजून चुकले की मला " दुसरेपणा''ला दिलय घरच्यांनी। पहिली माझी सवत म्हणजे पेपर आणि त्यातून वेळ मिळाला तर मी।&lt;br /&gt;&lt;/div&gt;यातला अतिशयोक्तीचा भाग सोडला तरीही त्यात थोडं तत्थ्य होतच। कारण आम्हा सगळ्यांची " माहिती खाण'' म्हणजे दिनकरच। टेलिफ़ोनच्या नवनवीन योजना असोत, पाणीपुरवठ्याच्या वेळेतला बदल असो, वीजेच्या लपंडावाची वेळ असो की क्रिकेटच्या सामन्यांचे वेळापत्रक असो दिनकरने सांगितलं की बाकीचे निर्धास्त। कारण कोणत्याही विषयासंबधीची माहिती असो दिनकरच्या नजरेतून ती सुटणं अशक्य। वर्तमानपत्राच्या नावापासून ते " यांनी येथे यांच्यासाठी छापले;पर्यंत वाचून दिनकर त्यासम्बंधीची माहिती शोधून काढणार आणि सम्बंधिताला ती पोचवणार। मग भले घरातला गेस संपल्याने नंबर लावायचं काम असो, की सोनालीला शाळेत पोचवायचं काम असो ते  थांबू शकतं पण वर्तमानपत्रातून हवी असलेली माहिती मिळाल्याखेरीज इतर कामाला हात न लावणा-या दिनकरमध्ये आणि  आधी लगीन कोंडाण्याचं '' म्हणणा-या तानाजीत आणि दिनकरमध्ये काहीच फ़रक नसतो। अशा वेळी "श्रीकांता कमलाकांता असं  कसं झालं, असं कसं वेडं माझ्या नशीबी आलं ' असं म्हणून सुचरिता सुस्कारे टाकते तर ज्याचं काम झालेलं असतो तो इरावती कर्व्यांच्याच सुटकेच्या भावनेने " बरं झालं मी याचा मित्र झाले, बायको नाही झालो'' असे सुस्कारे टाकतो.&lt;br /&gt;एकदा तर दिनकरने हद्द केली होती। ते सांगताना सुचरिताचे डोळे संतापाने भरून आले होते आणि हसून हसून आमचे! म्हणजे झालं काय की, अनंतचं, दिनकरच्या दोन नंबरच्या मुलाचं टॉन्सिल्सचे ऒपरेशन होतं। त्याच्याजवळ बसायला लागेल म्हणून दिनकरने नेहमीपेक्षा जास्तीची  दोन तीन वर्तमानपत्र, इंडिया टुडे, सुचरितासाठी " माहेर'' अनंतासाठी चांदोबा वगैरे सगळी जय्यत तयारी केली होती। सकाळी दवाखान्यात दाखल झाल्यानंतर अनंताने चांदोबा वाचून टाकला आणि त्याची चुळबुळ सुरू झाली। तो आणखी अस्वस्थ होऊ नये म्हणून दिनकरने त्याला इंडिया टुडे चित्रं बघायला दिला। तेवढ्यात नर्स बोलवायला आली, ऑपरेशन थिएटर तयार आहे आणि चला म्हणून, भराभरा सगळं सामान भरून लगबगीने सगळे तिकडे धावले। ओपरेशन व्यवस्थित पार पडलं। बायको डबा आणायला घरी जाणार होती अनंता भानावर आल्यानंतर । दिनकर अनंताजवळ थांबणार होता। तसे दिनकरचे पेपर्स वाचून झाले होते, पण बायको येइपर्यंत त्याला इंडिया टुडेचा आधार होता। सुचरिताने बघितलं की अनंत हालचाल करतोय, आता जायला काही हरकत नाही तोच तिला दिनकरचं खेकसणं कानावर आलं। आता इथे ठेवला होता, एक वस्तू जागेवर सापडेल तर शपथ। सुचरिता, आधी इंडिया टुडे शोधून दे आणि मग जा।'' सुचरिता आधीच घाईत। ऑपरेशनच्या काळजीने तिने धड स्वयंपाकही केलेला नव्हता। आता चटकन निदान डाळतांदळाची खिचडी टाकून यावं म्हणून ती भरकन निघाली होती तर याचं गुरगुरणं।असेल हो इथेच। नीट बघा असं तिने बराच संयम करून सांगितलं आणि त्याच वेळी दिनकरला आठवलं की इंडिया टुडे अनंताला चित्र बघायला दिला होता। दुस-या क्षणी तो कॉटकडे झेपावला आणि शुद्धी - बेशुध्दीच्या सीमेवर असलेल्या अनंताला विचारू लागला, ; अनंता, बाळा तू इंडिया टुडे कुठे ठेवलास? तो... तो ते.... तुला मी चित्रं बघायला दिला होता तो....'  आता अशावेळी सुचरिता जोरात किंचाळली, नर्स पळत आली तिला न जुमानता सुचरिताने पिशवी जमिनीवर पालथी केली आणि जमिनीवर पिशवीतून पडलेला इंडिया टुडे दिनकरच्या हातावर आपटून ती तरातरा चालायला लागली तर यात तिचा काय दोष?&lt;br /&gt;यानंतर पुलाखालून खूप म्हणजे खूपच   पाणी वाहून गेलय।मोठ्या सोनलचं लग्न झालय। अनंता आता अमेरिकेत असतो।दिनकरने इकडे यावं आणि आपलं वैभव पहावं असं त्याला फ़ार वाटतं पण दिनकर त्याला तयार नाही। कारण तिथे मराठी वर्तमानपत्रं  नाहीत आणि इंटरनेटवर बातम्या वाचण्यात दिनकरला मजा वाटत नाही। शेवटी कंटाळून सुचरिता एकटीच लेकाबरोबरनिघाली। ती येईपर्यंत दिनकर सोनलकडे राहणार होता। त्याला सोडून निघताना नाही म्हटलं तरी सुचरिताचं मन भरून आलं आपण लेकाच्या आग्रहाला बळी पडून निघालो हे चुकलं की काय अस ही तिच्या मनात आलं। पाणावल्या डोळ्यांनी दिनकरचानिरोप घेताना तिचे कान आसुसले होते, दिनकरचे शब्द ऐकायला, " लवकर ये हं मी वाट पाहतो। ' आणि दिनकर तसं म्हणालाही, पण पुढच्याच वाक्याने सुचरिताला जमिनीवर आणलं, " .... आणि येताना कोणताही एक पेपर घेऊन ये तिकडचा। बघू तरी एवढा मोठा असतो म्हणतात तर काय असतं तरी काय त्याच्यात ते।''&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-8848906080515850942?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/8848906080515850942/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=8848906080515850942' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/8848906080515850942'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/8848906080515850942'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2009/03/blog-post.html' title=''/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-5760073927668053464</id><published>2008-10-03T20:46:00.000-07:00</published><updated>2008-10-06T06:26:32.879-07:00</updated><title type='text'>नवरात्र</title><content type='html'>पितरपाठ सरता सरता आमच्या शाळेत स्टाफरुमच्या शेजारच्या जिन्याखालच्या खोलीची साफसफाई  सुरु  होई आणि आम्हाला शाळेतल्या शारदोत्सवाचे वेध लागत. घटस्थापनेच्या दिवशी छान नटून थटून शाळेत जावं तर समोरच्या दृश्यानं  मन प्रसन्न होई. शाळेच्या प्रवेशदाराजवळ हिरवेगार रसरशीत केळीचे खुंट बांधलेले असत. प्रवेशदाराच्याचजवळच्या व्हरांड्यात सनई - चौघडावाले येऊन सज्ज असत. संपूर्ण ग्राऊंड पाणी मारून, रांगोळी घालून सजलेले असे. सगळं वातावरणच मंगलमय, आल्हाददायक असे. शाळेच्या मुख्याध्यापिका शारदादेवीची पूजा करत, आरती होई. बाई शारदेची, पर्यायाने विद्येची उपासना कशी करावी हे कळकळीने सांगत. मग खिरापत घेऊन आपापल्या वर्गात जाण्याऐवजी आम्ही रांगेने आमच्या चित्रकलेच्या वर्गात जमत असू. (हा वर्ग खूपच मोठा असल्यामुळे आमच्या शाळेचे सगळे कार्यक्रम इथेच  होत असत.) जेरेशास्त्र्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी!  वर्षानुवर्षे शारदोत्सवाच्या पहिल्या दिवशी आमच्या शाळेत जेरेशास्त्र्यांचं प्रवचन असे. समोर बसलेल्या मुलींना समजेल अशा सोप्या रीतीनं जेरेशास्त्री प्रवचन करीत. लहानपणी त्यांची धीरगंभीर, तेज:पुंज मूर्ती मनात इतकी ठसली होती की, पुढे कित्येक वर्षं गोष्टीच्या पुस्तकात "विद्वान ब्राह्मण" असा उल्लेख आला की, माझ्या डोळ्यासमोर हमखास जेरेशास्त्र्यांची मूर्ती येत असे. दुस-या दिवसापासून नवरात्रीचे दिवस क्रीडा, भाषण, गायन, नाट्य अशा वेगवेगळ्या स्पर्धांनी गजबजून जाई.&lt;br /&gt;कोल्हापूर हे शक्तिपीठ असल्यामुळे करवीरनिवासिनी अंबाबाईचं नवरात्र सुरु होई. अंबाबाईची रोज षोडषोपचारे विविध प्रकारची पूजा बांधली जाई. आजही बांधली जाते. या पूजेने सजलेली, विलक्षण तेजाने उजळून निघालेली देवीची मूर्ती पाहण्यासाठी देवालयाचा परिसर गजबजून जाई. कोल्हापूरच्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून बायाबापड्या दर्शनाला येत. मंदिराच्या परिसरातच एकमेकींना हळदीकुंकू लावत. नवीन लग्न झालेल्या पोरीबाळींची चेष्टा मस्करी करत. घरच्या धन्याला, लेकराबाळांना उदंड आयुष्याचं दान आईकडे मागत. आंबाबाईची मूर्ती डोळ्यात साठावत माघारी परतत. जाणकार लोक देवी जिथे प्रगट झाली त्या  स्वयंभू स्थानाचं दर्शन घेतल्याशिवाय रहात नसत. रात्री अंबाबाईसमोर नामवंत गायक, वादक आपली "सेवा" रुजू करत आणि करवीरवासी रसिक त्यात न्हाऊन चिंब होत.&lt;br /&gt;पाचव्या माळेला म्हणजे ललितापंचमीला त्र्यंबुली यात्रा किंवा टेंबलाबाईची जत्रा असे. अंबाबाई आणि टेंबलाई सख्ख्या बहिणी. बहिणीच त्या, भांडल्या एके दिवशी कशावरून तरी. टेंबलाई रुसली आणि गावाबाहेरच्या टेकडीवर जाऊन बसली. काही दिवसांच्या अबोल्यानंतर अंबाबाईला चैन पडेना. ती निघाली बहिणीची समजूत काढायला. ललितापंचमीच्या दिवशी अंबाबाईची पालखी वाजत गाजत टेंबलाईच्या टेकडीवर जाते. दुपारी बारा वाजता टेंबलाईच्या देवळाच्या प्रांगणात दोघी बहिणी भेटतात. त्यावेळी कोहळा फ़ोडला जातो. त्याचा एखादातरी तुकडा मिळावा यासाठी भाविकांची झुंबड उडते.&lt;br /&gt;राजघराण्याच्या खाजगी भवानीमाता मंदिरात हे नवरात्र सुरु होतं. भवानीमाता शिवछत्रपतींचं कुलदैवत.  त्यांच्या वंशजांची एक गादी कोल्हापुरात असल्यामुळे या नवरात्राला एक वेगळच खानदानी क्षात्रतेजाचं वलय आहे. इथेही गर्दी असते; पण अंबाबाईच्या देवळाच्या मानाने कमी. देवळामधली राजगादी, शाहूमहाराजांचा भव्य पुतळा, त्यांनी मारलेला आणि पेंढा भरून ठेवलेला गवा रेडा या सगळ्यामुळे मंदिरात एक अदबशीर शांतता असे. या देवीलाही रोज वेगवेगळ्या प्रकारे सजवले जाई. दरबारी गायक, वादक देवीपुढे सेवा रुजू करत. देवळात आलेल्या बायाबापड्या देवीनंतर महाराजांच्या गादीपुढे, शाहूमहाराजांच्या पुतळ्यापुढेमाथा टेकतच; पण या लोकांच्या राजाने प्रजेच्या मनात इतकं आदराचं स्थान मिळवलं होतं की, त्याने मारलेल्या गव्याचीही  हळदीकुंकवाने त्या पूजा करीत. ही रणरागिणी भवानीमाता क्षत्रियांचं दैवत असल्यामुळे नऊ दिवस देवीपुढच्या चौकात तलवारीच्या एका फटक्यात  बकरं मारलं जाई.&lt;br /&gt;या मोठ्या उत्सवाबरोबरच आणखी एक उत्सव सुरु होई तो आम्हा मुलींचा. कोल्हापुरी भाषेत हादगा म्हणजे भोंडला. मुलगी साधारण पाच वर्षांची झाली की हादगा मांडला जाई तो ती सोळा वर्षांची होईपर्यंत. म्हणजे हादगा हा सण कुमारिकांचा मानला जाई. हस्त नक्षत्र लागले की याची सुरवात होई आणि नक्षत्र संपले की हा बोळवला जाई.  म्हणजे हादगा १५ दिवस आणि १६व्या दिवशी बोळवण! हादग्याचा  एक  कागद  मिळे. त्यावर एकमेकांसमोर तोंड करून सोंडेची कमान करून हत्ती असत. वर अंबारी सजलेली असे. बाजूला मुली फ़ुगडी घालत असलेल्या, बायका नटून थटून पूजेला चाललेल्या असत. हा कागद घटस्थापनेच्या दिवशी घरातल्या भिंतीवर चिकटवला जाई. त्याला चुरमु-याची, भिजवलेल्या शेंगदाण्यांची, गव्हाच्या ओंब्यांची, फुलांची  आणि मुख्य म्हणजे सोळा प्रकारच्या फळांची माळ घातली जाई. आमच्या लहानपणी ब-याचशा घरांना भल्या मोठ्या बागा असत आणि  त्या फळाफुलांने बहरलेल्या असत. मग घटस्थापनेच्या आदल्या दिवशी, शाळा सुटल्यावर सगळ्यांच्या बागा धुंडाळायचा एक कार्यक्रमच असे. जास्तीजास्त फळं  मिळवण्यासाठी आमचा आटापिटा चाले. कुठे घरातल्या काकींना "पटवून" तर कुठे कुंपणाची तार वर करून गुपचुपबागेत शिरून तर कुठे "माझ्यातला एक पेरू तुला देते, तुझ्याकडचं एक केळं मला देतीस काय?'' अशा गंभीर वाटाघाटी करून फळं  जमवली जात. या सगळ्या माळांनी सजलेला कागद भिंतीवर चिकटला की धन्य धन्य होई. मग सोळा दिवस पाटावर हत्तीचं चित्र काढून त्याभोवती फ़ेर धरून नाचताना, लोकगीतातून साकारलेली या मातीची गाणी, या मातीतली गाणी गाताना मन झपूर्झा घेत रोज वेगळी खिरापत आणि तिची संख्याही चढत्या भाजणीने. रोज नवी गाणी आणि एकेक वाढत जात असलं तरी सुरवात मात्र "ऐलमा पैलमा गणेशदेवा, माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा'' अशी गणेशाला साकडं घालूनच होई. आता विचार करताना वाटतं की, आपल्या या शेतीप्रधान देशातला हा सृजनाचाच  एक उत्सव असावा. सोळाव्या दिवशी हादगा बोळवायचा असल्याने त्या दिवशी तर साखरखोब-यापासून लाडूकरंजीपर्यंत सर्व प्रकारची खिरापत तर असेच पण साटो-या- कोल्हापुरी भाषेत सारनो-या, खांडवी/खांतोळी, वाटली डाळ/मोकळं तिखट, आणि मटकी उसळ यांचा समावेश असावाच लागे. एवढे सगळे पदार्थ असल्यामुळे प्रत्येकीचा हादगा वेगवेगळ्या दिवशी बोळवला जाई. मात्र हादग्याला दिवाळीचे दिवे दिसता कामा नये असा अलिखित दंडक असे "नाहीतर आंधळं व्हायला हुतय बाई'' याभितीनं  भराभर हादगा बोळवण्यासाठी मुली आपापल्या आयांच्यामागे लागत. आता लक्षात येत ते हे की, पूर्वी सगळे फराळाचे  प्रकार घरीच आणि मुबलक प्रमाणात करायचे असल्यामुळे त्या गडबडीत हादग्याचं प्रकरण नको म्हणून कुणीतरी हे आंधळेपणाचं पिल्लू सोडलेलं असावं.&lt;br /&gt;हादगा संपला की चार दिवस हुरहूर वाटे पण लहान वयात दिवाळीच्या किल्ल्याचं, रांगोळीचं, फराळचं  आणि मुख्य म्हणजे सटीसामाशी मिळणा-या नव्या कपड्यांचं आकर्षण त्यावर मात करी आणि आम्ही दिवाळीचे बेत करण्यात रंगून जात असू.&lt;br /&gt;आजही नवरात्र असंच साजरं होत असत. काही किरकोळ फ़रक झालेही  असतील, कारण कोल्हापूर सोडूनही ३५ वर्षं झाली. पण मला खात्री आहे आजच्या मुलींनाही हे उत्सव तितकेच आपले वाटत असतील. कारण वरचं आवरण बदललं तरी आतला गाभा भारतीय मनाचा आहे, तसाच लख्ख आणि निखळ!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-5760073927668053464?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/5760073927668053464/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=5760073927668053464' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/5760073927668053464'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/5760073927668053464'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2008/10/blog-post.html' title='नवरात्र'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-2192505655147307691</id><published>2008-09-01T03:40:00.000-07:00</published><updated>2008-09-21T11:04:31.065-07:00</updated><title type='text'>कल्पित आणि सत्य</title><content type='html'>रोज सकाळी ६.२० पर्यंत आम्ही दोघे फ़िरण्यासाठी घराबाहेर पडतो. ठराविक मार्गानेच फिरायला जातो. पावसाळ्यात रस्त्यावरच्या खोदकामामुळे रस्ता बदलावा लागला तरच दुसरा रस्ता पकडतो. अन्यथा आखीव रेखीव कॉलनी&lt;span&gt;तून&lt;/span&gt; बाहेर पडून पुढच्या महामार्गावरच्या रहदारीवर एक डोळा ठवून चालण्याची कसरत आता आम्हाला जमू आणि आवडूही लागली आहे.&lt;br /&gt;पूर्वी आमच्या कॉलनी&lt;span&gt;च्या&lt;/span&gt; एका बाजूला सडक आणि दुस-या बाजूला शेतांचे लहान - मोठे तुकडे पसरलेले होते. &lt;span&gt;आम्ही&lt;/span&gt; त्या शेतांमधून जाणा-या रस्त्यावरून फिरणं पसंत करत असू. आमच्याप्रमाणेच त्या रस्त्यावरून  फिरण्यासाठी  लोक मुद्दामहून यायचे, अगदी महामार्गाच्या पलिकडच्या कॉलनीतूनही. झाडांच्या सळसळत्या फांद्यांखालून जाताना, कधी काळ्याभोर शेतात स-या पाडलेल्या पाहताना, कधी वितभर रोपट्यांमधून खुरपणी - भांगलणी चाललेली पाहतानातर कधी एखाद्या शेतामधून उसाचे तुरे डोलताना पाहताना पन्नास पावलांपलिकडचा कर्णकटू आवाजांचा धबधबा विसरायला होतो म्हणायचे. सकाळच्या रामप्रहरी इथून जाताना त्यांच्या मनाच्या गाभ्यात एक हिरवा  चाफा उमलायचा त्याचा सुगंध त्यांना दिवसभर प्रसन्न ठेवायचा.&lt;br /&gt;कालान्तराने शरीराने शहरात पण मनात आपलं " गाव " जपणा-या त्या माणसाचा एकछत्री अंमल संपला आणि वावराच्या प्रत्येक तुकड्याभोवती तारेचं कुंपण आलं. नव्या पिढीचं काळ्या आईत काही आतडं गुंतलं नव्हतं, त्यामुळे पटापट त्या जागांवर वेगवेगळ्या सोसायट्यांचे फलक लागले. कदाचित आमच्या सोसायटीचा जन्मही असाच झाला असावा. काळाची ती गरज होती. त्याप्रमाणे सर्व घडत होतं.&lt;br /&gt;हळूहळू एकेका वावरातली काळीभोर माती सिमेंटखाली झाकली जाऊ लागली. खडी, सिमेंट यांच्या ढिगांनी,  कॉंक्रीट मिक्सरच्या घरघराटाने कॉंक्रीटची घमेली एका हातातून दुस-या हातात आणि तिथून पुढे तिस-या चौथ्या, पाचव्या आणि वरवर जाणा-या पुढच्यांच्या हातात जाताना उठणा-या आरोळ्यांनी, होणा-या ओरड्याने , शांत बेटासारखं आपलं अस्तित्व टिकवून धरणारा आमचा भाग मुख्य महामार्गाशी अलगद जोडला गेला. हे होत असताना छोट्या छोट्या बंगल्यांपासून थोडं हात राखून का होईना पण तुरळक झोपड्या उभ्या राहिल्या. अनिवार्यपणे .. या झोपड्यांतले आईवडील समोरच चाललेल्या बांधकामात गुंतलेले असत, देवानं पदरी दिलेलं दान देवाच्याच भरवंशावर सोडून. रोज सकाळी फिरायला जाताना त्या कच्च्याबच्च्यातली कोणी गोधडीत गुरफटून झोपलेली दिसत तर कोणी आपल्या अम्माच्या मागे मागे लुडबुडताना दिसत.&lt;br /&gt;त्या दिवशीही नेहमीची रपेट आटोपून येत असताना रस्त्याच्या कडेला, फूटपाथला  टेकून एक स्कूटर दिसली. स्कूटरस्वार एक पाय फूटपाथवर आणि दुसरा रस्त्यावर टेकवून पुढे झुकला होता आणि फूटपाथवर उभ्या असलेल्या तीन - चार वर्षांच्या मुलीचे गालगुच्चे घेत होता. मुलीच्या डोक्याचं शिप्तर, अंगावरचा फाटका, मळकट  फ्रॉक बघून ती जवळच्या झोपडीतली असणार हे कळत होतं. मुलगी बाळसेदार आणि लोभस होती. एखाद्या ब-या घरात जन्मली असती तर "सोनुली" "छकुली" "साजिरी" म्हणून मिरवली असती.&lt;br /&gt;"चढ पटकन" असं त्या स्कूटरस्वाराने म्हणताच मुलगी टुणकन उडी मारून स्कूटरवर चढली आणि हँडलवर  हात ठेवून उभी राहिली. "हं , दाब " असं त्या स्कूटरस्वाराने म्हणताच तिने बटन दाबलं आणि पीप, पीप चा आवाज ऐकताच खुषीने मान डोलावत हसली. दुस-या क्षणाला स्कूटरस्वाराने स्कूटरला वेग दिला. सगळा दोन मिनिटांचा मामला. एक नजर त्या जोडीकडे टाकून मी पुढे सरकले. आणि स्कूटरस्वाराचं चित्र मेंदूवर उमटल्याने दचकून थबकले. चुरगळलेले कपडे, टापसलेला चेहरा, त्यावर दाढीमिशांचं जंगल. पाऊल पुढे टाकवेना. डोळ्यापुढे भीषण चित्रं यायला लागली. आणि त्या पोरीचा निष्पाप चेहरा. काहीच न सुचून मी नव-याकडे पाहिलं. त्याचाही चेहरा गंभीर दिसत होता. अरे देवा, म्हणजे मला जे वाटतय तेच त्यालाही वाटातय की काय ? आता मात्र मला धीर धरवेना.&lt;br /&gt;&lt;span&gt;त्या&lt;/span&gt; &lt;span&gt;मुलीच्या&lt;/span&gt; &lt;span&gt;आईच्या&lt;/span&gt; &lt;span&gt;बेपर्वा&lt;/span&gt; &lt;span&gt;वागण्याबद्दल&lt;/span&gt; &lt;span&gt;तिला&lt;/span&gt; &lt;span&gt;झापावं&lt;/span&gt; &lt;span&gt;म्हणून&lt;/span&gt; &lt;span&gt;मी&lt;/span&gt; &lt;span&gt;वळले&lt;/span&gt; &lt;span&gt;तर&lt;/span&gt; &lt;span&gt;नव&lt;/span&gt;-&lt;span&gt;याने&lt;/span&gt; &lt;span&gt;हाताला&lt;/span&gt; &lt;span&gt;धरून&lt;/span&gt; &lt;span&gt;अडवलं&lt;/span&gt; &lt;span&gt;आणि&lt;/span&gt; &lt;span&gt;लांबवर&lt;/span&gt; &lt;span&gt;बोट&lt;/span&gt; &lt;span&gt;दाखवून&lt;/span&gt; &lt;span&gt;म्हणाला&lt;/span&gt;, "&lt;span&gt;तो&lt;/span&gt; &lt;span&gt;बघ&lt;/span&gt; &lt;span&gt;आला&lt;/span&gt;.'' &lt;span&gt;तो&lt;/span&gt; &lt;span&gt;स्कूटरस्वार&lt;/span&gt; &lt;span&gt;दिसताच&lt;/span&gt; &lt;span&gt;डोक्यावरचं&lt;/span&gt; &lt;span&gt;मणामणाचं&lt;/span&gt; &lt;span&gt;ओझं&lt;/span&gt; &lt;span&gt;उतरल्यासारखं&lt;/span&gt; &lt;span&gt;वाटलं&lt;/span&gt;. &lt;span&gt;सैलावलेल्या&lt;/span&gt; &lt;span&gt;मनाने&lt;/span&gt; &lt;span&gt;तिकडे&lt;/span&gt; &lt;span&gt;पहात&lt;/span&gt; &lt;span&gt;राहिले&lt;/span&gt;. &lt;span&gt;नवराही&lt;/span&gt; &lt;span&gt;तणावरहित&lt;/span&gt; &lt;span&gt;आवाजात&lt;/span&gt; &lt;span&gt;म्हणाला&lt;/span&gt;, "&lt;span&gt;बरं&lt;/span&gt; &lt;span&gt;झालं&lt;/span&gt; &lt;span&gt;आला&lt;/span&gt; &lt;span&gt;ते&lt;/span&gt;. &lt;span&gt;मी&lt;/span&gt; &lt;span&gt;तेवढ्यात&lt;/span&gt; &lt;span&gt;स्कूटरचा&lt;/span&gt; &lt;span&gt;नंबरही&lt;/span&gt; &lt;span&gt;बघून&lt;/span&gt; &lt;span&gt;घेतला&lt;/span&gt; &lt;span&gt;होता&lt;/span&gt;.'' &lt;span&gt;एवढं&lt;/span&gt; &lt;span&gt;होईतो&lt;/span&gt; &lt;span&gt;स्कूटर&lt;/span&gt; &lt;span&gt;जवळ&lt;/span&gt; &lt;span&gt;आली&lt;/span&gt;. &lt;span&gt;मुलगी&lt;/span&gt; &lt;span&gt;उतरली&lt;/span&gt; &lt;span&gt;आणि&lt;/span&gt; &lt;span&gt;त्याचवेळी&lt;/span&gt; &lt;span&gt;झोपडीच्या&lt;/span&gt; &lt;span&gt;बाजूने&lt;/span&gt; &lt;span&gt;एक&lt;/span&gt; &lt;span&gt;दीडेक&lt;/span&gt; &lt;span&gt;वर्षाचं&lt;/span&gt; &lt;span&gt;पोर&lt;/span&gt;, &lt;span&gt;अंगात&lt;/span&gt; फक्त &lt;span&gt;&lt;/span&gt;&lt;span&gt;सदरा&lt;/span&gt; &lt;span&gt;आणि&lt;/span&gt; &lt;span&gt;कमरेला&lt;/span&gt; &lt;span&gt;करदोटा&lt;/span&gt; &lt;span&gt;अडकवलेलं&lt;/span&gt;, &lt;span&gt;मातीच्या&lt;/span&gt; &lt;span&gt;ढेकळातून&lt;/span&gt; &lt;span&gt;वाट&lt;/span&gt; &lt;span&gt;काढत&lt;/span&gt; &lt;span&gt;हात&lt;/span&gt; &lt;span&gt;उभारून&lt;/span&gt; &lt;span&gt;स्कूटरकडे&lt;/span&gt; &lt;span&gt;येण्याचा&lt;/span&gt; &lt;span&gt;प्रयत्न&lt;/span&gt; &lt;span&gt;करत&lt;/span&gt; &lt;span&gt;होतं&lt;/span&gt;. &lt;span&gt;तो&lt;/span&gt; &lt;span&gt;स्कूटरस्वार&lt;/span&gt; &lt;span&gt;त्याच्याकडे&lt;/span&gt; &lt;span&gt;पाहून&lt;/span&gt; &lt;span&gt;हसत&lt;/span&gt; &lt;span&gt;होता&lt;/span&gt;.&lt;br /&gt;" &lt;span&gt;हुश्श&lt;/span&gt;! " &lt;span&gt;म्हणून&lt;/span&gt; &lt;span&gt;चालायला&lt;/span&gt; &lt;span&gt;लागतानाच&lt;/span&gt; &lt;span&gt;एक&lt;/span&gt; &lt;span&gt;विचार&lt;/span&gt; &lt;span&gt;मनात&lt;/span&gt; &lt;span&gt;विजेसारखा&lt;/span&gt; &lt;span&gt;घुसला&lt;/span&gt;. &lt;span&gt;कुठून&lt;/span&gt; &lt;span&gt;कुठे&lt;/span&gt; &lt;span&gt;आलो&lt;/span&gt; &lt;span&gt;आपण&lt;/span&gt;. &lt;span&gt;काळ्या&lt;/span&gt; &lt;span&gt;मातीबरोबरच&lt;/span&gt; &lt;span&gt;बापाचं&lt;/span&gt; &lt;span&gt;वात्सल्यही&lt;/span&gt; &lt;span&gt;सिमेंटखाली&lt;/span&gt; &lt;span&gt;गाडलं&lt;/span&gt; &lt;span&gt;आपण&lt;/span&gt; !&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-2192505655147307691?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/2192505655147307691/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=2192505655147307691' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/2192505655147307691'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/2192505655147307691'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2008/09/blog-post_01.html' title='कल्पित आणि सत्य'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-3403325178798732220</id><published>2008-07-10T21:45:00.000-07:00</published><updated>2008-09-21T11:17:28.712-07:00</updated><title type='text'>मन</title><content type='html'>कधी कधी मन सैरभैर होतं आणि काहीही करायला नकार देतं. मग अशा वेळी काय करायचं? मनाला मोकळं सोडून द्यायचं. त्याला जिकडे जायचं असेल तिकडे जाऊ द्यायचं. मग ते उधळतं कधी लहानपणाचे धागे उसवत तर कधी एकदम शेवटाचे    पाश कवटाळू पहात. मन असं का करतं? कोण जाणे ! आता या क्षणी काहीही करायचं नाही आहे मला ....... असं म्हणता म्हणता मागच्या आठवड्यातला एक समारंभ नजरेसमोर येतोय. कदाचित सांगता सांगता मन जाग्यावर येईल.&lt;br /&gt;कोल्हापूरजवळ सादळेमादळेनजिक "निसर्ग " म्हणून एक ठिकाण आहे.  डोंगराच्या कुशीत वसवलेलं. हिरव्यागार वनराजीनं वेढलेलं. शुध्द हवेचं. रहाण्याची आणि जेवणाची उत्तम सोय असलेलं. तुम्ही टेबल खुर्चीवर बसून जेवायला कंटाळला असाल तर मस्तपैकी बैलगाडीत बसून जेवा ना! म्हणजे बैठक घोंगडं अंथरलेली आणि पाठ टेकायला दोन्ही बाजूला बैलगाडीची चाकं टेकवलेली. जेवण मस्तपैकी गावरान ( अर्थात "दोन्ही" प्रकारचं) एका भिंतीवर पितळेचा  सगळा जुन्या पध्दतीचा संसार मांडलेला ( जो रात्री पोत्यात भरून ठेवला जातो) आणि भिंतीवर खाली घरकामात रंगलेल्या बायका रंगवलेल्या .. कुणी दळतेय तर कुणी भाकरी थापतेय. रोजच्या कुकरच्या शिटीपासून आणि फ्रिजच्या भाजीपासून दूर घेऊन जाणारं वातावरण ताजतवानं करतं आपल्याला!&lt;br /&gt;आता थोडे कामाचे विचार येऊ लागलेत मनात. पण इतक्यात नाही उठायचं . अजून थोड्या गप्पा. कोल्हापूरपासून २० - २५ मिनिटांच्या अंतरावर काडसिध्देश्वराचा मठ आहे, कण्हेरी  या ठिकाणी.  या ठिकाणी एक खेडं वसवलं आहे मठाच्या वतीने . पण या खेड्यात माणसं रहात नाहीत, राहतात पुतळे, आणि ते घडवणारे  कर्नाटकातले कारागीर, ज्यांनी शिल्पकलेचा ५ वर्षाचा अभ्यास केला आहे. एका वेसवजा कमानीतून २५ रुपयांचं तिकीट काढून तुम्ही आत शिरता आणि छोट्या छोट्या घरांच्या खेड्यातच प्रवेश करता. खेडं खोलगटात वसलेलं आहे आणि त्याची रचना पूर्वीच्या खेड्याप्रमाणे केली आहे. बारा बलुतेदार आपापल्या घरात बसून आपापले व्यवसाय  करताहेत आणि हे पुतळे आहेत याची पूर्वकल्पना असूनही आपण दरवेळी एखाद्या पुतळ्याला माणूस समजून फ़सतो.  इथे आपल्याला गवंडी, सुतार, लोहार, चांभार, सोनार, तेली बुरुड, कोरवी, नालबंद, न्हावी, कासार, कोळी, शिंपी, तराळ भेटतातच पण वतनदार, वैद्य, पंचांग सांगणारा ब्राह्मण  चावडीवर वाद मिटवणारे पंच, कीर्तन करणारे प्रवचनकार इतकंच नव्हे तर जीव तोडून भुंकणारी  कुत्रीही  भेटतात. पाटावर शेवया कराणा-या बायका दिसतात तशी गोधडी शिवणारी आजीही दिसते. बैलगाडीत बसून सासरी चाललेल्या मुलीचे अश्रू पुसायला आपले हात पुढे होतात आणि त्याच वेळी तिच्या गाडीमागून खांद्यावर सामानाचं गाठोडं घेऊन निघालेला बाप आणि घराच्या अंगणातून निरोप देणारी आई बघून घशाशी आलेला आवंढा परतवायला त्रास होतो.  प्रत्येक पुतळा म्हणजे मूर्तीमंत शिल्प. कासारणीकडे बांगड्या भरणारी लेकुरवाळी बाळाला पाजतेय तर बाळ हात लांब करून तिच्या मंगळसूत्राशी खेळतय. तिच्या पायातली साखळी जमिनीवर लोळतेय. दागदागिने, पेहराव, चेहरे घरातलं सामानसुमान, ते ठेवण्याची पद्धत  यांचा इतका बारकाईने विचार केला आहे की "वा! सुंदर! अप्रतीम!" याशिवाय आपण काही बोलूच शकत नाही.&lt;br /&gt;खेड्यापासून थोडं लांब शेतं आहेत. मधल्या पायवाटेनं गेलं की सुरवातीला पाणवठा, पुढे कुरणात गाई, म्हशी, बक-या  चरत आहेत तर डाव्या बाजूला एका शेतात नांगरणी चालली आहे तर दुस-या शेतात कुळवणी चालली आहे. कुठे शेतकरीदादा मोटेनं शेताला पाणी पाजतोय तर कुठे खळ्यावर मळणी,  उफणणीची धामधूम चालली आहे. हे सगळं इतकं खरं आणि वास्तव की  म्हशीच्या डोक्यावरच्या कावळ्यासकट आणि पाठीवरच्या पोरासह, शेताच्या बांधावरच्या म्हातारबाबासह प्रत्येक शिल्प  आपली दाद घेऊन जातं. म्हणजे पुतळे बघून त्यांना लाला म्हणायचं की गनपा, मालक म्हणायचं की हनम्या हे आपण समजू शकतो.  एकदा तरी ह्या खेड्याला भेट द्यावी आणि परत आलं की आपल्या माणसांना घेऊन परत जायचं अशी खूण मनाशी बांधावी असं वाटायला लावलेलं हे खेडं!&lt;br /&gt;मन म्हटल्यावर ल क्षात आलं की खरचं मनाला कधी कधी असं स्वैर सोडून दिल्यावरच ते ताळ्यावर येतं. म्हणून म्हटलं कधी कधी मन तुमचं ऐकेनासं झालं की त्याला खेचू नका, असंच मोकळं सोडून द्या, भटकू दे त्याला हवं तसं थोड्या वेळानं आपोआपच ते परत येतं आपल्या जागी. कानात वारं शिरल्यावर  हुंदडून परत आईला ढुसण्या देणा-या वासरागत!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-3403325178798732220?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/3403325178798732220/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=3403325178798732220' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/3403325178798732220'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/3403325178798732220'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2008/07/blog-post.html' title='मन'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-2605575565558986086</id><published>2007-09-05T01:38:00.000-07:00</published><updated>2007-09-05T04:35:37.509-07:00</updated><title type='text'>बोरिस जोशी</title><content type='html'>अखेर शेवटी काल बोरिस जोशीच्या नावाआधी कै लागलं. ते लागणार हे गेले २ महिने दिसतच होतं. ह्ळू हळू ज्या पध्द्तीने त्याची तब्येत ढसळत होती ते पाह्ता हे घडणार हे सगळेजणच समजून होते. नाही तर त्या आधी सकाळ संध्याकाळ तो फ़िरायला जायचा. म्हणजे कोंणी ना कोणी त्याला घेऊनच जायचं त्यामुळे त्याचाही नाईलाज व्हायचा. नपेक्षा शक्य तो जागा न सोडावी हा त्याचा मानस असायचा. फ़िरायला जातानाही त्याची शान बघून घ्यावी. हा म्हणजे  मागच्या जन्मी कोणी बडा सरकारी अधिकारी असल्यासारखा इकडे तिकडे ढुंकूनही बघणार नाही. आपण मारे" काय बोरुनाना, फ़िरायला चालला वाटतं " असं मोठ्या प्रेमानं विचारावं तर रावसाहेब दुसरीकडेच बघणार." मेल्या, आता घरातली माणसं बाहेर गेली की हाक मार, मग साम्गते तुला" असं चिडून म्हणावं की नाईलाजाने नजर टाकल्यासारखं करणार. पण एकंदरीत अविर्भाव उपकार केल्याचा.&lt;br /&gt;बारा वर्षांपूर्वी एके दिवशी समोरच्या जोशांच्याकडे जेव्हा एक कापसाचं बंडल चार पायावर दुडदुडायला लागलं तेव्हा आमच्या घरातल्या सगळ्यांनीच तिकडे धाव घेतली. विशेषत: शाळकरी निकेतने पळता पळता पुढे जाणार्‍या बाबांकडे जो कटाक्ष टाकला होता तो स्वच्छ वाचता येत होता, " आपण पाळू या म्हटलं तर नको म्हणतात आणि आता कशाला पळताहेत ?" त्या पिलाभोवती भोवती करताना सुरवातीला कितीदातरी शाळेची वेळ टळून जात असे. कारण निकेत , निनादला त्याला अगदी 'पोलिसी कुत्रा ' करायचं असायचं. त्यामुळे त्यांनी त्याच्या " शिक्षणाची "सगळी जबाबदारी शिरावर घेतलेली असायची.बोरुही फ़ेकलेला चेंडू आणणं   जोरात पळणं  या सगळ्या कसरतीत  बालसुलभ उत्साहाने भाग  घ्यायचा.   कधी कधी तर मोहनने पळवत तळजाईवर नेलं तर चक्क पळत जायचा. [ अर्थात तळजाईवर जाईपर्यंत तो स्कूटरवर बसायचा हे उघडच आहे] कालांतराने बोरिसचं वेळापत्रक संभाळण्याची संपूर्ण जबाबदारी शुभदावर आली आणि ती एक ओघाने येणारी गोष्ट झाली ते वेगळं. त्यामुळे त्याला शिस्त लावताना बोरिसने शुभदाचे किती फ़टके खाल्ले असतील ते बोरिसच जाणे ! पण त्या फ़टक्यांचा धाक अखेरपर्यंत होता. शेवटी शेवटी एक गावठी कुत्रं बोरिसच्या दारावरून चालालं होतं , चक्क मान वर करून. किंचित किलकिलं रहिलेल्या दारातून बोरिसनं ते बघितलं, " बूढा हुवा तो क्या हुवा,  शेर कभी घास नहीं खाता " या अविर्भावत तो लंगडतच त्याच्यावर चाल करून गेला आणि ' आई ' मारणार म्हणून दारातच दबून उभा राहिला. अर्थात आजारी असल्यामुळे शिक्षा झाली नाही तो भाग वेगळा. आजी आणि दादांनी केवळ नातवंडांच्या प्रेमाखातरच त्या ' राक्षसा'ला घरात घ्यायला परवानगी दिलेली असल्यामुळे आणि बोरिस मोठा होता होता खरोखरच 'राक्षस ' दिसू लागल्यामुळे त्याला फ़िरवणे हा प्रकार त्या दोघाम्नाही शक्य नव्हता. त्यामुळे बोटीवरून सुटीला आला की मोहन, शाळा क्लास यातून वेळ मिळाला की नेहा, निनाद यांना बोरिस फ़िरवून आणायचा. इतर वेळी बोरिस आणि त्याची "आई." मग अशा वेळी मला जोर चढे, " बघा, आधी नाचतात पाळू या म्हणून आणि मग सगळी जबाबदारी पडते घरच्या बाईवर." बोरिस तसा शांत स्वभावाचा किंवा आपल्या ताकदीवर पूर्ण विश्वास असल्यामुळे की काय पण कुणाकडे फ़ारसं लक्ष द्यायचा नाही. त्याने नुसती मान वर करून भुंकणार्‍या कुत्र्याकडे बघितलं तरी त्या कुत्र्याची बोलती बंद होवून शेपूट पायात जात असे. त्याचा प्रतिस्पर्धी म्हणजे राळ्यांचा सोनू. बोरिस फ़िरायला निघाला की सोनू भुंकून भुंकून तोंडाला फ़ेस आणत असे. पण बोरिस शांत. पण एकदा त्याच्याही अंगात दीवारमधला अमिताभ संचारला होता की काय न कळे, गळ्यातल्या पट्ट्यासकट राळ्यांच्या घरात शिरून त्याने सोनूला असा लोळवला की अखेरपर्यंत बोरीस दिसला की सोनू आज्ञाधारक दासाच्या भूमिकेत शिरायचा. योगायोग म्हणजे बोरिस जाण्याआधी एक दिवस सोनु ' गेला.' &lt;br /&gt; बोरिस आमच्या दोन्ही घरात विभागला गेला होता. म्हणजे जोशी मंडळी बाहेर गेली की बोरीसचं पालकत्व आमच्याकडे असायचं. घर बंद झालं की अर्ध्या तासातच त्याच्या हाका सुरू होत. आपण जरा दुर्लक्ष केलं की बंद दाराला नखांनी खाजवून तो आपला निषेध व्यक्त करी.दार उघडलं की घराभोवती एक फ़ेरी मारली की त्याचं समाधान होई. मग परत तो आत जायला तयार ! कोणी पाहुणा आला आणि त्याला बाल्कनीत कोंडलं आणि  फ़ाटक उघडून पाहुणे बाहेर पडलेले दिसले की हा दार ढकलत रहायचा आत घेण्यासाठी.लहान असताना किरकिर्‍या मुलासारखा बराच वेळ त्याचं भुंकणं चालायचं. मोठा झाल्यावर संध्याकाळच्या सिरियल्स लागल्या की याला ' नरडं ' साफ़ करायची हुक्की येत असे. त्यासाठी त्याने आम्हा सगळ्यांच्या शिव्या खाल्लेल्या होत्या. अपवाद मणजे निनाद आणि विलास. ही दोन माणसं त्याने काहीही केलं तरी यशोदेनं कान्ह्याच्या बाललीलांकडे बघावं तशी बघायची.&lt;br /&gt;हळू हळू आजींच्या राक्षसाचं " बोरु " त कधी रुपांतर झालं ते त्यांनाही कळलं नाही. इतकं की दादू, बबी सारखं हे नातवंडही आजींकडून गुपचुप लाड करून घ्यायला लागलं.आणि आम्हाला तर कितीजणांनी  "आपल्या शत्रूपक्षा"त टाकलं असणार.&lt;br /&gt;वय झालं की माणसांसारखीच कुत्र्यांनाही दुखणी होतात हे नवच  ज्ञान आम्हाला झालं. शेपटाला झालेली जखम इतकी प्राणघातक असेल असा संशयही येऊ नये इतक्या पटकन बोरुनानांची तब्येत ढासळत गेली. तसंही आपल्या हिशेबाने त्यांचं वय ७५ झालच होतं. आपल्यामुळे घरच्यांना त्रास नको असं म्हटल्यासारखं त्याने आपला मुक्काम बेसमेंटमध्ये हलवला. अगदीच आठवण झाली की तो वर घरात जाई.पण अखेर अर्ध्या अंगातली शक्ती पूर्णपणे गेल्याने त्याला एक पायरीही चढवेना. आपली अखेर कळल्यासारखा तो शेवटच्या दिवसाची वाट पहात पडून राहू लागला.त्याच्या यातना न बघवून त्याला अखेर इच्छामरण दिलं .&lt;br /&gt;आज तो मते फ़ार्ममधल्या जोशांच्या बागेत चिरविश्रांती घेतोय. या जगात कुठलीच गोष्ट विनाश पावत नाही; ती संपूर्णपणे नाहीशी होत नाही.   त्याला पुरलेल्या ठिकाणी त्याची आठवण म्हणून  लावलेलं झाड वर्षभरात वाढेल. त्याच्या पानांचं हिरवेपण , फ़ुलांचा सुगंध जीवनाचं गाणं गात राहतील. त्या झाडाच्या पारावर बसून गप्पा मारताना मध्येच बोरुची आठवण निघेल. त्याच्या खोड्यांना हसताना प्रत्येकाच्या मनात त्याच्या वेगवेगळ्या आठवणी जाग्या होतील, पण त्या सगळ्या आनंदगान गाणार्‍या असतील, नक्कीच !&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-2605575565558986086?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/2605575565558986086/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=2605575565558986086' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/2605575565558986086'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/2605575565558986086'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2007/09/blog-post.html' title='बोरिस जोशी'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-4754492292237295909</id><published>2007-08-21T04:27:00.000-07:00</published><updated>2007-08-21T05:27:11.019-07:00</updated><title type='text'>उंच उभारलेले हात</title><content type='html'>कोल्हापुरच्या बालसंकुलाला भेट द्यायला जाताना मन द्विधा मनस्थितीत होतं. सिनेमात बघि्तलेले अनाथाश्रम, तिथल्या पायरीवर बाळ ठेऊन चेहरा पदरा आड लपवत जाणाया नायिका हे डोक्यात इतकं भिनलेलं होतं की इतकं वय झालं तरी एक मन त्यातून बाहेर पडायला तयार नव्हतं.दुसरं निबर झालेलं मन अगदी व्यावहारिक पातळीवर या सगळ्याचा विचार करत होतं.रिक्षातून उतरताना दिसली ती इमारत नेहमीच्या शाळेसारखीच वाटली. म्हणजे मधोमध थोडीशी मोकळी जागा, ध्वजारोहणाचा खांब, आणि भोवताली दगडी इमारती. आम्हाला पाहून स्टाफ़ची थोडी जलद हालचाल झाली . बंधूंनी त्यांची कामं आटोपली आणि इमारतीचा फ़ेरफ़टका मारायला आम्ही दोघी बहिणी त्यांच्यामागून निघालो. पहिलीच खोली तान्ह्या बाळांची होती. पाय क्षणभर थबकले. भाच्यांचे शब्द आठवले, " आत्या, फ़ार कसं तरी होतं ग, तिथे जाऊन. " पण आतून स्वागताला तिथल्या बाई दारात येऊन उभ्या होत्या. आत पाऊल टाकताच दिसले ते सगळ्या खोलीभर झुलणारे पाळणे आणि त्यात डोलणारं बालब्रह्म. कुणी मुठी चोखतय, कुणी डोळे मिटून स्वप्नरंजनात मग्न, तर कुणी कुशीवर वळून पोटाची सोय अलगद तोंडात पडते का ते शोधण्यात गुंग. काळ्यासावळ्या निरागसतेला एक सामाजिक बंधनाची करुण किनार झुलत होती पाळ्ण्याच्या लयीत.दुसरी खोली थोड्या मोठ्या मुलांची होती. आत पाऊल टाकताच डोळ्यासमोर आले ते छोटे छोटे हात. ब्रह्मांड आठवलं. पायात शिशाचे गोळे उतरले.दाही दिशा लोपल्या. डोळ्यासमोर फ़क्त चिमुकले हात, उंचावलेले. एकाला हाताशी धरावं तर दुसरा हाताशी झोंबतो, कुणा एकाने तर पायाला मिठीच मारली.त्याला उचलून कडेवर घेतलं तर त्याने गालावर पाप्या घेऊन गाल ओला करून टाकला. घशाशी येणारा हुंदका परतवत त्याला घट्ट छातीशी आवळत बसकण मारली.मागून पुढून सगळ्या बाजूंनी त्या छोट्या हातांनी मी वेढली गेले. मग कुणाला मांडीवर बसवून तर कुणाला शेजारी बसवून " आपडी थपडी" खेळले तर कुणाशी डोळे झाकून " बुवाआआअ भो: " केलं. निघायची वेळ झाली तरी गळामिठी सुटेना. पण मग त्यांच्या बाई बोलल्या, " चला, सोडा त्यांना, कामाला जायचय त्यांना. " लगेच हात सुटले. एका बाजूला सगळी बाळं गोळा झाली. " मी मग येते हां " असं म्हटल्यावर हात टा टा करायला हलले. क्षणापूर्वी चमकलेले डोळे परत निर्विकार झाले.खोलीच्या दारातून बाहेर पडताना दहा पंधरा मिनिटांचा तो वात्सल्याचा रंग पाठीला चटके देत होता. मोठ्यांच्या सामाजिक नीतिमत्तेच्या दबावाखाली भरडलं जात असलेलं बालपण , मूकपणे वाट पहात होतं मोकळा श्वास मिळण्याची.&lt;br /&gt;घरी परताना एक गोष्ट जाणवली ती ही की, २ ३ वषांची मुलं बोलत नव्हती. आप्पाला विचारलं तर त्यानं साम्गितलेलं सत्य हे की, त्यांच्याशी बोलायला कुणी नसतं. त्यामुळे दत्तक गेल्यानंतर बोलू लागणारी ती मुलं ऐकू शकत असली तरी बोलू शकत नव्हती.आपल्या घरात बाळाचं आगमन झाल्या दिवसापासून सगळेजण त्याच्याभोवती गोळा होऊन बडबड करत असतो. इथे एवढी मोठी मुलं कुणी बोलायला नाही म्हणून मुकी ?आपण आपल्या मनाशी समाजसेवेचे काही ठोकताळे बांधलेले आहेत असं मला वाटायला लागलं. त्या मुलांना खाऊ दिला, कपडे दिले, वेगवेगळ्या स्पर्धा भरवल्या की आपलं काम संपत नाही. या छोट्या मुलांना त्याची काय मातबरी ? त्यांचे डोळे आसुसलेले असतात मायेचं माणूस बघायला, कान लागलेले असतात छातीतल्या ठोक्याचं अंगाईगीत ऐकत झोपण्याकडे,हात शोधत असतात आधार.  मला वाटतं , की हे सगळं या मुलांना दिलं पाहिजे,  त्यांची मूळ गरज आहे ती मायेच्या उबेची. त्यांच्याशी बोलण्याची. त्यांना जवळ घेण्याची. आपल्या आठवड्यातला एक तास आपण  त्यांना देऊ शकणार नाही का ?  मात्र भावनेच्या भरात हो म्हणू नका. कारण कोणतीही गोष्ट करताना आपण चार वेळा जाऊन ती मग करणं बंद करणार असू तर ती न करणं चांगलं. कारण कुणालाही आशा लावून सोडून देणं हे अधिक निश्ठूरपणाचं आहे. विचार करा, आपले लहानपणाचे दिवस आठवा. क्षणभर आई दिसली नाही तर आपली होणारी हालत आठवा, कदाचित तुमची पावलं तुमच्या गावातल्या बालसंकुलाकडे वळतील, त्या उभारलेल्या हातांना अलगद मिठीत घेण्यासाठी. &lt;br /&gt;&lt;br /&gt;draft&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-4754492292237295909?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/4754492292237295909/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=4754492292237295909' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/4754492292237295909'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/4754492292237295909'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2007/08/blog-post.html' title='उंच उभारलेले हात'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-303496566600640671</id><published>2007-06-27T03:05:00.000-07:00</published><updated>2007-06-27T03:54:05.576-07:00</updated><title type='text'>एक वर्तुळ पूर्ण झालं</title><content type='html'>श्रीरामपूरमध्ये मुलाच्या मित्राचं लग्न होतं आणि श्रीरामपूरपासून ८ कि. मी. वर हरिगाव आहे. आता पुण्याहून इतक्या लांब आल्यानंतर हरिगावला भेट देण्याची इच्छा होणं अगदी स्वाभाविक होतं. कारण हरिगाव आणि आमचं सगळ्यांचच, म्हणजे आम्ही, नवरदेवाकडची मण्डळी आणि जमलेल्यांपैकी बहुसंख्य व‍र्‍हाडी मंडळीच हरिगावशी आतडं जुळलेलं होतं. हरिगाव म्हणजे नगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरजवळचं बेलापूर शुगर कंपनी जिथे ६४ -६५ वर्षं दिमाखाने वसली, नांदली आणि १९ वर्षांपूर्वी जिला टाळं लागल्यानंतर जिथली माणसं आपापल्या संसारानिशी रानभैरी झाले ते गाव. अक्षत पडल्यानंतर हरिगावला जाण्याचा विचार बोलून दाखवताच सगळ्याम्नी कळवळून कळकळीचा सल्ला दिला, " कशाला जाताय ? नाही बघवणार तुम्हाला. उगं रडत परताल. आता काय उरलय तिथं ? सगळं उजाड झालय. नका जाऊ. "पण ते तर होणं नव्हतं. किंबहुना लग्नाला इतक्या लाम्ब येण्याचं ते एक प्रमुख कारण होतं. गेली १९ वर्षं तिथल्या परिस्थितीबद्दल इतक्याजणांकडून इतकं ऐकलं होतं, की मन त्या सगळ्याला सामोरं जायची तयारी करून होतं.गाडी श्रीरामपूरहून हरिगावच्या रस्ताला लागली आणि आमचा रिप व्हऍन विंकल झाला. सतत हरिगाव - श्रीरामपूर ये जा करून ज्या रस्त्याचा कण न कण ओळखीचा आहे असं वाटत होतं, तो रस्ता वाढलेल्या वस्तीमुळे अनोळखी वाटायला लागला होता. नेवासा फ़ाट्याकडून गाडी हरिगावच्या रस्त्याला लागली आणि डाव्या बाजूला छोट्या मोठ्या घरांच्या समोरच्या बागा बघून मन उल्हासित झालं. वाकड्या लिंबाच्या वळणावरून पुढे गेल्यानंतर दुतर्फ़ा हिरवीगार झाडं खडी ताजीम देत होती.पूर्वी हा उघडा बोडका माळ होता. आता त्यावर ४, ५ मोर फ़िरताना दिसत होते. लोक उगीचच जुन्या आठवणीत रमतात आणि नव्याचा स्वीकार करत नाहीत असेही विचार मनात यायला लागले आणि ध्यानीमनी नसताना कोणीतरी फ़ाडकन कानसुलात द्यावी तसं झालं. " पाच खोल्या" या नावाने ओळखली जाणारी चाळ बॉम्ब स्फ़ोटात उध्वस्त व्हावी तशी फ़क्त भिंतींच्या रुपात उभी होती. दारं, खिडक्या, छप्पर काही काही शिल्लक उरलं नव्हतं. तिथे राहणारी एक एक माणसं आठवायला लागली. खरच होतं लोक म्हणत होते ते. उरी बाळगलेल्या जखमा नख लावून उसवायची काय गरज होती, असा विचार मनात येईतो गाडी हरळी गे्टमधून कॉलनीत शिरली. हरळी गेटवरचं कारंजं केव्हाच नामशेष झालं होतं.१९ वर्षांच्या धुळीखाली हरळ गाडली गेली होती. इथेच आम्ही मैत्रीणी, आमच्या सासवा, मुलं संध्याकाळचा वेळ घालवत होतो. सुख दु:खाच्या गोष्टी बोलत होतो.&lt;br /&gt;गाडी आम्ही रहात असलेल्या बंगल्यासमोर आली.फ़ाटक उघडून आत जाण्याचा प्रष्नच नव्हता.कारण फ़ाटक जाग्यावर नव्हतं, कंपाऊंडच्या तारा नव्हत्या. पण हे आम्ही ऐकूनच होतो, की हरिगावात राहिलेल्या लोकांनी जळणासाठी बंगल्यांची फ़ाटकं , खिडक्या उचकटून नेल्या, तारा भंगारात विकल्या.त्यासाठी त्यांना तरी कोणत्या तोंडाने दोष देणार ? भुकेपुढे प्रतिसृष्टी निर्माण करणार्‍या विश्वामित्राचा पाड लागला नाही तर सर्वस्व गमावून भांबावलेल्या कामगारांचा काय दोष ? हे एक वेळ समजून घेतलं तरी दारातली आंब्याची, चिकू , जांभळाची झाडंही दिसेनात. ज्या आंब्याखाली मुलं लहानाची मोठी झाली, ज्याची सुमधुर फ़ळं सगळ्या हरिगावाने खाल्ली ते आंब्याचं झाड समूळ नाहिसं झालं होतं.पुढेपासून मागेपर्यंत पारध्याने एक एक पाखरू नेम धेरून टिपावं तशी झाडं  नाहिशी  झाली होती. आंबा, रामफ़ळ सीताफ़ळ, चिकू, माड, आवळा सगळे सगळे नाहिसे झाले होते. उरला होता एक जमिनीचा मोकळा तुकडा.बोरी चिंच, काटेरी झुडपं यांनी गुंतलेला आणि मध्ये धुळीची पुटं चढलेला बंगला, आमचं घर., आणि किलकिल्या दारांना डोळी लावून आत डोकावून पाहणारे आम्ही. न रहावून लेकीने खिडकीत तोंड खुपसून हाक मारली, " आजोबा, आजोबा ".तिच्या वेडेपणाला आम्ही मोठी माणसं हसलो, पण आतून सगळेजणच आपल्या गजबजलेल्या भूतकाळाला साद घालत होतो, मनातल्या मनात.त्या क्षणी एखादी दैवी शक्ती आम्हाला मिळाली असती तर आमच्यापैकी प्रत्येकाने कालचक्र २० वर्षंमागे नेलं असतं.हरिगावातल्या वेगवेगळ्या भागातून आम्ही फ़िरलो,. काही ठिकाणी कामगारवस्तीत जाग होती तर काही ठिकाणी पडझड झाली होती.नियोजनशून्य , बेपर्वा निष्ठूर राजकारणात बळी गेलेल्या आमच्या निसर्गरम्य साध्यासुध्या जीवनाचं कलेवर पाठीवर घेऊनच आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.कोणाचं कुठे कसं आणि काय चुकलं याचे मनाशी हिशेब करत.निष्फ़ळ हिशेब.&lt;br /&gt;हा सगळा प्रसंग मी माझ्या अमेरिकेतल्या लेकाला सांगत होते. कधी आवाज भरून येत होता, तर कधी स्वरात हताश कोरडेपणा होता. तोही बारीकसारीक तपशील विचारत होता. अचानक त्याने प्रष्न विचारला, " आई, तुम्ही हरिगावात किती वाजता होता ? "&lt;br /&gt;" साधारण दुपारी ३- ४ च्या सुमाराला. का रे ? "&lt;br /&gt;" आई, अग, त्याच वेळी मला स्वप्न पडलं की मी आणि बाबा आपल्या शेजारच्या घरात हरिगावला उभे आहोत. मला जाग आली तेव्हा इकडे पहाटेचे ४ वाजले होते."&lt;br /&gt;म्हणजे आम्ही ज्यावेळी हरिगावात होतो तेव्हा हजारो मैलांवरून मनाने तोही आमच्याबरोबर होता. अखेर कुठेही गेलो, तरी आपली मुळं जिथे घट्ट रोवलेली असतात, ती माती आपल्याला साद घालतेच.&lt;br /&gt;draft&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-303496566600640671?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/303496566600640671/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=303496566600640671' title='7 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/303496566600640671'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/303496566600640671'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2007/06/blog-post.html' title='एक वर्तुळ पूर्ण झालं'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>7</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-1093314925870010467</id><published>2007-05-30T08:59:00.000-07:00</published><updated>2007-06-01T06:34:49.418-07:00</updated><title type='text'>हरिगावातले सण</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;मी लग्न होवून हरेगावला आले तेव्हा कारखान्याचा सरता काळ सुरू झाला होता आणि आपल्या हातातून वाळू सरकून जातेय हे फ़ार थोड्यांच्या लक्षात येत होतं. वरवर सगळं पूर्वीसारखंच चालू होतं. संध्याकाळी वाड्यांवरून डल्लॉप गाड्या जिमखान्यात येत, खेळणार्‍यांच्या आरोळ्या उठत, पण प्रमाण कमी होत होतं.पूर्वी जशी खेळायला टे. टे. चं टेबल मिळण्यासाठी किंवा बॅडमिंटनसाठी कोर्ट मिळण्यासाठी भांडणं होत, तसा काही प्रकार उरला नव्हता. पण तरीही हरेगावी दिवस म्हणजे झाडाच्या शेंड्यावरचे पोपटच भासत होते. तसेच उत्फ़ुल्ल. मग भले ते जग केवळ अधिकारीवर्गाचं का असेना.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जिमखान्यात चैत्राचं महिला मंडळाचे हळदीकुंकू, कांदेनवमी असे कार्यक्रम उत्साहाने साजरे होत होते. शे-सव्वाशे बायका आणि त्यांची मुलं जमून नुसती धम्माल करत.. पण सगळ्यात उत्साहाने साजरे होणारे सण म्हणजे गणेशचतुर्थी, दसरा आणि संक्रांत. त्या दिवसात म्हणजे आमच्या घरी जत्रा उसळत असे. माझे सासरे हे कारखाना सुरु झाल्यापासूनच तिथं कामाला होते. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करणार्‍यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे गणपती सार्वजनिक असला तरी आमच्याकडे घरात लगबग आणि राबता चालूच राही. गणपतीच्या पूजेसाठी रोज सकाळी घरातून तबक जात असे. त्यात ठेवण्यासाठी सासूबाई सुरेख हार करत. कधी जाईचे, कधी जुईचे, कधी दुर्वांचे... अनंत चतुर्दशीला सगळ्या गावाला घरचा पंचखाद्याचा प्रसाद असे. त्यादिवशी गणपतीची मिरवणूक फ़र्लांगभर अंतरावर आलली की सास~यांची गडबड सुरू होई, ' बाई, (ते सासूबाईंना बाई म्हणत, आणि त्यांच्याशी कोकणीत बोलत) सगळां ठेवलसस मा ? प्रसाद ठेवलस ना भरपूर, गुरुजी येतीत आत्ता. काशीनाथ, चल लवकर दारात उभा रहा लवकर.' नुसता गोंधळ उडवून देत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दसरा आणि संक्रांतीला तर ते आणि सासूबाई संध्याकाळी ५ वाजताच सगळं आटपून बसत . पध्दत अशी की दसर्‍याला लहानांनी सोनं लुटायचं आणि संक्रांतीला मोठ्यांनी तिळगूळ द्यायचा. मग बेलापूर गावातून ४, ५ किलो रेवड्या आणि किलो दोन किलो तिळगूळ आणला जायचा. रेवड्या भाऊंनी द्यायच्या आणि तिळगूळ सासूबाईंनी. पहिले भाऊंच्या खात्यातले हमाल यायचे ५ वाजता. मग जी रांग सुरू व्हायची ती रात्री १० वाजेपर्यंत. साधारण ७च्या सुमाराला म्हणजे फ़ुल्ल मारामारीच. फ़ाटकाकडे वाल्हा उभा असायचा. कारण वात्रट मुलं एकमेकांचे शर्ट घालून २,२ ३,३ वेळा रेवड्या न्यायला यायची. मग वाल्हाचा आरडाओरडा " ईईए ए, आल्ता न तू मघा, उजुक का आला रे ****." की आतून कोणीतरी वाल्हाला आठवण करून देत असे की आज ' ति्ळगूळ घ्या गोड बोला "चा सण आहे. मग थोडा वेळ शांतता असे. काही हमाल बायकांना, नव्या सुनेला घेऊन येत. मग त्या आत माजघरात येऊन बसत... नव्या नवरीला नाव घेण्याचा आग्रह होई. काही बायका अगदी आगगाडीसारखी लांबलचक नाव घेत. साधारण ९ पर्यंत हा कल्ला असे आणि मग अधिकारीवर्गाची दुसरी फ़ळी येत असे. त्यांच्यासाठी तिळाचे लाडू घरी केलेले असत. त्यापुढे जेवण आणि जेवतानाही कोण आलं कोण नाही याची चर्चा चालू असे. दसर्‍यालाही याच नाटकाचा प्रयोग असे, पण फ़रक एवढाच की घरात ढीगभर आपट्याची पानं जमा होत आणि दुसर्‍या दिवशी काशीनाथला आपट्याची पानं झाडावी लागत.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-1093314925870010467?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/1093314925870010467/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=1093314925870010467' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/1093314925870010467'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/1093314925870010467'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2007/05/blog-post_30.html' title='हरिगावातले सण'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-3435899142223890571</id><published>2007-05-25T21:54:00.000-07:00</published><updated>2007-05-28T07:59:04.514-07:00</updated><title type='text'>सीझन</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;साधारणपणे दसर्‍याच्या सुमाराला कारखान्याचा बॉयलर पेटवला जात असेआणि त्या दिवशी पूजा अर्चा करून समारंभाने गव्हाणीत ऊस टाकला जात असे. कारखान्याचा सीझन चांगला चालण्यावर सगळ्यांचं पोट अवलंबून असल्याने सगळा अधिकारीवर्ग सपत्निक हजर असे. आपल्याच घरातल्या समारंभाचा उत्साह सगळ्यांच्या देहबोलीतून ओसंडत असे. आता जाणवतं ते हे की या अशा समारंभाला कामगारवर्गाच्या बायका मात्र उपस्थित नसत. खर तर त्यांचं पोट तर जास्त प्रमाणात कारखान्यावर अवलम्बून होतं. पण काही काही गोष्टी आपण ' तशी पध्दत नाही ' म्हणून दुर्लक्ष करतो त्यातली ही एक . आमचे गुरुजीही मस्तच होते. कारखाना व्यवस्थित चालावा म्हणून इतर देवतांना आवाहन करतानाच ते " शुगरदेवताय नम: " म्हणून मोकळे होत.कारखान्याचा सीझन चालू झाला की सगळं वातावरणच बदलून जाई. पहाट दुपार, रात्र अशा पाळ्यात पुरषांचं आयुष्य आणि देवा ब्राह्मणासमक्ष हाताला हात लावून 'मम ' म्हटलेलं असल्यामुळे त्यांचे डबे करण्यात आणि त्यांची झोपमोड होवू नये म्हणून मुलांचं ध्वनिप्रदुषण रोखण्यात बायकांचं आयुष्य गुंतून जाई. पोरांची अवस्था म्हणजे " ह्यो कोन बाबा आपल्या घरात रोज येतो ग आई, ' अशी होवून जाई. कारण बाबा घरी तेव्हा पोरं शाळेत आणि पोरं घरी तेव्हा बाबा एक तर झोपलेला किंवा कारखान्यात.&lt;br /&gt;सीझन सुरू झाला की कारखान्याचा परिसर एकदम गजबजून जाई. कारखान्यासाठी लागणारा ऊस घेवून येणार्‍या डल्लॉप गाड्यांच्या बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांची किणकिण [ बैलगाडीला डनलॉप टायर्स लावले की डल्लाप गाडी होते.] ऊस लेबर वाहून नेणार्‍या ट्रक्सचा फ़रफ़राट, वातावरणात भरून राही. साखरेची पोती, बगॅसचे गठ्ठे वाहून नेण्यासाठी रेल्वेच्या वॅगन्स छोट्या रुळांवरून थेट श्रीरामपूरहून कारखान्याच्या दारात उभ्या रहात. रस्त्यांच्या कडाम्ना ऊस तोडणी कामगारांच्या त्रिकोणी आकाराच्या तट्ट्याच्या झोपड्या उभ्या रहात. अगदी पहाटे किंवा सांजला त्यांच्या चुलीतला जाळ ढणढणत राही, भाकरी आणि कोरड्यास करायला. संध्याकाळ कधी कधी दारू प्यालेल्या बाप्यांच्या गुरगुराटात आणि मार खाणार्‍या बायांच्या कलकलाटात मिसळून जाई. सगळीकडे रसाचा गोड वास आणि नवीन माणसाचं डोकं उठवणारा मळीचा दर्प दरवळत राही. पुरुषांच्या बोलण्यात क्रशिंग, रिकव्हरी असे शब्द वारंवार येऊ लागत.&lt;br /&gt;कारखान्याचा सीझन सुरू झाला की घरातली बायका मुलं खूष असत.कारण आपली आणि आजूबाजूच्या शेजीबाईंचे मुलं घेऊन कारखाना बघायला जाणं हा एक मनोरंजनाचा पर्याय उपलब्ध झालेला असे. मग मुलांनी आतली अजस्त्र मशिन्स भयचकीत चेह्र्‍याने न्याहाळण , पोटभर रस पिणं गरम गरम साखरेचा बोकणा भरून खिदळणं हे सगळं सगळं बरेच दिवस चर्चा करायला पुरत असे. आमच लग्न ठरल्यानंतर पुण्यात आम्ही भेटल्यानंतर माझे पाय रसवंतीगृहाकडे वळत असत.कारण कोल्हापूरला असली न्हाई ती झेण्गटं नव्हती, कारन" रस कुट असा पितात व्हय ? सरळ रसाचा तांब्याच एका दमात रिकामा करायचा असतोय की राव, " ही कोल्हापुरची विचारधारा तेव्हा होती. पण मी कितीही लाडिकपणे " आपण रस पिवू या ? " असं विचारलं तरी " तू घे ना मी सोबत करतो " असं उत्तर यायचं मग मीही मनातल्या मनात " अरसिक किती हा मेला " असं म्हणत उघड " नको राहू दे तुला नको तर आपण दुसरं काही तरी घेऊ" असं म्हणत असे. पण पहिला सीझन सुरू झाल्यानम्तर नवर्‍याच्या नकाराचं कारण लक्षात आलं. सहा महिने रसाच्या वासात डुंबत राहिल्यानंतर तो तरी बापडा परत रस कसा पिणार ?&lt;br /&gt;पण हळू हळू ३,४ महिन्यांनंतर याचाही थकवा यायचा. मुलांच्या वार्षिक परिक्षा झालेल्या असायच्या आणि मीही कारखान्याचा सीझन कधी सम्पतो आनि आपण मुलाम्च्या मामाच्या गावाला कधी निघतो याची वात बघायला लागायची, मुलांच्या बरोबरीने !&lt;br /&gt;draft&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-3435899142223890571?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/3435899142223890571/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=3435899142223890571' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/3435899142223890571'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/3435899142223890571'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2007/05/blog-post_5638.html' title='सीझन'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-4680878301134164031</id><published>2007-05-20T21:04:00.000-07:00</published><updated>2007-05-20T21:08:29.675-07:00</updated><title type='text'>शब्द</title><content type='html'>पारिजातकाचा सडा,&lt;br /&gt; कधी पाणोठ्याचा जलघडा,&lt;br /&gt;तोरड्यांची रुमझुम,&lt;br /&gt;कधी कंकणांची किणकिण,&lt;br /&gt; पहाटेचा पक्षीरव,&lt;br /&gt;कधी सायसाखरेची कव !&lt;br /&gt; करी प्रतोदाचा वार,&lt;br /&gt; प्रत्यंचेचा टणत्कार,&lt;br /&gt; दर्पाचा बुभुत्कार,&lt;br /&gt; कधी विखारी फ़ुत्कार !&lt;br /&gt;शब्द जहरीला डंख ,&lt;br /&gt; कधी तेजाळला पंख !&lt;br /&gt;रती मदनाचा संग,&lt;br /&gt; कधी अनंग नि:संग !&lt;br /&gt;शब्दा शब्दानेच बने मना मनाचा साकव&lt;br /&gt;शब्द जोडे अन तोडे नीट ध्यानामधी ठेव !&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-4680878301134164031?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/4680878301134164031/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=4680878301134164031' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/4680878301134164031'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/4680878301134164031'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2007/05/blog-post_20.html' title='शब्द'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-1968194134695045183</id><published>2007-05-19T02:26:00.000-07:00</published><updated>2007-05-20T07:00:22.576-07:00</updated><title type='text'>पियाका घर --हरेगाव</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;हरेगाव ! बेलापूर हा महाराष्ट्रातला पहिला खाजगी साखर कारखाना. तेथील अधिकार्‍यांसाठी व कामगारांसाठी बांधलेली वसाहत म्हणजे हरेगाव. ए, बी, सी, डी अशा टाइपच्या घरात विभागलेली. एक वाडी, दोन वाडी, पाच वाडी, आठ वाडी अशा वाड्यांनी वेढलेली. जगप्रसिध्द आर्किटेक्ट बोधे यांच्या आखीव रेखीव बांधकामात बंदिस्त झालेली.अस समजलं की वारणानगरचे तात्यासाहेब कोरे आपल्या कारखान्याच्या वसाहतीचं बांधकाम सुरु करण्यापूर्वी इथली वसाहत बघून गेले होते. ए टाइपचे बंगले ४ बेडरूम्सचे होते, बी टाइपचे २ बेडरूमचे तर सी टाइपचे १ बेडरूमचे होते. एक नंबर बंगला व डायरेक्टर्स बंगलो हे एक वेगळच प्रकरण होतं. आधीच अमचं दिशाज्ञान दिव्य, त्यात ते गर्द झाडीत लपलेले बंगले ओळखणं म्हणजे घरच्यांना एक गमतीचा विषय झाला होता.कोल्हापूरचं घर म्हणजे पायर्‍या संपल्या की रस्ता या प्रकारचं असल्यामुळे मागे पुढे लाम्बरुंद बागा ही माझ्या दृष्टीने एक अद्घुतरम्य गोष्टच होती.इथलं सगळं आयुष्य कारखान्याच्या भोंग्याला बाण्धलेलं होतं. सकाळी साडेसात्तच्या भोंग्याला माझे सासरे घराबाहेर पडत . १,२ मिनिटांच्या अंतराने त्यांच्या वेळचे सगळे सिनियर्स निघत. ८ च्या सुमाराला दुसरी फ़ळी , म्हणजे माझ्या नव‍याच्या वयोगटाचे लोक, निघत. त्यातही काहीजण त्या ढेंगभर अंतरासाठी सायकलचा वापर करत. १२ वाजता परत येताना मात्र सगळे एकदम बाहेर . परत २ च्या भोंग्याला हाच प्रकार. मोठ्यांची वाट लहानांनी अनुसरावी. मात्र साडेपाचच्या भोंग्याला ' पळा पळा कोण पुढे पळे तो'.एकम्दरीत एक संथ साध आयुष्य म्हणजे हरेगाव. कारखान्यात जायच्या यायच्या वेळी जी काही मनुष्यजातीच्या अस्तित्वाची जाणीव होई तेवढीच. एरवी सारे कसे शांत शांत !आता आठवलं की हसू येतं, पण शहरात वेगवेगळ्या उद्योगात सतत मग्न असलेल्या मला त्या शांत वातावरणात रुळायला फ़ारसा त्रास कसा झाला नाही ? की स्त्रीला कोणत्याही परिस्थितीशी पटकन जुळवून घ्यायचं नैसर्गिक वरदान असतं ? की तिच्या मनावर तसं बिंबवलेलं असतं ? कोण जाणे, पण एकंदरीत नववधु ची भूमिका मी मनापासून एन्जॉय करत होते खरी.म्हणजे असं की आम्ही दोघे सम्ध्याकाळी फ़िरायला बाहेर पडलो की आजूबाजूच्या मुली ' वहिनीला' बघायला गर्दी करत. त्यातली एकजण एकदा ' मेड फ़ॉर इच अदर ' म्हणून हसली. एरवी मी 'थॅंक्यु ' म्हणून आणखीही पी जे. टाकला असता पण नव्या नवरीने अधोमुख, मितभाषी असाव हे पार कण्वापासून बजावल गेलेल असल्यामुळे मी आपली शाम्तच राहिले. पण पुढे ओळख झाल्यावर या माझ्या ' नणदा ' मला चिडवायच्या, " वहिनी, आम्हाला वाटलं हो्तं तुम्ही अगदी गरीब आहात , पण तुम्ही म्हनजे लई भारी आहात हं " काय करणार स्वभावाला औषध नाही. आणखी एक म्हणजे हरिगावात सगळे मोठे लोक काका, काकी आणि त्यापेक्षा लहान दादा वहिनी असत. त्यामुळे एका मोठ्ठ्या कुटुंबाचच वातावरण तिथे होतं. आणि त्याची सुरवात दुसर्‍या दिवसापासूनच झाली.&lt;br /&gt;दुसर्‍या दिवशी आम्हा सासू, सुनेचे नवरे कामावर गेल्यानंतर दर ५ मिनिटाम्नी दारावरची बेल वाजत होती. नवी नवरी असल्यामुळे डोअरकीपिंगशिवाय मला दुसरं काहीच काम नव्हतं,. येणारी व्यक्ती ' बाई आहेत ? ' असं अगदी अदबीनं विचारायची. मग मी सासूबाईंना बोलावलं की् ती व्यक्ती त्यांच्याशी कुजबुजत काही तरी बोलायची. मग त्या हसत माझ्याकडे वळून म्हणायच्या, ' अरे, मग तूच दे ना लहान्या बाईंना. ' मी बुचकळ्यात की या लहान्या बाई कोण . तोपर्यंत त्या व्यक्तीने माझे पाय घट्ट पकडलेले असायचे आणि ' 'अहो असं काय, ' असं म्हणेपर्यंत पायावर डोकं टेकलेलं असायचं. झटकन उठून स्टीलची वाटी, ताटली, पेला असं काहीतरी माझ्या हातात कोंबून लाजून उभी असायची. सासूबाई डोळ्यांनी खुणावायच्या, 'असू दे.' ' मला फ़ार ओशाळल्यागत व्हायचं. पण जस जशी तिथे रुळत गेले तस तसं कळत गेलं की ही माणसं यायची ते केवळ रेडकर साहेबाची सून बघायला. कारण रेडकर साहेबाने त्यांना वेळोवेळी मदत केलेली होती. प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. आपल्या घरातल्याच पोराचं लगीन होवून नवी नवरी घरी आली आहे आणि आपण तिचं स्वागत करायचं आहे हीच एक आपुलकीची भावना त्यामागे असायची. खर साम्गायचं तर हरेगावातले पहिले १५ दिवस आम्ही दोघे घरी जेवलोच नाही. अगदी मॅनेजरपासून सामान्य कामगारापर्यंत सगळ्यांच्या घरी आम्ही जेवायला गेलो होतो. आणि त्या बायांचं ते अलबला करणं, पुरुषांचं अदबीनं बोलणं हे सगळं मला एखाद्या जुन्या मराठी सिनेमाचाच भाग असल्याप्रमाणे वाटायला लागलं होतं.&lt;br /&gt;ही कारखान्याची वसाहत असल्यामुळे सगळं आयुष्यच भोंग्याच्या वेळांशी बांधलेलं असे. जेव्हा 'सीझन ' चालू नसे, तेव्हा आयुष्य अगदी संथ असे. सकाळी ब्रेकफ़ास्ट घेऊन कारखान्यात जावं, जेवायला १२ वाजता घरी यावं. वामकुक्षी करून २ वाजता परत जावं ते साडेपाच वाजता चहा खाणं करायला परत घरी. सहा, साडेसहाला फ़िरायला किंवा जिमखान्यात खेळायला बाहेर पडावं आणि आठ, साडेआठला परत घरी. बायका महिलामंडळ, भजनीमंडळ यात जीव रमवत, अधिका‍यांच्या बायका ब्रिज , टेबलटेनिस खेळायला जिमखान्यात जमत. सगळा माहोल अगदी एखाद्या समारंभासारखा असे. मुलांना संभाळायला खात्याचे कामगार असत. तेच घरी स्वयंपाकही करत. निदान स्वयंपाकात मदत करत. रात्री १० वाजता जिमखाना बंद होई आणि सगळ्या बंगल्यांवर झाडांची गर्द छाया पसरून राही, निस्तब्ध!&lt;br /&gt;सीझन चालू झाला की वातावरण एकदम बदले,---&lt;br /&gt;draft&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-1968194134695045183?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/1968194134695045183/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=1968194134695045183' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/1968194134695045183'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/1968194134695045183'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2007/05/blog-post_19.html' title='पियाका घर --हरेगाव'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-6573345428971757132</id><published>2007-05-09T03:47:00.000-07:00</published><updated>2007-05-20T07:00:08.043-07:00</updated><title type='text'>नैहर छुटोही जाय</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;हरिगांव हे दोन अडिचशे उंबर्‍यांचं गाव महाराष्ट्राच्या नकाशावर आहे याची १९७३ सालापर्यंत मला खरच कल्पना नव्हती.पण माझे तीळ तांदूळ या गावचे आहेत हे माझ्या निकटवर्तीयांना समजलं, तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया म्हणजे, " बघ ग बाई, नगर जिल्ह्यात पाण्याचं दुर्भिक्ष, डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन पाणी आणायला भटकावं लागेल हां. " अशी होती. पण ' सावरे अयजय्यो ' च्या त्या काळात डोक्यावरचा हंडा उतरायला साजण असणार ही कल्पनाच मनाला गुदगुल्या करत होती.कोल्हापूरसारख्या हिरव्यागार गावातून टळटळीत उन्हात प्रवास करून श्रीरामपूरच्या रखरखीत बस स्थानकावर मी पोचले तेव्हा दुपार ढळत होती. अजून ८ कि.मी. अंतरावर असलेल्या साखरकारखान्याच्या वसाहतीत आम्हाला जायच होतं. कारखान्याची जीप काही कामासाठी श्रीरामपुरात आली होती, तीच आम्हाला मुक्कामी घेऊन जाणार होती. इथल्या बस स्थानकावर आल्यावर मला समजलं की ज्या हरिगावचा मुरलीरव मला इथवर खेचून घेऊन आला होता, ते ' हरि'गाव नसून 'हरे'गाव आहे. त्यामुळे प्रवासाचा चिकटा अंगावर आणि कुठे येऊन पडलो ही ठुसठुस मनात घेऊन ' हरे राम ' म्हणत हरेगावला जाणार्‍या जीपमध्ये बसण्याखेरीज गत्यंतर नव्हतं.&lt;br /&gt;श्रीरामपूर संपता संपता रस्त्यावरचा प्रकाश विरळ होवू लागला. वाटेवर अंधुक अम्धुकसे दिवे मिणमिणायला लागले.गाडी हरेगावकडे जाणार्‍या रस्त्यावरून दणदणायला लागलीआणि बघता बघता मिट्ट अंधार झाला. त्या निर्मनुष्य रस्त्यावरच्या अंधाराचं मनावर दडपण यायला लागलं. नवर्‍याचा उल्हासलेला आवाज कानाशी गुणगुणत होता, " हा वाकडा लिंब, इथे मोठा दरोडा पडला होता. ही तीन वाडी, हा ब्राह्मणगाव फ़ाटा, हे स्टाफ़ क्वार्टर, हे हरळीगेट आणि हे----'असं म्हणत कोपर कुशीत घुसल आणि आवाजातल ' डाबर हनी ' वाढलं तेव्हा लक्षात आलं की आपलं घर आ-----ल. नपेक्षा मिट्ट अम्धारात, जीपच्या दिव्याच्या झोतात, वाकड्या लिंबापासून हरळीगे्टपर्यंत सगळीच ठिकाणं माझ्या दृष्टीने सारखीच ' प्रेक्षणीय' होती. जीपमधून उतरता उतरता व्हरांड्यातल्या स्वच्छ प्रकाशात मला दिसली ती पिवळ्या भिंतीवरची हिरवीगार मनीप्लांट आणि जाणवला प्रवास करून थकलेल्या मनाला तजेला देणारा मोगर्‍याचा सुगंध. आता हेच ' आपलं ' घर ही खूण मनावर एक गंधित मोहोर उमटवून गेली.&lt;br /&gt;सकाळ झाली आणि अर्धवट उघडलेल्या डोळ्यांना दिसला मागील दारी सळसळणारा पिंपळ. ताडकन उठून खिडकीतून डोकावले तर चिंच, पिंपळ, उंबर एकाच खोडातून आकाशाकडे झेपावलेले. असच झाड रेडकरांच्या मूळगावी, रेडीला, आहे हे समजल्यावर आपल्या सासरचे कोणी आदि पुरुष छत्र धरून आहेत की काय अशी भावना जागी झाली. पुढच्या दारी आंबा, जाम्भूळ, यांची सावली. ट्विन बंगल्यांची सीमारेषा ठरवणार्‍या तारेला लागून मोगर्‍याची रांग.बागेत गुलाब , जाई, जुई, कुंद, चमेली , अबोली यांचा बहर.रामफ़ळ , सीताफ़ळ, आवळा, नारळ, विलायती चिंच . ही सगळी रेलचेल क्षणा क्षणाला डोळे विस्फ़ारायला लावत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनाही उंच वृक्ष सावली धरून हवेतला उकाडा कमी करण्याचा प्रयत्न करत होते. सम्पूर्ण कॉलनीतल्या लांबरुंद बागा आणि आखीव रेखीवपणा बघून आपण "कुठे" येऊन पडलो ही खंत केव्हाच पुसली गेली. कारखान्याच्या या 'बी' टाइपच्या बंगल्यात मी ७३ मध्ये रहायला आले आणि आयुष्याची १७ वर्षं, कारखाना बम्द पडल्यावर पोटासाठी गाव सोडेपर्यंत, तिथेच राहिले.&lt;br /&gt;draft&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-6573345428971757132?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/6573345428971757132/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=6573345428971757132' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/6573345428971757132'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/6573345428971757132'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2007/05/blog-post.html' title='नैहर छुटोही जाय'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-3439141289664016597</id><published>2007-04-29T04:40:00.000-07:00</published><updated>2007-05-20T11:38:46.204-07:00</updated><title type='text'>काही क्षण ... दिवेआगरचे</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;&lt;a href="http://bp1.blogger.com/_xJTMqJSyS30/RlBIwY5WV3I/AAAAAAAAAAM/NY0U3CtVaqo/s1600-h/Picture+080.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5066629576945719154" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; CURSOR: hand" alt="" src="http://bp1.blogger.com/_xJTMqJSyS30/RlBIwY5WV3I/AAAAAAAAAAM/NY0U3CtVaqo/s320/Picture+080.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;पोरांचं आपलं बर असतं. आदल्या रात्री ठरवतात, चला, उद्या अलाण्या फ़लाण्या ठिकाणी जावून भटकून येऊ या. मग सकाळी उठून ब्रेकफ़ास्ट घेताना [ तोही सावकाश उठून ] घोषणा, "पटकन आटपा, आपल्याला अलाण्या फ़लाण्या ठिकाणी फ़िरायला जायचं आहे. दोन तासात निघू. जमलं तर हॉल्ट करू, नाही तर रात्री उशीरा परतू. " अरे पण मेल्या, पोळ्याची बाई, कामवाली येणार उशिरा, तिला निरोप द्यायला नको ? शिवाय बाबांची पूजा आणि देवाचं वाचायलाच तासभर लागेल. कसं आटपणार ? पण या असल्या चिल्लर प्रश्नांची उत्तरं त्याने आधीच तयार ठरवलेली असतात. आम्ही कितीही आरडाओरडा केला, तरी आमचं सामान आणि ब्लडप्रेशर सावरत तो स्टिअरिंग पकडून कुठल्या गाण्याची सी डी लावायची ते बायकोबरोबर ठरवत मिष्किल हसत बसलेला असतो.&lt;br /&gt;या पार्श्वभूमीवर आमची दिवेआगरची ट्रिप अगदी वेगळीच होती.आज जावू या की उद्या जाणं सोईचं होईल हे ठरवण्यातच दोन महिने गेले. मग हाच दिवस प्रयाणाला योग्य आहे अशी आमची खात्री पटली आणि आम्ही निघालो.गाडी धावत होती आणि प्रथमच जाणीव झाली की काही तरी चुकतय. काय ते समजत नाही, पण कुछतरी गडबड छे.हां, गाण्याचा ठेका चुकतोय आणि मान पुढे मागे लचकत हलण्याऐवजी आडवी डोलतेय समेवर !म्हणजे " क्रेझी किया रे " ऐवजी चक्क भजनी ठेका.... इंद्रायणी काठी. असं होणं सहाजिकच होतं कारण गाडीतली चारी डोकी ज्येष्ठ नागरिक. मी , माझा चक्रधर नवरा, त्याची बहीण आणि तिचा नवरा. गाडी जसजशी गाव सोडून घाटाच्या दिशेने पळायला लागली, तसं गाडीतला डेकही बंद झाला आणि स्रुरू झाली रंगांची उधळण करणार्‍या निसर्गाची संगत आणि त्याच्याच संगीताची साथ.&lt;br /&gt;ताम्हिणी घाटात गेल्यानंतर एका वळणावर खोल दरी आहे. चारी बाजूनी उतरत उतरत डोंगराचं पाणी मधल्या खळग्यात मुरून पाचू फ़ुलवत होतं. पावसाळ्यात खळाळणारे प्रवाह फ़ेनफ़ुलं उधळत असतीलही, पण जानेवारीत मात्र तो उतार जरा रक्तदाब वाढवणाराच वाटला. अर्थात कुणाच्या रक्तदाबाच्या, कुणाच्या मधुमेहाच्या गोळ्या घ्यायच्या असल्याने ब्रेकफ़ास्ट करणं गरजेचं होतं.अल्युमिनियम फ़ॉइलमध्ये गुंडाळलेली प्रत्येकाच्या वाटणीची सॅंडविचेस एका हातात आणि थर्मासमधल्या कॉफ़ीचा वाफ़ाळता मग दुसर्‍या हातात घेऊन प्रत्येकाने आपापल्या सोईची जागा पकडली आणि भोवतालच्या हिरवाईत जो तो गुंगून गेला, एक मूक संवाद साधत !पुढच्या प्रवासात कुठे रक्तवर्ण कुंकुमासारखा पलाश भेटत राहिला तर कुठे गुलाबीसर फ़ुलांच्या डहाळ्या लगटत राहिल्या. साथीला कधी कधी लता, कधी आशा तर कधी किशोर तर कधी तलत.&lt;br /&gt;दिवेआगरच्या बापटांच्या अंगणात हातपाय धुवून खुर्चीत विसावतोय न विसावतोय तोच, " कवा आलासा ? काय च्या पानी घेनार का जेवनार एकदम ? " असं विचारायला आल्यागत जोरदार को कोच को ऐकू आल आणि त्याच्यामागून मान लगालगा करत मातीतले दाणे , किडे शोधत ३ -४ कोंबड्या आणि त्यांची पिलावळ. माहेरच्या गावाला घेऊन जाणारं ते कुटुंब बघून दिवेआगर मला एकदम आपलसच वाटल. मस्तपैकी शेणाने सारवलेली जमीन बघूनही खुर्चीवर बसणं हा करंटेपणाच होता. त्यामुळे आखडलेल्या पायांना जमिनीवर पसरून भिंतीला टेकून समोरच्या कोंबड्या आणि पिले बघण्यात दंग झाले. मान किती म्हणजे किती चटा चटा हलवावी त्या बायांनी की मलाच माझ्या स्पॉंडिलिसिसची आठवण व्हावी. कोंबडेबुवा मात्र कंपाऊंडच्या भिंतीवरून मान तोर्‍यात उडवत ' कुटुंबावर" नजर ठेवून होते. रस्त्यात माणूस नाही की काणूस नाही. निरव शाम्तता. बापटांच्याकडच्या जेवणाने तृप्त होवून बाकीची मंडळी वामकुक्षी घेत असताना मी माझी खुर्ची पोफ़ळीच्या झाडाखाली हलवली. झाडांखालची जमीन ओलसर होती. आदल्या दिवशी पाणी दिलेलं असावं बहुतेक .टपकन एक पोफ़ळ खाली पडलं. उचललं आणि दर्शनाने[ केअर टेकर बाईचं इतक सुंदर नाव मी प्रथमच ऐकलं.] ठेवलेल्या टोपलीत टाकलं.आणखी दोनचार झाडांच्या बुंध्यांशी लुडबुड केल्यावर आणखी काही पोफ़ळी सापडल्या. दर्शना, अग, गेली कुठे ही असं म्हणत पुढे चालले तर शेजारच्या घराच्या परसदारी दिसली. ' काय करतेस ग ' म्हटलं तर म्हणे, ' पोफ़ळी चिरून वाळायला टाकतो ' बघू तरी कशी चिरतात ते म्हणून बसले तर मुलाणेके मामू का कोंबडं कापायचा सुरा असतो तसं पातं असलेली विळी. आता मागे सरायचं नाही असं ठरवून हात घातला. ' आजी नको हां, हात कापात.' आजीने दोन तीन पोफ़ळं चिरली आणि माघार घेतली. बाकीच्या मुली खसा खसा चिरत होत्या. अशी सालं काढलेली पोफ़ळं २ -३ महिनी ऊन खात पडतील तेव्हा कुठे त्यांची खडखडीत सुपारी होते, आणि सुपारीला भावही चांगला, ३५० रु. किलो.&lt;br /&gt;संध्याकाळी दिवेआगरच्या समुद्रकिनार्‍यावर जाताना वाटेतच एका देवळाचं बांधकाम चालू होतं. राजस्थानी धाटणीचं लाल दगडाचं देऊळ सुम्दर होतं, पण मला मात्र आणखी ५ वर्षांनंतरची तिथली बजबजपुरी डोळ्यापुढे आली आणि मन खट्टू झालं. नितान्त सुंदर निसर्गाचा , अशी धार्मिक ' दुकानं ' थाटून माणूस का विध्वंस करतो ? समुद्राच्या उधाणलेल्या लाटात, एका लयीत वाजणार्‍या गाजेत , दूरवर पसरलेल्या अथाम्ग जलाशयात , रंगांची उधळण करत त्याच पाण्यात मिसळून जाणार्‍या सूर्यबिंबात असणार्‍या दिव्यत्वाचा स्पर्श माणसाला का पुरेसा होत नाही ? अशा विचारांनी मन खट्टू झालं&lt;br /&gt;&lt;br /&gt;समुद्रकिनार्‍यावर गेल्यानंतर त्या अथांग सागराला बघताना किती रुपं आठवावी त्याची. लहानपणी शिरोड्याला , आजोळी गेलं की त्याच्या वाळूत पाय खुपसून चालताना किती वाळू उडवत होतो. सगळ्यांच्या हातात हात गुंफ़ून लाटेबरोबर पायाखालची वाळू सरकताना जोराने किंचाळायची चढाओढच लागायची. वाळू भरलेले ओले कपडे घालून मागच्या दारी विहिरीवर जावून आंघोळ केल्याशिवाय आजी घरात पाऊल टाकू द्यायची नाही.किती आठवणी घेऊन त्याच्याशी संवाद करत फ़ेर्‍या मारल्या , मात्र यावेळी पाय मात्र कोरडेच राहिले.&lt;br /&gt;अंधार पडताच रस्त्यावरचे मिणमिणते दिवे थेट बालपणातच घेऊन गेले. अशा दिव्यातच आम्ही वाढलो होतो. उजेडापेक्षा अंधार गडद करणारे दिवे आणि रस्त्यावर आखलेल्या लोकांच्या घरातल्या उजेडाच्या चौकोनांनी आम्हा सगळ्यांना लहानच करून टाकलं. कदाचित संध्याकाळी " सुवर्ण गणपती "च्या मंदिरात म्हटलेल्या आरतीचा आणि अगदी हात जोडून आणि पहिलीतल्या पोरांसारखे डोळे मिटून " मना सज्जाना भक्तीपंथेचि जावे " म्हटलेल्याचाही परिणाम असावा तो.&lt;br /&gt;पण दिवेआगरने खोलवर दडलेली सुरावट छेडली खरी !&lt;br /&gt;समुद्र हा माझा आतल्या गाभ्यातला सखा आहे. तो मला अशी खट्टू होवून जाऊ देणार होता थोडाच ?आदल्या दिवसाची कसर दुसर्‍या दिवशी भरून निघाली. दिवेआगर ते श्रीवर्धन हा सकाळी केलेला प्रवास आणि दिवेआगर ते दिघी हा संध्याकळी केलेला प्रवास म्हणजे केवळ अविस्मरणीय ! रुसलेल्या छोट्या बहिणीला मोठ्या भावाने वेगवेगळ्या भेटी देवून मनवावं तसा वा्टला तो समुद्र मला ! गाडी एखाद्या वळणावर वळली की खाली खोलवर तो असा काही चमचमत उसळत असायचा की त्या त्याच्या नर्तनाच्या खोडकर लाटा आपल्याही हृदयातून उसळाव्यात. झाडीतून त्याचं मंद सम्गीत खुलवत रहायचं. म्हणायचं, बघ, माझ्यापासून दूर तू जाऊच कशी शकतेस ? मी आहे इथेच. चल , शोध मला. आणि आपणही नटखट मुरलीधराला शोधणार्‍या गोपींच्या आतुरतेने त्याला शोधत रहावं तर अचानक त्याचा अथांग जलाशय बाहू पसरून खुणावत रहायचा. एके ठिकाणी कधी न पाहिलेल्या पांढर्‍याशुभ्र रंगात समुद्र डोलताना दिसला आणि जवळ गेल्यावर लक्षात आलं की शेकडो बगळे भक्ष्याच्या प्रतिक्षेत ' बकध्यान ' लावून पाण्यात लाटेवर झुलताहेत.&lt;br /&gt;संध्याकाळचा दिवेआगर ते दिघी हा प्रवास एक अविस्मरणीय अनुभव देवून गेला. विशेषत: नानवलीहून दूरवर समुद्रात वसलेला जंजिरा पाहताना कोणत्याही क्षणी किल्ल्यात हालचाली सुरु होतील असं वाटावं इतका तो जिवंत वाटत होता.&lt;br /&gt;या सगळ्या क्षणांनी जो जिवंतपणा रसरसून आतपर्यंत झिरपत गेला तो खूप दिवस तसाच रहाणार होता हे नक्की !&lt;br /&gt;&lt;br /&gt;draft&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-3439141289664016597?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/3439141289664016597/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=3439141289664016597' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/3439141289664016597'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/3439141289664016597'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2007/04/blog-post_29.html' title='काही क्षण ... दिवेआगरचे'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://bp1.blogger.com/_xJTMqJSyS30/RlBIwY5WV3I/AAAAAAAAAAM/NY0U3CtVaqo/s72-c/Picture+080.jpg' height='72' width='72'/><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-235274847924499303</id><published>2007-04-26T23:35:00.000-07:00</published><updated>2007-04-27T00:26:39.339-07:00</updated><title type='text'>क्षमा</title><content type='html'>तापलेल्या रस्त्यावरून सोलवटलेले पाय ओढत तुझ्या दाराशी आल्यावर&lt;br /&gt;क्षणभर थांबून समोर सहज पाहिलं, तर&lt;br /&gt;काटेरी मुकुटात जखडलेला दिसलास तू भिंतीवर&lt;br /&gt;कललेली मान सावरत&lt;br /&gt;रक्ताळलेले हात पेलत !&lt;br /&gt;तुझं वेदनेनं कल्लोळलेलं शरीर&lt;br /&gt;दौडवीत गेली अदीम थरथर&lt;br /&gt;" वेदनेतून उमटलेला मायेचा हुंकार&lt;br /&gt;रक्तातून घुमलेला क्षमेचा तत्कार&lt;br /&gt;असावे बहुधा मिथक खोटे&lt;br /&gt;थोडे रचलेले , थोडे लुटुपुटीचे!"&lt;br /&gt;धुमसणार्‍या कराल तप्त लोंढ्याला थोपवत भिडवला तुझ्या डोळ्याशी डोळा,&lt;br /&gt;,दाबलं पाऊल काट्यासह चिळकाम्ड्या उडवत चळचळा.&lt;br /&gt;एक थंड लहर लपेटत चालली अंग भर&lt;br /&gt;" देवा , क्षमा कर तू ह्याला ,खरच क्षमा कर!&lt;br /&gt;क्षमेचा अर्थ  उमगण्यासाठी तरी क्षमा कर !"&lt;br /&gt;ठिबकणार्‍या रक्तातून,चरचरणार्‍या जखमेतून&lt;br /&gt;हसलास तू कष्टाने,&lt;br /&gt;" अग्नीने दाह द्यावा,&lt;br /&gt;जलाने  तो शांतवावा.&lt;br /&gt;चाले तो जैसे ज्याचे मन&lt;br /&gt;जल बन तू लेकरा, जल बन"&lt;br /&gt;विरली वेदना विरले चराचर&lt;br /&gt;नुरली वंचना , नुरले जहर............. !&lt;br /&gt;&lt;br /&gt;वळून पाऊल टाकताना  बाहेर, जाणवलं तू आहेस पाठी&lt;br /&gt;,आधाराला देऊन क्षमेची काठी.&lt;br /&gt;अर्थ जाणवला तुझ्या वचनाचा थोडासा ,&lt;br /&gt;समजलाससं वाटलं तू जराजरासा !&lt;br /&gt;draft&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-235274847924499303?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/235274847924499303/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=235274847924499303' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/235274847924499303'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/235274847924499303'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2007/04/blog-post_26.html' title='क्षमा'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-2311784811858414295</id><published>2007-04-23T23:01:00.000-07:00</published><updated>2007-04-23T23:31:16.890-07:00</updated><title type='text'>चंद्र अमेरिकेतला</title><content type='html'>दारात उभी राहून चंद्र न्याहाळताना वाटलं,&lt;br /&gt;अमेरिकेतला चंद्र कसा दिसेल?&lt;br /&gt;लखलखत्या दिव्यांच्या साथीला&lt;br /&gt; आकाशाची थोडीतरी किनार असेल?&lt;br /&gt;लेकाला विचारलं," बाबा रे ,असतो तरी कसा तो ?&lt;br /&gt;दिसण्याने त्याच्या  जीव तुझा सुखावतो ? "&lt;br /&gt;तर म्हणाला, "आई, खूपच दिवस झाले ग त्याला बघून,&lt;br /&gt; शेवटचा भेटलो त्याला , तेव्हा भरवला होतास  तू  वरणभात ऊन ऊन.&lt;br /&gt; आता बघावसं वाटल, तरी टाळतोच ती कल्पना,&lt;br /&gt; वाटतं, कदाचित नसेल ना मागे शिक्का ' मेड इन चायना ?' "&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-2311784811858414295?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/2311784811858414295/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=2311784811858414295' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/2311784811858414295'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/2311784811858414295'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2007/04/blog-post_23.html' title='चंद्र अमेरिकेतला'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-111407091392993955</id><published>2007-04-22T09:13:00.000-07:00</published><updated>2007-05-20T07:01:37.524-07:00</updated><title type='text'>खासबागेतलं घर</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;आजवरच्या आयुष्यात जीवनाच्या वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळ्या घरात राहण्याचा योग आला, पण आयुष्याची पहिली १९ वर्षं ज्या घरात काढली, ते घर गैरसोईचं होतं असं आज वाटलं, तरीही तेच सर्वात प्रिय वाटतं. ते घर म्हणजे कोल्हापुरातलं खासबाग या भागातलं " राज अंजुमन ताज " अशा भारी भक्कम नावाचं बी. नांद्रेकरांचं घर. घराच्या नावातले ३ शब्द हे त्यांच्या ३ मुलांची नावं होती. त्यांची ४थी मुलगी ' शुक्रिया' आमच्यापेक्षा ३- ४ वर्षांनी मोठी होती. तिचं नाव मात्र घरावर नाही याचं आम्हाला लहानपणी फ़ार वाईट वाटायचं, आणि शुक्रिया आबांची नावडती मुलगी आहे असं आम्हीच मनाशी पक्कं ठरवून ती समोर नसताना फ़ार हळहळायचो. आता आबांनी घर बांधलं तेव्हा 'शुक्रिया'चा जन्मच झाला नसेल तर तिच नाव घरावर कसं असणार ही गोष्ट आमच्या चिमुकल्या डोक्यात काही येत नसे.आम्ही आबांच्या घरातील भाडेकरु होतो. आणखी ३ भाडेकरु आणि आबांचं स्वत:चं घर मिळून नांद्रेकरांचं घर होत असे. या सगळ्या घरांना मध्ये चौक होता, आणि प्यायचं पाणी भरण्यासाठी समाईक नळ तिथेच होता. शिवाय बाथरूमही चौकातच होती आणि बाथरूममध्ये स्वतंत्र नळ होता. अशा घरांना पूर्वीच्या पध्द्तीप्रमाणे समाईक संडासही होता. आमच्या घराला लागूनच , म्हणजे चालत गेलं तर २ सेकंदात आणि पळत गेलं तर १/२ सेकंदात पोचू अशा अंतरावर खासबाग नावाचं मैदान होतं, जे आम्हा मुलाम्चं दुसरं घर होतं, त्या मैदानाच्या नावावरून त्या भागाचं नाव खासबाग असं पडलं होतं.याभागात बर्‍याच नामवंत मंडळींची घरं होती, आणि ती सगळी मंडळी इतकी मोठी आहेत याची जाणीव लहानपणी आम्हाला नव्हती. आता आमचे घरमालक म्हणजे शुक्रियाचे आबा हे १९३०_ १९५० या काळातले फ़ार मोठे नट होते हे मला बर्‍याच वर्षांनंतर त्यांचे मीनाकुमारी , निम्मी, नर्गिस यांच्याबरोबरचे फ़ोटो बघितल्यानंतर कळलं. तसे तर आमच्या अवतीभोवती सरिताचे अण्णा,[जुन्या काळचे प्रसिध्द नट विष्णुपंत जोग ],बकुळाबाईंचे मिष्टर[ भालजी पेंढारकर], भालजी पेंढारकरांची सर्वात मोठी बायको लीलाबाई [मिस लीला] अण्णांकडे येणारे त्यांचे मित्र दादा साळवी, मांगोर्‍यांच्या समोरच्या घरात येणारा अरुण सरनाईक,शकून मासूरकरची मैत्रीण उमा [उमा नटी] हे सतत वावरतच असायचे, पण त्यांचं ग्लॅमरचं वलय आमच्या डोळ्यावर कधीच आलं नाही.खासबागेच्या ग्राऊंडवर धुडगूस घातल्यानंतर आम्ही सगळ्या मुली सरिताच्या घरी झोपाळ्यावर बसून झोके घेत गाण्याच्या भेंड्या खेळत असू. सरिताची आई जानकीकाकू गोड गळ्याच्या होत्या. त्याही कधी कधी अण्णा नसले तर गाणं म्हणत.कधी कधी संध्याकाळी किंवा पहाटेच्या वेळेला अण्णांच्या पहाडी आवाजातल्या ताना कानावर पडत. भालजी पेंढारकरांकडच्या , म्हणजे बकुळाबाईंकडच्या घरगुती समारंभासाठी उमा नटून थटून पण डोक्यावर पदर आणि नजर खा्ली , हातात क्रोशाच्या रुमालाने झाकलेलं ता्ट घेऊन जाताना दि्से. लीलाबाई रस्त्याने निघाल्या की कोणीतरी योगिनी शुभ्र वेषात निघाल्यासारखं वाटे.शाळेत आमच्या मागे दोन वर्षं असलेली माया जाधव सायकल वरून गोखले कॉलेजला जाताना दिसे. ती सगळी कोल्हापुरातल्या उच्चभ्रू लोकांची वस्ती होती, पण हे लोक आपल्या खाजगी आयुष्यात अगदी मध्यम वर्गीय मूल्य जपणारे असल्यामुळे बाकीच्या जनसामान्यात मिसळून गेलेले असत.&lt;br /&gt;तर मी ज्या घरात लहानाची मोठी झाले, ती दुमजली आणि चार खोल्या असलेलं होतं. पुढे गॅलरी, मागे गच्ची. या गच्चीत एका कोपर्‍यात आई बंबात घालायसाठी कोळशाची खर आणि शेण कालवून त्याचे बंबगोळे करून वाळवत असे. तिथेच बाजूला शेणाच्या गवर्‍या [कोल्हापुरी भाषेत 'शेण्या' ] पोत्यात भरून ठेवलेल्या असत. आणि उरलेल्या जागेत तिने आणि भैय्याने देवदारी खोक्यात वेगवेगळी फ़ुलझाडं लावलेली असत.संध्याकाळच्या वार्‍यात ति्थे बसून गोष्टीचं पुस्तक वाचायला मजा येत असे.पुढच्या बाजूला गॅलरी होती.एका कोपर्‍यात छोटीशी मोरी होती, आणि दुसर्‍या कोपर्‍यात कोळशाचं भलं मोठं पिंप. यामधली जागा भैय्याची स्टडीरूम. त्याने तिथे बल्ब लावून घेतला होता.पिंपाच्या शेजारच्या शेल्फ़वर त्याच्या नोटस, पुस्तकं. ११वीत असताना मीही हट्टाने त्याच्या पायाशी बिछाना घालून अभ्यास करत असे.जेमतेम १० वाजेपर्यंत डोळे ताणून वाचल्यानंतर अंथरुणाला पाठ टेकली की चांदण्यांनी भरलेलं आकाश खुणावायला लागायच, समोरच्या मुनिश्वरांच्या बागेतल्या नारळाच्या झावळ्या मंद डोलायला लागायच्या आणि त्या सगळ्यांना पांघरून डोळे जड व्हायला लागायचे.मला आता आश्चर्य वाटतं, की अशा अडचणी , जागेच्या, गोंगाटाच्या, आमच्या अभ्यासात अडथळे का आणू शकल्या नाहीत. खालून रस्त्यावरून रहदारीचे आवाज,ग्राऊंडवरून खेळताना मारलेल्या आरोळ्या, काही काही कळायचं नाही पुस्तक उघडल्यावर.सगळं जग जणू विरून जायचं आणि उरायचं फ़क्त पुस्तकातलं जग, मग ते अभ्यासाचं असो की गोष्टीचं !&lt;br /&gt;आमच्या या घराला दोन मजले होते, वर दोन खोल्या, खाली दोन खोल्या.. शिवाय एखाद्या हॉलसारखा भला मोठा माळा, ज्यात भैय्या आणि त्याचे मित्र शिडी लावून चढायचे, आणि दोनच माणसं उभी राहतील अशा गच्चीत उभे राहून पतंगाची काटा काटी करायचे.वरच्या मजल्यावरची सगळी कपाटं , लॉफ़्टस, वरच्या माळ्याचा काही भाग पुस्तकांनी भरलेला असायचा. महाभारताच्या खंडापासून पी. जी. वुडहाऊसपर्यंत सगळ्या प्रकारची पुस्तकं ठासून भरलेली असायची. शिवाय बंगाली , गुजराथी भाषेतील साहित्य, शास्त्रीय विषयांची असा भरणाही त्यात असायचा. माझे वरचे दोन्ही भाऊ वाईच्या विश्वकोषात लिहिणारे असल्यामुळे त्यांच्यापुढे माझं वाचन म्हणजे लिंबू टिंबूतली बी च. पण वरच्या मजल्यावरच्या पुढच्या खोलीत सगळे काही ना काही वाचत असताना मी बाराखडी काढत बसलेली मला अगदी स्वच्छ आठवतय.पुढे मोठी झाल्यावर माझीही लायब्ररी झाली. जिन्याच्या वरच्या कपाटावर एक माणूस आरामात झोपेल इतकी जागा होती,तिथे खाकी कव्हर घातलेली आणि कॅलेंडरचे आकडे कोपर्‍यात चिकटवलेली, चांदोबा, गोट्या, रॉबिन हुड, सानेगुरुजींच्या गोड गोष्टी अशी कितीतरी पुस्तकं मी नीट रचून ठेवलेली असत.पुस्तकांवर माणसांप्रमाणे प्रेम करायला या घराने मला शिकवलं . अर्थात माझ्या मुलांच्या मते तो साने गुरुजींच्या 'बोर 'गोष्टींचा परिणाम आहे. जनरेशन गॅप, दुसरं काय ? असो.&lt;br /&gt;तर साम्गायची गोष्ट अशी की वरच्या मजल्यावरून खाली येण्यासाठी दोन ठिकाणी वाकडा जिना होता. त्याच्या खालून तिसर्‍या पायरीजवळ भिंतीत एक खिडकी होती.पायरीवर बसून बशीत खाणं घेवून पुस्तक वाचत तिथे बसायला खूप मजा येत असे. जिन्याखाली जास्तीचं सामान असायचं आणि पुढे डायनिंग टेबल आणल्यानंतर लाल लाल लाकडी पाटही तिथेच गेले. पण एकदा आम्हा मुलांचा गणपती बसवण्यासाठी सगळं सामान काढून 'कैलास पर्वतावर गणपती' असा सीनही आम्ही जिन्याखाली केला होता. डायनिंग टेबलचे ड्रॉवर्स कपड्यांनी खच्चून भरलेले असायचे आणि बापू कामासाठी गावाला गेले की भैय्या आणि त्याचे मित्र टेबलावर टेबल टेनिसही खेळत. किंवा भैय्या रात्री त्यावर झोपेही.आमचं स्वयंपाकघर मात्र अंधारं होतं. दिवसा ही तिथे बल्ब लावावा लागे. दार होतं, पण ते समाईक चौकात उघडत असल्याने बहुधा बम्दच असायचं.स्वयंपाक चुलीवर चालायचा. चूल सारवणं, तिला पोतेरं देणं, दुसर्‍या दिवशीसाठी ती भरून ठेवणं हे कितीही " एथनिक" वाटलं तरी तेव्हा न जाणवलेले आईचे कष्ट आज मनाला वेदना देतात. आयुष्य हे असंच असतं. एकमेकींना मदत करत ते हसत खेळत पार पाडायचं असतं, हे आमच्या आधीच्या पिढीने आम्हाला आपल्या वागणुकीनेच दाखवून दिलं. बाहेरचे पदार्थ खाणं हे छचोरपणाचं मानलं जात असल्याने आणि वेगवेगळे पदार्थ करणं स्त्रीच्या स्त्रीत्वाचं प्रमुख लक्षण मानल गेल्यामु्ळे रोजचं वाटण घाटण ही तर सामान्य गोष्ट होती, पण विशेष खटाटोपाचे जिन्नसही या बायका सहजपणे करत. [ की त्यांना करावे लागतच ? ] मला माझ्या लहानपणीची आई आठवते ती चुलीच्या धगीने लाल झालेली, कमरेला खो्चलेल्या सोदन्याने [फ़डकं ] घाम पुसणारी, आणि तरीही शांत. या सगळ्या कामातही विणकाम भरतकाम वाचन करण्यासाठीचा वेळ ती कुठून काढायची ते तीच जाणे.&lt;br /&gt;आमच्या या घराला फ़रशीची जमीन नव्हती, तर मातीची जमीन होती. दर आठ दिवसांनी ती सारवायला लागायची. आणि दर चार महिन्यांनी ती उलायची, म्हणजे तिचे पोपडे निघायचे. मग उलथन्याने ते काढायचे. जमिनीवर पाणी मारायचं आणि मग ती शे्णसडा घालून केरसुणीने सारवून घ्यायची. अशी ती सुस्नात झालेली जमीन खोलीच्या चार कोपर्‍यात शुभदर्शक रांगोळी घालून वर हळदीकुंकू घातलं की गरत्या सवाशिणीसारखी उजळून निघायची.&lt;br /&gt;या घराची एकच का्ळीकुट्ट बाजू होती, ती म्हणजे संडास. पूर्वीच्या काळचे टोपलीचे संडास आणि संपूर्ण तोंड फ़डक्याने बाम्धून डोक्यावरून मैला वाहून नेणारे भंगी लहानपणी दिसले की मळमळायला लागायचं आणि घृणेने मान फ़िरवली जायची, कळत्या वयात ते दृश्य आठवलं की त्यांच्या नशिबातल्या नरकयातना बघून शरमेने डोळे पा्णवायचे आणि मान खाली झुकायची.&lt;br /&gt;आमच्या घरमालकाम्चे मुलगे कर्ते झाल्यावर त्यांनी घराचा कायापालट करायचं ठरवलं. घरात फ़रशी घालून शिवाय प्रत्येकी स्वतंत्र फ़्लशचे संडास, घरातच नळ . मात्र भाडं महिना ४० रुपयावरून १०० रुपयावर जाणार होतं. एवढं भाडं देवून अंधार्‍या घरात राहण्यापेक्षा नव्या वस्तीत रहावं हा बायकांचा विचार पुरषांनाही पटला आणि आम्ही सागरमाळावर रहायला गेलो, पण पाण्याच्या टंचाईमुळे तेही घर ६ महिन्यातच आम्ही सोडलं आणि संयुक्त महाराष्ट्र हौसिंग सोसायटीत रहायला गेलो. तिथे मात्र मी लग्न होईपर्यंत राहीले.&lt;br /&gt;draft&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-111407091392993955?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/111407091392993955/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=111407091392993955' title='8 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/111407091392993955'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/111407091392993955'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2007/04/blog-post_22.html' title='खासबागेतलं घर'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>8</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-8158951370329089530</id><published>2007-04-18T03:56:00.000-07:00</published><updated>2007-05-20T07:04:28.628-07:00</updated><title type='text'>कॉलेज</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;१९६५ च्या जून महिन्यात ११वीच्या परिक्षेचा निकाल लागला, आणि कॉलेजात जाण्याची तयारी सुरु झाली. त्या काळी कॉलेजच्या निवडीत कोल्हापुरात दोनच कॉलेजेसना प्राधान्य असायचं. राजाराम आणि गोखले. राजाराम आमच्या शाळेला लागून असल्यामुळे त्या वास्तूबद्दल प्रचंड आपुलकी आणि कुतुहल होतं. डिग्री मिळवायची आणि लग्न करून संसाराला लागायचं हेच इतर बहुसंख्य , म्हणजे जवळ जवळ सगळ्याच , मुलींप्रमाणे माझंही ध्येय असल्यामुळे कॉलेजात जावून काही भव्य दिव्य करायचय असंही ठरवलं नव्हतं.शाळेच्या आखीव रेखीव चाकोरीतून सुटून एक स्वच्छंद फ़ुलपाखरी जग बघायचं हाच कॉलेजात जाण्याचा मुख्य हेतू असायचा.अभ्यास ही तदनुषंगाने येणारी अपरिहार्य गोषट असल्याने कोणीच त्याचा बाऊ करत नसे. त्यामुळे कॉलेज लाइफ़ एन्जॉय करण्यासाठी आर्टसला जाणं हा उत्तम पर्याय होता. त्यासाठी लागणा‍र्‍या चार वह्या, पेन ,सगळ्याच साड्यांवर मॅचिंग होईल अशी काळ्या रंगाची पर्स, वेगवेगळ्या आकाराची कानातली, लांबलचक माळा, ५, ६ लेटेस्ट फ़ॅशनच्या साड्या यांची खरेदी मी मे महिन्यातच उरकलेली होती.शिवाय वह्या छातीशी धरून एक वेणी पुढे घेऊन चालायची प्रॅक्टीसही बर्‍यापैकी झालेली होती.११ वीला प्रथम श्रेणी आणि राष्ट्रीय पातळीवर शहराचं प्रतिनिधित्व केलेलं असल्यामुळे गोखले आणि राजाराम या दोन्ही कॉलेजात सन्मानपूर्वक प्रवेश मिळत होता. मी राजारामचा पर्याय निवडला.&lt;br /&gt;त्यावेळी राजाराम कॉलेज गावातल्या भवानीमातेच्या मंदिराच्या परिसरात, ज्याला भवानी मंडप असं ओळखलं जातं, भरत असे. कॉलेजची मूळ इमारत ही राजवाड्याचाच एक भाग असल्याने त्या बांधकामाचा प्रभाव कॉलेजच्या इमारतींवर होता. ती काळ्या दगडाची इमारत उन्हाळ्यातही थंडगार वाटायची.कॉलेजचं पोर्च हा मुलांसाठी ' आरक्षित ' भाग असल्याने आणि तिथे आजी सदस्यांबरोबर आजीव सदस्यांचेही वास्तव्य असल्याने तो भाग मुलींसाठी 'निषिध्द क्षेत्र ' होतं. कॉलेजच्या दारातून आत शिरलं की, मुलींच्या माना ज्या खाली जात, त्या वर्गात शिरलं कीच वर होतं.पहिल्या वर्षी मुली पोर्च समोरून जाताना ' आता कोणत्याही क्षणी मुलांचा घाला होईल ' या भीतीने वाघ मागे लागलेल्या मेंढरासारख्या थरथरत, पळत सुटत . एखाद्या मुलाने शीळ घातली तर किंवा बाण मारला तर ? या भीतीने त्यांची गाळण उडत असे. बहुसंख्य मुली केवळ मुलींसाठी असलेल्या शाळेतून आलेल्या असल्याने दबावाखाली असत आणि मुलंही सहशिक्षणाला सरावलेली नसल्याने दबाव झुगारायला उत्सुक असत. मुलामुलींनी एकत्र उभं राहून गप्पा मारणं ही फ़ारच दूरची गोष्ट होती.त्यामुळे वेगवेगळे 'सजातीय ' घोळके करून 'विजातीय ' धृवावर लक्ष ठेवणं एवढाच 'रोमॅंटिसिझम ' मुलं करू शकत होती. काही फ़ारच धीट मुलं, मुली निघाल्या की छातीवर हात ठेवून छातीत कळ आल्यासारखा चेहरा करून आपल्या दिलाचे हजार तुकडे झाल्याचं सुचवत असत आणि मुलीही मुमताज , साधना, शर्मिला, जया जेवढ्या लाजू शकतील तितपत लाजून त्याला दाद देत असत. अशाही परिस्थितीत नोटस मागण्याच्या बहाण्याने प्रेमप्रकरणं फ़ुलत असत, पण फ़ारच थोड्याम्ची परिणती लग्नात होत असे. कारण विवाह जरी स्वर्गात ठरव्ला जात असला तरी, त्याचे सर्वाधिकार आकाशातल्या बापाने आपल्या पृथ्वीवरच्या बापाला दिलेले आहेत मुलींच्या मनात चांगलंच ठसलेलं किंवा ठसवलेलं असे. त्यामुळे कॉलेजच्या दुसर्‍या वर्षापासून एक एक पान गळावया लागून शेवटच्या वर्षी बहुसंख्य पानं गळायच्या बेताला आलेली असत. परिक्षेच्या मांडवातून लग्नाच्या मांडवात हाच त्या काळच्या वडिलधार्‍यांचा नारा असे&lt;br /&gt;.कॉलेजच्या मुख्य इमारतीच्या गेलं की दोन्ही कोपर्‍यातल्या मेघडंबर्‍यातून रंकाळा तलावापर्यंतचा भाग दिसत असे. खाली पाहिलं तर भवानी मंडपाचा भाग , के. एम. टी. च्या बसेसच्या थांब्याचा भाग सोडल्यास मोकळाच दिसत असे. त्यामुळे एक खानदानीपणा त्या भागाला होता. आमच्या कॉलेजला लागूनच त्या भागात येण्यासाठी एक दगडी कमान होती. त्याच्या दोन्ही बाजूला हत्ती झुलताना मी पाहिलेले आहेत. कमानीच्या वर सनई चौघडावाले बसलेले असत. महाराजांची मोटार लांबवरून येताना दिसली की ते वाजवायला सुरवात करत. अंबाबाईचं देऊळही जवळ असल्याने दुपारी आरतीच्या वेळी घाटी दरवाज्यावरची घंटा वाजू लागे. या सगळ्यामुळे आपण एका पावन ऐतिहासिक परिसरात वावरत आहोत ही भावना मनाला सुखवत असे. ऑफ़ पिरियडला भवानीमातेच्या मंदिराच्या गारव्याला गप्पा मारत बसणं किंवा अंबाबाईच्या देवळात दर्शन घेऊन तिथल्या दुकानात बांगड्या पर्सेस , कानातली, गळ्यातली, वेगवेगळ्या रंगांच्या गंधाच्या, कुंकवाच्या बाटल्या खरेदी करणंहा मुलींचा स्त्रीसुलभ टाइमपास असे, तर काही अंतर ठेवून ' जेथे जाशी तेथे मी तुझा सांगाती ' असं [मनातल्या मनात ] म्हणत मुलाम्चे घोळकेही मुलींच्या मागून फ़िरत असत.आजच्या तरुण पिढीला हे सगळं हास्यास्पद वाटत असेल, पण यामागचं कारण त्यावेळचं सामाजिक बंधन असे. मुलामुलींनी एकत्र गप्पा मारत उभं रहाणं जिथे शिष्टसंमत नव्हतं तिथे मैत्री ही फ़ारच दूरची गोष्ट. त्यामुळे मुलींची भूमिका बहुधा बावरलेल्या हरिणीची असे, व मुलगे आपल्या 'टेरिटरी'तल्या मुलींच्या रक्षणकर्त्याच्या थाटात वावरायचे. पोषाख आचरण याबाबतीत अधिकांश मुलं मुली दबावाखाली असत. पण तारुण्यसुलभ बंडखोरीमुळे त्यातून पळवाटही काढत. म्हणजे मुलगी ११ वीत गेली की ती साडीत शिरे. काही काही घरात तर ८वीपासूनच मुली साडी नेसू लागत. काही किंचित फ़ॅशनेबल मुली कॉलेजात आल्यानंतरही स्कर्ट ब्लाऊज घालत,आणि घरून निघताना गुडघ्याच्या खाली असलेला स्कर्ट लेडिजरूम मध्ये आलं की नेफ़्याकडे दुमडून लांडा करून हेलनसारख्या चालत वर्गात जात. साडीवाल्या मुलीम्ची गत आणखी न्यारी, न्यारी !घरून निघताना बिचार्‍या साधीसुधी साडी नेसून पदर दोन्ही खाम्द्यावर पांघरून निघत आणि लेडिजरूमच्या आरशासमोर आल्या की तोच पदर लाम्ब करून कमरेभोवती गच्च दोन फ़ेरे देऊन डाव्या हातावर पंख्यासारखा झुलवत तासाला निघत.आम्ही ११वीत असताना 'गीत गाया पत्थरोंने ' नावाच्या सिनेमात राजश्री नावाच्या नटीने कटिवस्त्र नाभीखाली खेचून शिवाय नाभीत चमकता खडा घातला होता. त्यामुळे अगदी खडा जरी नाही तरी बर्‍याच कॉलेजकन्यकांनी हे नाभीदर्शन उचलून धरलेलं होतं.अशा या मुली पदर फ़डकवत निघाल्या की पोर्चमधून " चुनरी संभाल गोरी, उडी चली जाय रे, मार ना दे डंख कोई नजर कोई हाय ! " असा कोरस उमटला नाही तरच नवल.ही सगळी छेडखानी, रुपेरी पडद्यावरची भ्रष्ट नक्कल, जिच्यावरून चाले ती आरामात असे, आणि पाहणार्‍याला घाम फ़ुटे.पुढे मग आम्ही कॉलेजच्या दुसर्‍या वर्षाला गेल्यानंतर जया भादुरी नावाची एक साधीशी मुलगी रुपेरी पडद्यावर अवतरली आणि सगळ्या आयांनी सुटकेचा श्वास सोडला. कारण मुलींनी पदराचे पंखे मिटले,पदर दोन्ही खांद्यावरून पांघरून आले. केसाम्चा सैलसर शेपटा पाठीवर झुलू लागला. कपाळावरचा साधना कट जावून केसांचे भले मोठे आकडे कानामागे झुलू लागले .कपाळावर गंधाची टिकली, कानात साध्याशा रिंग्ज, सुती काठा पदराच्या कलकत्ता साड्या अशा वेषात मुली कॉलेजला जावू लागल्याने आया धन्य धन्य झाल्या.मुलांना बिचार्‍यांना फ़ारसे काही पर्यायच नव्हते.त्यातल्या त्यात राजेश खन्नाने आपलं वाढतं पोट झाकण्यासाठी सुरु केलेला ' गुरु शर्ट ' हीच त्यांची फ़ॅशनची कमाल पातळी होती. कदाचित त्यामुळेच की काय आजचे ६०- ६५ चे आजोबा टी शर्ट मध्ये दिसतात.&lt;br /&gt;१९६७ च्या सुमाराला राजाराम कॉलेज भवानी मंडपातून शिवाजी विद्यापीठाच्या परिसरानजिकच्या स्वत:च्या जागेत गेलं, पण उघड्या बोडक्या माळावरची ती वास्तू आम्हाला कधी आपलीशी वाटलीच नाही.अजूनही आमचं कॉलेज म्हटलं की गावातलं कॉलेजच डोळ्यापुढे येतं.कॉलेजच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळालेला निबंध भित्तीपत्रकात पाहताना वाटलेला अभिमान आनंद संकोच मी इथेच अनुभवला. कॉलेजच्या निवडणुकीत लेडिज रिप्रेझेंटेटिव्ह पदासाठी माझ्यापेक्षा मोठ्या ३, ३ मुलींना हरवल्यानंतर विजयाचा जल्लोष आम्ही मैत्रिणींनी इथेच केला.आंतर विद्यापीठ खोखो स्पर्धेसाठी आम्हा नऊजणींपैकी सातजणी निवडल्या गेल्यानंतर ताठ मानेने याच कॉलेजच्या फ़ाटकातून प्रवेश केला.कॉलेज मॅगेझिनमधल्या माझ्या लेखाला वर्णनात्मक ललित लेखन या विभागात विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर पोर्चमधून झालेला टाळ्यांचा कडकडाट इथेच मी अंगावरचे रोमांच लपवत ऐकला.खो खो च्या अंतिम सामन्यात कमरेच्या हाडाला मार बसून रक्तबंबाळ झाले असतानाही सर्वाधिक गडी खांबावर टिपण्याचा मान मिळवला तोही भवानी मंडपातल्या कॉलेजमध्ये असतानाच.या कॉलेजने माझं व्यक्तिमत्व फ़ुलवलं.वरवर आक्रमक भासणारं पण अंतर्यामी हळुवार असं मन दिलं. नाव कमवायची संधी दिली.&lt;br /&gt;ते दिवसच तसे होते, " झोपाळ्यावाचूनि झुलायचे ! "&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-8158951370329089530?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/8158951370329089530/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=8158951370329089530' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/8158951370329089530'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/8158951370329089530'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2007/04/blog-post_18.html' title='कॉलेज'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-5475749160755057279</id><published>2007-04-11T22:29:00.000-07:00</published><updated>2007-05-20T07:03:52.835-07:00</updated><title type='text'>हायस्कूल</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;प्राथमिक शाळेत असताना हायस्कूलच्या मुली युनिफ़ोर्ममध्ये फ़िरताना पाहून ' देवा, मी मोठी कधी होणार' असा ध्यास लागलेला असायचा. त्यामुळे ५वीत गेल्यानंतर भला थोरला वर्ग बघून आकाश ठेंगणं झालं. बसायला बाक, एका बाकावर दोनच मुली, प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक. त्यामुळे आपण आता मोठे झालो आहोत आणि ३री, ४थीच्या मुली ' चिल्ली पिल्ली ' आहेत ही भावना प्रबळ झाली.त्याकाळी बहुतेक शाळांचा गणवेष म्हणजे निळा स्कर्ट आणि पांढरा कोलरवाला ब्लाऊज असा असे. फ़क्त रिबिनीचा रंग वेगवेगळा असे. दोन वेण्या व्यवस्थित तेल लावून घट्ट करकचून घातलेल्या, आणि त्याही अर्ध्या दुमडून वर बांधलेल्या., रिबिनीची फ़ुलं एकसारखी दिसतील अशा ! तेव्हा नायलोन हा प्रकार नवीनच बाजारात आला होता. त्याच्या तीन बोटं रुंदीच्या रिबन्स दोन वार लागत. कापलेल्या रिबिनीची टोकं उसवू नयेत म्हणून ती धावदोरा, हेम घालून शिवावी लागत. आता पिवळ्या रंगाची रिबन आणि पांढरा धावदोरा ही रंगसंगती वरच्या वर्गातल्या काही ' कलाकार ' मुलींना पटत नसे. आणि गरज ही शोधाची जननी असल्यामुळे त्यांना असं आढळून आलं की पेट्त्या उदबत्तीचं टोक रिबिनीच्या कडेवरून अलगद फ़िरवलं की तिथले धागे जळतात आणि उसवत नाहीत.मग काय , उचल उदबत्ती, की जाळ रिबिनीचं टोक असा प्रकार सुरु झाला. शिवाय काही मुलींनी उदबत्तीच्या टोकाने फ़ुलाच्या पाकळीसारखी चार भोकं पाडून कलाकुसरही केली होती. आता होती काय गोची, गणवेष तपासायचं काम पी. टी. च्या कुलकर्णीबाईंकडे [ प्राथमिकच्या नव्हे ] होतं. त्यांची एक पध्दत होती. मुलींना मारण्याच्या अगदी विरुध्द होत्या त्या. ' चुकलेल्या' मुलीच्या शेजारी येऊन त्या उभ्या रहायच्या. प्रेमळ आवाजात चूक कबूल आहे का ते विचारायच्या आणि मुलीने थरथरत 'कुबूल' म्हटलं की त्याच क्षणी तिच्या कानाची पाळी आपल्या बोटांच्या चिमटीत धरून अशी काही दाबायच्या की ती मुलगी पुढचे चार दिवस हातात कानाची पाळी धरूनच फ़िरली पाहिजे. मला वाटतं ' चुकलं, चुकलं " म्हणून कानाच्या पाळीला हात लावतात ना, ती पध्दत प्रथम सुरु करणारी व्यक्ती आमच्या शाळेची माजी विद्यार्थिनी असली पाहिजे. ... तर या रिबन प्रकरणी बाई अशा खवळल्या की , ना सुनवाई, ना तारीख , एकदम फ़ैसला ! दिसलं टोक जाळलेलं की सरळ कानाचा टोकालाच हात. दुस‍याच दिवशी सगळ्या क्रांतीकारी मुलींच्या रिबिनीची टोकं परत धावदोर्‍यात.त्या काळी साधारणपणे परित्यक्ता, विधवा स्त्रियांना आपल्या पायावर उभं राहण्यासाठी जे पर्याय उपलब्ध होते त्यातला शिक्षिकेची नोकरी हा सर्वात सुरक्षित आणि प्रतिष्ठेचा पर्याय मानला जायचा. तसे दुसर्‍याच्या घरी स्वयंपाक करणे, शिवणकाम, नर्सिंग हेही पर्याय असत, पन वरील कारणाने मध्यमवर्गीय सुशिक्षित स्त्रिया हा पर्याय निवडीत. त्यामुळे इतर शाळांप्रमाणे आमच्या शाळेतही अशा श्क्षिकांचे प्रमाण अधिक होते. स्वत;च्या खाजगी आयुष्यातल्या कटू अनुभवांमुळे त्यांच्या प्रतिक्रिया कधी कधी कडवट होत असाव्यात असं आता वाटतं, पण त्या सर्वांनी आपापले विषय आम्हाला समरसून उत्क्रुष्ट शिकवले.त्या वेळचे शिक्षक, बहुतांश शिक्षक आपापल्या विषयात पारंगत असत. बहुतेकाम्ना आपला विषय खुलवून शिकवण्याची हातोटी होती. त्यांच्याविषयी विद्यार्थ्यांत आदरयुक्त दरारा असे. त्यांच्या हातातली छडी हेच एकमेव कारण त्यामागे नसे.तर त्यांनी साहित्याचे , विज्ञानाचे अंतरंग आमच्यापुढे उलगडण्यात कोणतीही कसर सोडलेली नसे, हे असे. अर्थात बालसुलभ उतावळेपणामुळे आम्ही त्यांना त्रास देण्यात , दंगा करण्यात धन्यता मानली तरीही त्यातूनही जे ज्ञान आमच्यापर्यंत पोचवण्यात ते यशस्वी झाले ते आम्हाला आजही उपयोगी पडत आहे. पुढे स्वत: शिकवताना विद्यार्थ्यांना विषय समजावून सांगताना कधी कधी लख्खकन जान्णवून जायचं, अरे, ही आपली 'स्टाइल' सावंतबाईंसारखी / कुलकर्णीसरांसारखी आहे शिक्षक आपल्याला नकळत जन्मभराची शिदोरी देतात. आपण क्षणभर त्यांच्या आठवणीने गहिवरतो.एखाद्या उदास क्षणी त्यांची त्रास दिल्याबद्दल मनोमनी क्षमाही मागतो, पण त्याच क्षणी आपल्याला जाणवलेलं असतं,की कालचक्र उलट फ़िरून आपल्याला ' सुधारायची' संधी मिळाली तरी आपण परत तसेच वागू. हे म्हणजे वासराने गाईला दिलेल्या ढुशा असतात. त्याविना वासराला पिण्याचं समाधान नाही, आणि गाईला पान्हा फ़ुटत नाही..शिक्षक आणि विद्यार्थी यात इतकं जवळीकतेचं नातं निर्माण होण्याचं दुसरं कारण म्हणजे विद्यार्थ्यांची पटसंख्या हेही असावं असं मला वाटतं.वर्गात ३५ -४० मुली असल्याने शिक्षक सगळ्यांना ओळखत ते त्यांच्या घरगुती पार्श्वभूमीसह. आमचे शिक्षक कितीही वर्षांनी भेटले तर त्यांना नमस्कार करताना आमचा ऊर अभिमानाने भरून यायचाच, पण शाळेचे प्यून भेटले तरी त्यांची खुशाली विचारल्याविना पाय पुढे पडायचा नाही.या शाळएने मनुष्य म्हणून जगण्याला लागणारे संस्कार भरभरून दिले, अभ्यासाच्या परिक्षातून, खेळाच्या स्पर्धातून आणि शाळा सुटल्यावर केलेल्या नाटकाच्या तालमीतूनही.&lt;br /&gt;१९६५ ला ११वीची परीक्षा प्रथम श्रेणीत पास झाल्यानंतर कोणत्या कोलेजमध्ये प्रवेश घ्यायचा हा प्रश्न उभा रहिला.तेव्हा गोखले, आणि राजाराम असे दोनच उत्तम पर्याय कला आणि विज्ञान शाखेकडे जाणार्‍यांसाठी उपलब्ध होते. बहुताम्श मुली कला शखेचा पर्याय निवडत.आम्ही काही मुली आंतरराज्य स्पर्धा खेळलो असल्याने आम्हाला गोखले कोलेजकडून सन्मानपूर्वक आमंत्रणही मिळालं होतं.वडिलांचं म्हणणं मी गोखले कोलेजला जावं असं होतं. यामध्ये कोलेज खेळाडू म्हणून चारी वर्षांची फ़ी माफ़ करणार होतच, पण त्याबरोबर खेळाची शिष्यव्रुत्तीही देणार होतं, हे होतच, पण दुसरं कारण म्हणजे कोलेज घरापासून ३ मि. च्या अंतरावर होतं. आता मात्र त्यांची काळजी फ़ारच वाढली असावी. आपल्या सुकुमार [!] राजस बाळीला पळवून नेण्यासाठी जागोजाग घोडे तयार ठेवून राजकुमार तयारीत अशी दुष्टस्वप्नं त्यांना पडत असावीत.मीही बाणेदारपणे ' जाईन तर राजारामला नाहीतर शिकणार नाही" असं उत्तर दिल्याने त्यांचा नाईलाज झाला. आणि मी तरी काय करणार ? माझाही नाईलाज होता. गेले वर्षभर शाळा आणि कोलेज यामधलं ' ते' फ़ाटक खुणावत होतं ना मला डोळे मिचकावून ! त्यामुळे जून १९६५ ला मी अधिकृतपणे ' राजारामियन ' झाले. प्रथम वर्षासठी मिळणार्‍या शिष्यवृत्तीसाठी लागणार्‍या गुणांसह ! d&lt;br /&gt;draft&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-5475749160755057279?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/5475749160755057279/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=5475749160755057279' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/5475749160755057279'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/5475749160755057279'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2007/04/blog-post_11.html' title='हायस्कूल'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-2468654127829032522</id><published>2007-04-10T03:32:00.002-07:00</published><updated>2007-05-20T11:44:16.919-07:00</updated><title type='text'>गोष्टी आठवणीतल्या....३</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;१ली ते ४थी या चार वर्गाना मिळून दोन शिक्षक होते. कुलकर्णीबाई विधवा होत्या. नऊवारी लुगडं, पांघरून घेतलेला पदर. कपाळावर हिरवं गोंदण.दुसरे तारदाळकरगुरुजी. धोतर, कोट टोपी या वेषातले. ते मुख्याध्यापक असल्याने ४थीला शिकवत. आम्ही ४थीत गेल्यानंतर पहि्ल्याच दिवशी त्यांनी आम्हाला बजावलं होतं, 'मला गुरुजी म्हणायचं. सर म्हणाला तर थोबाड फ़ोडीन. ' आमच्या काळी ' समजावून ' देण्याची हीच पध्दत लोकमान्य होती. पण कधी कधी खुशीत असले, आणि कोणी ' स---र ' अशी हाक मारली की हसत हसत म्हणत, ' सर, सर, झाडावर, घराच्या कोलावर ".[ या ओळी असलेला खारुताईचा धडा आम्हाला १लीत होता.]&lt;br /&gt;४थीत गेल्यावर शाईची दोत आणि टाक या प्रकाराची एक भर आमच्या दप्तरात पडली.त्यातली शाईची दोत हातात धरून न्यावी लागे. शिवाय शाईचा ठिपका पडला तर टिपण्यासाठी गुलाबी रंगाचा टिपकागद बरोबर बाळगावा लागे. माझे वडिल लिहून झालं की त्यावर समुद्राकाठची रेती त्यावर भुरभुरत आणि कागद झटकत. ती रेती वर्गात नेऊन तशी झटकायची हे माझं एक (अधुरं) स्वप्न होतं तेव्हाचं..लिहिताना टाक शाईत योग्य प्रमाणात बुडवायचा, कागदावर योग्य प्रंमाणात दाब देऊन लिहायच या प्रकारात उजव्या हाताची पाची बोटं शाईने बरबटून निघत. ती मात्र डोक्यावरून हात फ़िरवून केसांना पुसायची असत. त्यामुळे पेपर लिहिताना प्रत्येकीचा हात थोड्या थोड्या वेळाने डोक्याकडे . यात शाईचा भाग किती आणि नशिबाला दोष देण्यासाठी किती ते निकालाच्या दिवशी कळे. परिक्षेचे पेपरही घरीच शिवलेले असत.दोन आखीव ताव अर्धे दुमडून मधोमध एक टाका घालून शिवलेले असत., आणि खालचा भाग ब्लेडने किंवा पेपरकटरने कापलेला असे. पहिल्या पानाच्या उजव्या कोप‍य़ात वडिल भावंडाकडून 'सुवाच्य' अक्षरात नाव घालून घेतलं की परिक्षेची तयारी पूर्ण होत असे. मला मात्र एका ठिकाणी बसून पेपर सोडवणे ही शिक्षाच वाटे. शक्य तितक्या लवकर त्या बिलामतीतून सुटका करून घ्यायची माझी इच्छा असे. मला आठवतं एकदा येत असूनसुध्दा कंटाळा आला या सबबीवर मी पेपर टाकून घरी आले होते, तेव्हा भडकलेल्या भावाला समजावताना मला पोटाशी धरून आई हसत म्हणाली होती," जाऊ दे रे, मार्कांचं काय एवढं ? तिला समजलय ना ? मग झालं तर.! " धन्य ती माता! अशी आई सगळ्यांना मिळो. पण आज लक्षात येतय की त्यामुळेच मी साहित्य, कला, खेळ या सर्वात रुची घेऊ शकले. त्या वेळचे संस्कार आजही उमलून येतात भुईचाफ़्यासारखे! अंतरंग भेदून. अंतरंगानजिकच, अंतरंग सुगंधित करणारे!&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-2468654127829032522?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/2468654127829032522/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=2468654127829032522' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/2468654127829032522'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/2468654127829032522'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2007/04/blog-post_10.html' title='गोष्टी आठवणीतल्या....३'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-8314746694599157107</id><published>2007-04-09T23:25:00.000-07:00</published><updated>2007-05-20T11:45:08.263-07:00</updated><title type='text'>गोष्टी आठवणीतल्या....२</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;एम. एल. जी. हायस्कूलच्या परिसरातच एम. एल. जी. ची प्राथमिक शाळा होती. माझं नाव घालायला बरोबर कोण आलं होतं ते आठवत नाही, पण आठवतं ते हे की, हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेच्या ओफ़िसच्या बाहेरचा जिना उतरून मी आणि माझ्याबरोबरच प्रवेश घेतलेली सुनिती कामत हातात हात घालून प्राथ मिक शाळेकडे पळत सुटलो होतो. वर्गातही आम्ही शेजारी शेजारीच बसलो होतो. नव्या को‍या पुस्तकावर दोन्ही बाजूने भाकरी थापल्यासारखे हात वाजवत मी तिला काहीतरी सांगण्यात इतकी गुंग झाले होते की, वर्ग सुरु झाल्याची घंटा कधी झाली आणि तारदाळकर गुरुजी वर्गात कधी आले ते मला समजलच नाही. आणि कळलं तेव्हा त्यांची पाच बोटं माझ्या गालावर उमटली होती आणि वर्गात सन्नाटा की काय तो पसरला होता. आपल्या मालकीचं 'गुरु ' समजण्यासाठी गुराखी त्याच्या पाठीवर डाग देतात ना, तसा तो छाप माझ्या गालावर बसला आणि माझा शाळेतला प्रवेश ख‍य़ा अर्थाने नोंदवला गेला.त्या काळी मुलांना बसण्यासाठी गुळगुळीत पोलिश केलेले पाटवजा फ़ळ्या असत. त्यावर बसून दप्तर फ़ळीखाली सरकवून द्यायचं. दप्तर म्हणजे तरी काय, तर एक पुस्तक मराठीचं, एक ' गणोबाच' एक गोष्टीरुप इतिहासाचं आणि पाटी. पाटीचे प्रकार तरी किती!दगडी, पत्र्याची, जोडपाटी, मण्यांची. त्यातले शेवटचे दोन प्रकार असणं हे बालजगतातलं फ़ारच श्रीमंती थाटाचं आणि असुयेचं प्रकरण असायचं. पाटीवर लिहिण्यासाठी दुधी पेन्सिल आणि पुसण्यासाठी फ़डक्याचा एक ओला बोळा आणि एक कोरडा बोळा. वर्गात पाटीची स्वच्छता दोन प्रकारानी व्हायची. पहिली डायरेक्ट मेथड. लाव पाटीला जीभ आणि ठेव विद्यादेवी सरस्व तीला जिभेवर. पण दोन चार वेळा शिक्षकांनी ' हस्तक्षेप ' केल्यानंतर मुली आपसुक दुस‍‍या प्रकाराकडे वळत.या प्रकारात बोळा इतका भिजवायचा की आपल्याबरोबर आणखीही चार पाट्या भिजल्या पाहिजेत. मग त्या वाळवण्यासाठी ' मंत्रजागर ' सुरु. " कावळ्या, कावळ्या पाणी घाल, चिमणी, चिमणी वारा घाल."आता कावळा सतत पाणी घालत राहिला [ आणि तो ते आणणार कुठून ?]तर चिमणीने पंखाने कितीही वारा घातला तरी पाटी वाळणार कशी, हा विचार तेव्हा आमच्या चिमुकल्या डोक्यात येत नसे. त्यामुळे पाटी लवकर वाळावी म्हणून आमचा आवाज इतका वाढायचा की, ' पाट्या काढा ' असं सांगून शेजारच्या वर्गातली गणितं तपासायला गेलेल्या बाई हातात पट्टी घेऊन धावत आल्याच पाहिजेत. मग त्यांच्या पट्टीच्या दांडपट्ट्यात 'ओल्या'बरोबर 'सुके'ही जळायचं ती गोष्ट वेगळी. ही झाली पाटीची दैनंदिन स्वच्छता.साप्ताहिक स्वच्छता म्हणजे दिवाळीच रासन्हाणच ! प्रथम आईकडून कोळशाचा मोठ्ठा तुकडा मागून घ्यायचा. आणि तांब्याभर पाणी. मग फ़्रोकचा घेर गच्च आवळून स्वत: पाटावर नीट बसायचं आणि फ़रशीवर पाटी. थेंब थेंब पाणी पाटीवर टाकत सहाणेवर गंधाचं खोड घासावं तसा कोळसा पाटीवर घासत रहायचं. मग पाटी तिरकी करून वाळत ठेवायची. आणि मग काळी पाटी आणि त्याहून काळे हात धुण्यासाठी बंबभर पाण्याचा स त्या ना श ! एवढ्यावर कुठलं भागायला ? पाटीची लाकडी चोकट उजळवण्यासाठी ब्लेडचं पान घेऊन ते उलट सुलट फ़िरवून असं घासायचं की त्याची परिणती बोट कापण्यात आणि आईच्या गडगडाटासह बोटाला चिंधी बाम्धण्यात व्हायची .&lt;br /&gt;draft&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-8314746694599157107?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/8314746694599157107/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=8314746694599157107' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/8314746694599157107'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/8314746694599157107'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2007/04/blog-post_09.html' title='गोष्टी आठवणीतल्या....२'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-2016629911758413918</id><published>2007-04-04T03:29:00.000-07:00</published><updated>2007-04-04T05:43:58.840-07:00</updated><title type='text'>गोष्टी आठवणीतल्या</title><content type='html'>काही काही लोकांना आपल्या खूप लहानपणीची आठवण असते.अगदी दीड दोन वर्षापासूनची. पण मला मात्र वयाची पहिली ५ वर्षं आठवत नाहीत.आठवते ती खासबागेतली माझी पहिली शाळा. राधाकृष्णाच्या देवळाजवळची.घराच्या अगदी जवळ. खर तर सगळ्यात जवळची म्हणजे प्रायव्हेट हायस्कूल. कारण या शाळेच्या मागच्या गल्लीत अगदी शेवटी आमचं घर होतं. पण ती मुलांची शाळा असल्यामुळे तिचा उपयोग नव्हता. महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल तशी लांब(?) होती ५ वर्षाच्या मुलीच्या मानाने. म्हणजे आमची पूर्ण गल्ली पार करून उजवीकडे वळलं की प्रायव्हेट हायस्कूल. तिथून पुढे गेलं की डाव्या हाताला पॅलेस थिएटर. त्याला डावीकडे ठेवून वळलं की कुस्त्यांचं मैदान. या मैदानावरून डावीकडून मंगळवार पेठेतून येणारा आडवा रस्ता देवल क्लबकडे जात होता.या रस्त्यावर रहदारी असायची. आता कोल्हापूरसारख्या शहरात ५०-५५ वर्षापूर्वी रहदारी ती काय असणार ? एखादा टांगा, काही सायकली, किंवा क्वचित एखादी मोटार.पण हा "रहदारीचा" रस्ता ओलांडून आपली बाळी शाळेत कशी जाणार ही काळजी माझ्या आईपेक्षा माझ्या वडलांना अधिक वाटत असल्याने त्यांनी माझं नाव जवळच्याच " अहिल्यादेवी गर्ल्स स्कूल" मध्ये इयत्ता पहिलीत घातलं. या शाळेच्या बाहेर एक उंबराचं भलं मोठं झाड. दुपारच्या वेळेला टांगा, बैलगाड्या सोडून गाडीवान झाडाखाली शिदोरी सोडत. झाडालगत देऊळ, देवळाच्या मागे लागूनच 'अहिल्यादेवीचं ' पटांगण होतं . पटांगण ओलांडून गेलं की शाळेच्या उम्च दगडी पायर्‍या लागत. त्या चढून गेलं की शाळेचा व्हरांडा. समोर काही वर्ग, डाव्या बाजूला जिना. जिन्याच्या सुरवातीला शाळेची पितळी घंटा. वरही काही वर्ग होते. या शाळेत मी एकच वर्ष होते, त्यामुळे या शाळेच्या आठवणी फ़ारशा नाहीत. मात्र एक सर आठवतात, उंच धिप्पाड. नेहमी झब्बा पाय़जमा या वेषात असत. तेच पी. टी. घेत आणि संगीतही. या दोन विषयांची सांगड ते कशी काय घालत होते असं मला आज वाटतं. तेव्हा मात्र त्यांना बघितल की जाम भीती वाटायची. भला मोठ राक्षस आपल्याला मटकावायला आलाय की काय असं वाटायचं. आणखी भीतीदायक व्यक्ती होत्या ,त्या म्हणजे शाळेच्या मधल्या सुट्टीत पोत्यात चणे कुरमुरे विकणारा गंगाराम आणि आमसोलं विकणारा एक गोरा भुरका म्हातारा. गंगारामची चुरमुर्‍याची भट्टी होती मंगळवार पेठेत. काळ्यारोम गंगारामचा खालचा ओठ भलताच जाड होता आणि लोंबतही असे. त्यामुळे तो कितीही मवाळपणे बोलला तरीही हा आपल्याला मारणार असंच वाटायच मग जरा मोठी झाल्यावर लक्षात आल की गंगाराम अतिशय प्रेमळ आणि माणसांचा भुकेला आहे. दुसरा तो सुकामली विकणारा म्हातारा. फ़णसपोळी, आंब्याची साटं, असा कोकणचा मेवा पोत्यात घालून बिचारा विकत फ़िरायचा.तर तो त्याच पोत्यात मुलींना घालून पळवून नेतो आणि " काय तर करून लांब तिकडं विकून टाकतो म्हणे, पाआआप !" असं मोठ्या मुलींकडून [इयत्ता ४थी] ऐकायला मिळत असल्यामुळे त्याचा आवाज ऐकू आला की माझी पाचावर धारण बसत असे. याच मुली त्याच्याचकडून काहीबाही विकत घ्यायच्या तेव्हा तर त्या मला उच्च कोटीच्या वीरांगनाच वाटायच्या. आईला या माणसाबद्दलची माझी भीती सांगितल्यानम्तर तिनेही फ़ारसं लक्ष दिल नाही, ते बहुधा याच विचाराने असावं की या भीतीने तरी आपली मुलगी शाळा सुटेपर्यंत शाळेच्या बाहेर पडायची नाही.त्यामुळे शनिवारच्या सकाळच्या शाळेच्या वेळेत सगळ्या मुली कोवळ्या उन्हात उंबरं गोळा करत असत तरीही आम्ही मात्र लक्ष्मण रेषेच्या आतच !&lt;br /&gt;पण पहिली होता होता आईच्या लक्षात आलं की या शाळेत राहून आपल्या मुलीचा शैक्षणिक आलेख फ़ारसा उंचवण्याची शक्यता दिसत नाही, तेव्हा तिने मला महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल मध्ये घालण्याविषयी वडिलांचं मन वळवलं. माझ्या आजूबाजूला राहणार्‍या बहुतेक सगळ्या मुली याच शाळेत जात असल्यामुळे त्या आपल्या मुलीला नीट शाळेत नेतील आणि आणतील असा भरवसाही तिला वाटला असावाआणि दुसरीपासून मला महाराणी लक्ष्मीबाई च्या प्राथ्मिक [ ज्याचा उच्चार मी किती तरी दिवस प्रार्थमिक असा करत होते आणि त्याचा संबंध प्रार्थनेशी जोडत होते] शाळेत दाखल झाले . माझं " पालकत्व " शेजारी राहणार्‍या निडसोशीकरींच्या मीना , बेबी या मुलींनी आणि मागच्या गल्लीतल्या सरिताने आनंदाने पत्करलं नंतर नंतर तर मी सरिताचं ' शेपूट ' म्हणून तिच्या मैत्रिणीत ओळखली जावू लागले.&lt;br /&gt;कोल्हापूर हे संस्थान असल्यामुळे इथल्या शाळांची नावम राजघराण्यातल्या स्त्री- पुरुषांच्या नावावरून ठेवली गेलेली होती. १९५० च्या सुमाराला कोल्हापुरात अहिल्यादेवी, महाराणी लक्ष्मीबाई, पद्माराजे, जिजामाता, ताराराणी अशा मुलींच्या आणि प्रायव्हेट , विद्यापीठ, राजाराम, आयर्विन अशा मुलांच्या नावाजलेल्या शाला होत्या. म. ल. ग. हायस्कूलाअमच्या घरापासून फ़ार तर अर्ध्या फ़र्लांगावर होती. शाला राजवाड्याच्या परिसरातच असल्यामुळे शाळेभोवती उंचच उंच भिम्त भांधलेली होती. बाम्धकामही राजवाड्याच्या धाटणीचं होतं कदाचित तो पूर्वी राजवाड्याचाच भाग असावा. शाळेचं मागचं फ़ाटक आणि राजाराम कोलेजचं मागचं फ़ाटक एकच होतं. त्या फ़ाटकाजवळ प्राथमिक शाळा होती. २री ते ४थी या काळात त्या फ़ाटकाकडे पडणारी बुचाची फ़ुलं वेचण्यासाठी आमच्यात अहमहमिका लागायची,पण पुढे हायस्कूलमध्ये गेल्यावर त्या फ़ाटकाकडे जाणं म्हणजे " अव्वा, तिथ जाऊन राजारामची पोरं बघायची असणार" असा शिक्का आपल्यावर पडेल ही धास्ती असल्याने ते " निषिध्द क्षेत्र " मानलं जाऊ लागलं. तशीही आमची ' मास पी. टी. ' पहाण्यासाठी ' राजाराम' ची काही टवाळ पोरं तिथे उभी असायची, त्यामुळे मोठ्या मुलीम्च्या मनात त्या फ़ाटकाबद्दल थोडी हुरहुरयुक्त उत्सुकता असायची.काही धीट मुली आमच्या शाळेच्या खडूस प्यून ' बक्षू' ची नजर चुकवून तिथे एक फ़ेरी मारून येत, पन्ण अशा मुली बाकीच्या पापभिरू मुलींच्या ब्लेकलिस्टवर असत. पण ती नंतरची गोष्ट. आधी म. ल. ग. हायस्कूलच्या प्राथमिक शाळेविषयी.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-2016629911758413918?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/2016629911758413918/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=2016629911758413918' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/2016629911758413918'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/2016629911758413918'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2007/04/blog-post.html' title='गोष्टी आठवणीतल्या'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-3740276346765125984</id><published>2007-03-19T04:43:00.000-07:00</published><updated>2007-03-19T06:00:08.506-07:00</updated><title type='text'>गुढीपाडवा</title><content type='html'>आज मराठी वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस ! रोजच्यासारखाच उगवलेला,पण डोळे उघडल्याबरोबर पहिली जाणीव झाली की आज पाडवा.बाहेर चांगलच उजाडलेलं होतं. ताडकन पांघरूण बाजूला करून उठले तर दुस‍र्‍या क्षणी जाणवलं की गडबड करण्याची काहीच गरज नाही. आज सगळ्यांचा सुट्टीचा दिवस. परत पांघरूण अंगावर ओढून डोळे मिटले, पण पापणीच्या आत ५० वर्षांपूर्वीची गुढी डोलू लागली.&lt;br /&gt; तेव्हा या वेळपावेतो सगळ्यांच्या दारात गुढी उभी राहिलेली असे. काय शामत होती सणाच्या दिवशी "इतक्या " उशिरापर्यंत अंथरुणात लोळत पडण्याची ? कारण "ज्ञान, संपत्ती आरोग्य," मिळवण्यासाठी " लवकर निजे आणि (मुख्य म्हणजे) लवकर उठे "हा साधा, सोपा, सरळ मार्गच त्या काळी मोठ्या माणसांना माहीत  होता. त्यामुळे लवकर उठल्याखेरीज गत्यंतर नसायचं. एरवी त्याचं फ़ारसं काही वाटायचं नाही, पण गुढीपाडव्याला मात्र एकदम दुपार उजाडली तर काय बहार होईल हाच विचार मनात असायचा. कारण दात धुतले न धुतले तोच आई कडुलिंबाची पानं घेऊन तयारच असायची.प्रथम ती चावायची, मगच गोड खायला मिळायचं  ( ही सवलत मी शेंडेफ़ळ असल्यामुळे फ़क्त मलाच असायची, मोठ्या भावंडाना ती पानं  गिळावीही लागायची.) त्यामुळे नववर्षाची सुरवात "आई, नको ना ग, पुढच्या वर्षी नकी खाईन ' याच वाक्याने व्हायची हे ठरलेलं.&lt;br /&gt;पण एवढं सोडलं तर मग मात्रं धमाल!  दारासमोरचं अंगण , खर तर रस्ताच, झाडणे, शेणसडा घालणे आणि मग रांगोळी. आपली रांगोळी सगळ्यांच्या आधी घालून व्हावी हे त्या दिवसातलं माझं स्वप्न होतं. पण शेजारच्या अक्का पहाटेच उठून रांगोळी घालून तयार असत आणि त्यांच्या तालमीत तयार झालेल्या त्यांच्या मुलीही. परत वर मला रांगोळीत मदत करायला तयार ! ओळीत सडा घालून रांगोळीने सजलेली ती अंगणं बघताना आतून कुठून तरी पारिजातकाचं फ़ूल उमलल्यागत सुरेख वाटायचं.मग गुढी उभारायची गडबड . सूर्याच्या कोवळ्या उन्हात रंगीबेरंगी खणांनी नटलेल्या,माळांनी सजलेल्या गुढ्या 'चैत्राच्या' आगमनाची ललकारी देत असायच्या. त्यांचे सोनेरी खण उन्हात झळाळून उठायचे. नवीन कपडे घालून , हातात नवीन वर्खाच्या बांगड्या झळकवत, वेणीचं नव्या रिबिनीच फ़ूल चाचपत  मैत्रिणींच्या गळ्यात गळे घालून गुढ्या बघताना सकाळ कधी सरायची कळतच नसे.घराघरातून पक्वान्नांचे गोड वास आणि तळणाचे सुगंध यायला लागले की पळत घर गाठायची घाई उडायची.&lt;br /&gt;आज 'तो' पाडवा आठवून वाईट वाटतय का असं मी (डो्ळे मिटूनच )  मनाला विचारलं. मनाने हलकेच नकारर्थी मान हलवली.ते हसून म्हणालं " वाईट काय वाटायचं त्यात ? प्रत्येक वे्ळचे नियम वेगळे, प्रत्येक वे्ळच्या  गमती वेगळ्या.तुला लवकर उठून आवरण्यात मजा वाटतेय ना , मग आवर.मस्त पैकी चहा घे कपात ओतून , बस अंगणातल्या पायरीवर. मी आहे तुझ्या सोबत.  चहा थोडा जास्त कर मात्र, कारण रोजच्या धकाधकीत दमलेल घर होईलच जागं चहाच्या वासाने. आणि जमतीलच सगळे तुझ्या भोवती आपापले कप भरून.त्यांच्या संगतीत आनंदाची कारंजी उडताना बघणं हे गुढी उभारण्यापेक्षा वेगळं थोडच आहे ?मग 'ती' गुढी उभारायला थोडा वेळ लागला तर बिघडलं कुठे ?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-3740276346765125984?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/3740276346765125984/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=3740276346765125984' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/3740276346765125984'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/3740276346765125984'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2007/03/blog-post_19.html' title='गुढीपाडवा'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-5704218594055156111</id><published>2007-03-15T09:30:00.000-07:00</published><updated>2007-03-15T20:47:18.502-07:00</updated><title type='text'>आईपण</title><content type='html'>कितीही नको म्हटलं तरी तू मला आठवत राहतेस तशी&lt;br /&gt;औषधाच्या दुकानाच्या पायरीशी&lt;br /&gt;औषधाच्याच साइड इफ़ेक्टविषयी बोलत असलेली !&lt;br /&gt;पण खरच का तू औषधाविषयी होतीस बोलत ?&lt;br /&gt;वरवर वाटणारं सुसंगत ?&lt;br /&gt;मीही टाळत होते तुझ्या डोळ्यात पहाणं&lt;br /&gt;घाबरत होते आत डोकावणं !&lt;br /&gt;कारण मग&lt;br /&gt; दिसल्या असत्या मला खोल भोवर्‍यातल्या&lt;br /&gt;खदखदत्या उष्ण चिळकांड्या,&lt;br /&gt;लक्तरं सुन्न मनाची ,&lt;br /&gt;अन विखुरलेल्या घरट्याच्या काड्या !&lt;br /&gt;कदाचित उसनं अवसान टाकून पळतही सुटले असते सैरावैरा,&lt;br /&gt;पण मग बोलू लागलो, तर हललीसशी वाटलीस जरा जरा&lt;br /&gt;ऐकवू लागलीस&lt;br /&gt;नाद रुमझुमत्या पैंजणांचे,&lt;br /&gt;साद चिमण चार्‍याचे!&lt;br /&gt;मी फ़क्त वाट पहात होते&lt;br /&gt;उरी कोंडल्या तुफ़ानाची,&lt;br /&gt;बांध पडल्या उधाणाची !&lt;br /&gt;पण तू उभी, घट्ट पाय रोवून&lt;br /&gt;श्वेत कफ़नात विखुरलेलं आईपण गाडून&lt;br /&gt;थरथरत्या ओठांवर दात दाबून&lt;br /&gt;छिन्न "धर्म"पुत्रासाठी!&lt;br /&gt;केवळ त्याच्याचसाठी !&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-5704218594055156111?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/5704218594055156111/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=5704218594055156111' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/5704218594055156111'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/5704218594055156111'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2007/03/blog-post_15.html' title='आईपण'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-8736179744519158410</id><published>2007-03-07T08:07:00.000-08:00</published><updated>2007-03-07T08:30:32.592-08:00</updated><title type='text'>निरोप</title><content type='html'>तुझ्या भल्या थोरल्या बॅगेवरची पिवळी रिबन बांधून झाली असेल तर जरा थांब,&lt;br /&gt;क्षणभर मागे वळून बघ.&lt;br /&gt;रिबन घट्ट बांधली आहे, हे तुला माहीत आहे,&lt;br /&gt;यादीबरहुकूम सामान भरलय हेही तुला नीटच आठवतय,&lt;br /&gt;उगीच रिबिनीच्या फ़ुलाशी चाळा करत राहू नकोस&lt;br /&gt;तुझ्या अस्वस्थ हालचालींना लगडल्या आहेत&lt;br /&gt;आतापर्यंतच्या आठवणी...&lt;br /&gt;आजूबाजूचा अबोल आश्वस्त वावर...&lt;br /&gt;समंजस उबारा !&lt;br /&gt;ज--रा थांब आणि मागे बघ.&lt;br /&gt;तुझ्या मागेच तर आहे मी&lt;br /&gt;तुला आवडणार्‍या लाडवाच्या, थालीपिठाच्या आणखी कशाकशाच्या पुड्या घेवून,&lt;br /&gt;तुझ्या कपड्याच्या चळती ठेवत---&lt;br /&gt;तुझ्या पुस्तकांचा ढीग सावरत---&lt;br /&gt;उगीचच इकडून तिकडे फ़िरत.&lt;br /&gt;म्हणूनच म्हणते आता हा लपंडाव थांबवूया&lt;br /&gt;ये माझ्या मुला, आपण मोकळे होवूया !&lt;br /&gt;झरणार्‍या आसवात वाहू दे उरात कोंडलेला वियोग&lt;br /&gt;परस्पराविना काढायच्या दिवसांचा बागुलबुवा.&lt;br /&gt;ये माझ्या  बाळा पदरा आड झाकून घेऊ दे तुला&lt;br /&gt;मांडीवरच्या जावळाचा स्पर्श साठवून घेऊ दे मला.&lt;br /&gt;मग उद्या डोळ्यात सूर्य साठवून निघशील तू तेजाकडे&lt;br /&gt;त्यावेळीही मी  मागे असेन तुझ्या&lt;br /&gt;माझी संध्याकाळ ओंजळीत घेऊन !&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-8736179744519158410?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/8736179744519158410/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=8736179744519158410' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/8736179744519158410'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/8736179744519158410'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2007/03/blog-post_07.html' title='निरोप'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-1187151028776008954</id><published>2007-03-05T19:59:00.000-08:00</published><updated>2007-03-05T20:37:17.038-08:00</updated><title type='text'>कारखाना बंद पडल्यानंतर</title><content type='html'>फ़ारा दिवसांनी भेटलास मित्रा, तुझं स्वागत असो !&lt;br /&gt;बैस ऐसपैस, जरा पाठ टेक&lt;br /&gt;मधल्या काळातल्या काही कथा, काही व्यथा&lt;br /&gt;ऐकव आणि ऐक !&lt;br /&gt;अर्ध्या वयापर्यंतचे आपले धागे, एकत्रच तर होते विणलेले&lt;br /&gt;गर्द पोपटी चैतन्याने भारलेले, अन सोनेरी तेजाने लखलखलेले !&lt;br /&gt;सरळ सुरळीत चालू राहती वाट ,&lt;br /&gt; तर कदाचित बदललाही असता आयुष्याचा घाट.&lt;br /&gt;भेटलो असतो आपण शुभ्र माथ्याने, थरथरत्या मानेने.&lt;br /&gt;केल्या असत्या गोष्टी , मुला नातवंडांच्या&lt;br /&gt;किंवा आपापल्या निव्रुत्ती समारंभाच्या !&lt;br /&gt;मित्रा, हसलाससा खिन्नसा ?&lt;br /&gt;अजूनही आठवतो कारे तुला&lt;br /&gt;एक एक दिवा मावळता अंधुकसा ?&lt;br /&gt;बंद घरातला एकेक कवडसा?&lt;br /&gt;गाडी घुंगरांच्या किणकिणाटात फ़रपटत जाणाया सावल्या मूकशा ?&lt;br /&gt;बघ, अजूनही हात थरथरतोय तुझा&lt;br /&gt;अरे, खूप वर्षं झाली मित्रा,&lt;br /&gt;जागत्या जागेचा मसणवटा होवून&lt;br /&gt;पांगली बघ माणसं आपली&lt;br /&gt;गोणत्या बोचक्यात आपलं जग भरून&lt;br /&gt;ओठ मिटले उमासे मागे ठेवून !&lt;br /&gt;शांत हो मित्रा,&lt;br /&gt;घामेजलेला हात पूस आणि पाणावलेले डोळेही, जमलं तर.&lt;br /&gt;खरं आहे तुझं&lt;br /&gt;वारा सुटतोच असा कधी कधी धूळ उडवत......&lt;br /&gt;आणि मित्रा, नको येऊस परत&lt;br /&gt;बोलू लागतात रे मूक वेदना,&lt;br /&gt;अद्न्याताच्या अंधाराने भयभीत डोळे&lt;br /&gt;सुकत चाललेल्या जखमा उसवत,&lt;br /&gt;दबल्या आठवणींना चालवत.&lt;br /&gt;जड जातं रे सावरायला&lt;br /&gt;आपलं उखडलेपण रोवायला&lt;br /&gt;अवघड जातं रे मित्रा, खरंच अवघड जातं&lt;br /&gt;शीळ घालतं रानपाखरू परत आत कोंडायला !&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-1187151028776008954?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/1187151028776008954/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=1187151028776008954' title='8 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/1187151028776008954'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/1187151028776008954'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2007/03/blog-post.html' title='कारखाना बंद पडल्यानंतर'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>8</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-7534735698400086729</id><published>2007-02-25T08:28:00.000-08:00</published><updated>2007-02-25T09:12:50.247-08:00</updated><title type='text'>वडील</title><content type='html'>ज्या काळात वडिल घरी आले की मुलं पुस्तकात डोकं खुपसून बसत असत, आणि मुलांना "कानफ़ाडून " सुतासारखं सरळ करणं हे वडलांचं आद्य कर्तव्य मानलं जात होतं त्या काळात , ४५, ५० वर्षांपूर्वी मी माझ्या वडलांना 'ए वडील' असं म्हणत होते, याचं कारण एवढच की तीन मुलांनंतर मुलीसाठी तळमळून वाट पाहिल्यानंतर माझा जन्म झाला होता. पुढे मोढ्या भावाच्या धाकाने मी त्याम्ना इतर भावम्डाम्प्रमाणे 'बापू' म्हणायला सुरवात केली , पण तेव्हाही त्यानी " वडील गोड वाटत ग! " असा निषेध नोंदवला होताच. माझ्या जन्माच्या वेळी आई आत कळा देत असताना शेवटी कंटाळून ते समोरच्या होटेलमध्ये चहा प्यायला गेले, बहुधा वैतागून की या वेळीही मुलगाच होणार पण जेव्हा भाऊ माझ्या जन्माची बातमी साम्गयला आला, तेव्हा तोंडाला लावलेली बशी तशीच टाकून ते पळत सुटले होते आ्णि मला उचलून घेतलं होतं. ही गोष्ट मी त्यांच्याकडून कितीदा ऐकली असेल, पण दर वेळी तोच आनंदित चेहरा अतीव समाधानाने उजळून निघालेला दिसे.आयुष्यभर त्यांनी माझ्यावर केवळ प्रेमच केलं. पावसाळ्यात भिजलेली छत्री वाळायला कोपयात ठेवली असली की मी भाजीवाली आणि ते गिर्हाइक किती वेळ खेळ चाले त्याला मर्यादा नसे. १० वर्षाच्या मुलीने पाय दुखले म्हटलं की लगेच उचलून घेताना ते आईच्या कपाळावरच्या आठ्यांकडे बघतच नसत. केव्हाही त्यांनी मला झुकतम्च माप दिलम आहे. आता अस वाटतं की त्यांनी मला जरा जास्तच लाडावलं होतं पण माझ्यातली तरल संवेदनशीलता, साहित्याची आवड त्याम्च्या रक्तातूनच आलेली आहे. माझी मुल, माझी नातवंडं माझ्या गोष्ट साम्गण्यावर खूष असतात पण त्यांनी बापूंनी साम्गितलेल्या गोष्टी ऐकल्या नाहीत. विशेषत: मर्चंट ओफ़ वेनिस मधला " रक्ताचा थेंबही न सांडता मांस काढून घे " हा प्रसंग  सांगताना ते जो अभिनय करत तो...... !&lt;br /&gt;माझे आई आणि वडील  हे एक वेगळंच संयुग होतं. म्हणजे आई अतिशय खंबीर तर वडील तितकेच हळवे. शाळेत कशातही भाग घ्यायला त्यांनी प्रोत्साहनच दिलं हे खरं, पण मग मी मेचेस खेळायला बाहेरगावी निघाले की आई तयारीला लागायची आणि हे पोस्टात जायचे. येताना १२ पोस्टकार्डस घेऊन यायचे आणि त्यावर पत्ता लिहून माझ्या हातात ठेवायचे. मीही न बोलता बेगेत ठेवत असे. कारण दररोज एक कार्ड मला पोस्टात टाकायचं असायचं माझी खुशाली कळवण्यासाठी. [तेव्हा आतासारखे फ़ोन नव्हते ना !]&lt;br /&gt;आज मी तटस्थतेने त्यांच्या विषयी लिहू शकते पण माझ्या वयाच्या २७ व्या वर्षी त्यांना केन्सर झाला आहे ही गोष्ट मला मुळापासून उन्मळून पडायला पुरेशी होती. ३-४ महिने त्यांची म्रुत्यूशी चाललेली झुंज मी अखेरपर्यंत पाहिली . कारण मी तेवढा काळ त्यांच्याजवळ घालवावा असं माझ्या सासर्यानीच मला सुचवलं होतं. कणा कणाने संपत चाललेल्या त्याना बघणं ही मोठीच परीक्षा होती. त्यांच्याच शब्दात हे म्हणजे "फ़ाशीची शिक्षा झालेल्या कैद्यासारखं होतं, शिक्षा झाली आहे, पण तारीख माहीत नाही."&lt;br /&gt;आज त्याना जाऊन ३० वर्षं झाली.  आज त्याना आठवताना काळजात कळ उठत नाही, पण एक  गोष्ट लख्ख जाणवते की आपल्याला वेगळेच वडील मिळाले होते, काळाच्या ५ पावलं पुढचे! कदाचित त्यानी दिलेली शिदोरी मला माझी मुलं वाढवताना उपयोगी पडली . त्यामुळे त्याना आठवताना एक सुंदर स्वप्न आठवल्यासारखं वाततं. आनंददायी !    &lt;br /&gt;draft&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-7534735698400086729?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/7534735698400086729/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=7534735698400086729' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/7534735698400086729'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/7534735698400086729'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2007/02/blog-post_25.html' title='वडील'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-8827048042065176295</id><published>2007-02-22T08:10:00.000-08:00</published><updated>2007-02-22T09:01:03.550-08:00</updated><title type='text'>वय वाढताना</title><content type='html'>वयाची एक गंमतच असते. ते कधी वाढतं ते कळतच नाही. म्हणजे " अरे, किती मोठी झाली, एवढीशी होती ! " हे वाक्य मी आता आता ऐकल्यासारखं वाटत होतं पण लक्षात आलं की त्यालाही ४५ , ५० वर्षं झाली. मग अजूनही उडत्या चालीची गाणी ऐकताना पाय ठेका का धरतात ? एखाद्या " मासाहारी " विनोदाला खळखळून दाद का द्यावीशी वा्टते ? चार समवयस्क मैत्रिणी भेटल्यावर एखादीची " खेचण्यात" कोलेजच्या दिवसाइतकीच मजा येते. अजूनही मानसिक वय ३५ च्या पुढे गेलय असं वाटतच नाही. हे कसं काय ?&lt;br /&gt;            पण आपण अस म्हटलं तरी जग हे लक्षात ठेवतच. अगदी दारात येणारा भाजीवालासुध्दा "आजी, " म्हणायला लागतो आणि कोणाला त्यात काहीही गैर वाटत नाही हे विशेष. पहिल्या पहिल्याने मी दुसया कोणाला तरी असेल म्हणून दुर्लक्ष केलं , पण शेजारच्या षोडशीने हाताला धरून , "आजी, भाजीवाला तुम्हाला बोलावतोय."  म्हणून आजीपणावर शिक्का मोर्तबच करून टाकलं. नंतर अर्धा तास माझ्या कानातून गरम वाफ़ा येत होत्या, पण आता मात्र सरावले. आजी म्हटलं की ती मीच हे पटकन लक्षात यायला लागलं.  तरी मन अजून माने ना ही अंदरकी बात है !&lt;br /&gt;आमच्या नातीही गमतीदार. गावाला निघताना सगळ्या मोठ्यांना नमस्कार करत माझ्यापर्यंत येतील आणि मिठी मारतील , म्हणतील, तुला कशाला नमस्कार? तुला तर आमच्यापेक्षा जास्त नवे सिनेमे माहीत आहेत आणि नट सुध्दा. तू तर आमच्या एवढीच आहेस.&lt;br /&gt;           पण आता त्याना सांगणार आहे, अग, आजी आता खरच म्हातारी झाली. परवा दिवे आगरच्या समुद्र किनायावर समुद्र लाटे लाटेने फ़ुटत होता. पोरासोरांच्या आरडा ओरड्याने किनारा दणाणला होता, समुद्राची गाज ऐकू आली की उचंबळून स्वत:ला लाटेवर झोकून देणारी मी, शांतपणे किनायावरून चालत होते, पाण्यात पावलंही न भिजवता, एक टक आकाशातले रंग न्याहळत,एखाद्या मित्राला खूप वर्षानंतर भेटावं आणि मधल्या विरहाने आतला रस आटून जावा तसं समुद्राला फ़क्त भेटून परत फ़िरले, मी कोरडी.&lt;br /&gt;   म्हणून म्हटलं वयाचं काही कळतच नाहे, कधी वाढलं ते समजतच नाही !&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-8827048042065176295?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/8827048042065176295/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=8827048042065176295' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/8827048042065176295'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/8827048042065176295'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2007/02/blog-post_22.html' title='वय वाढताना'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-2488042723877149679</id><published>2007-02-21T03:48:00.000-08:00</published><updated>2007-02-21T04:09:58.613-08:00</updated><title type='text'>सागर</title><content type='html'>सागर सतत बोलवत असतो&lt;br /&gt;कोवळ्या उन्हाच्या चमचमत्या लाटात&lt;br /&gt;सिंदबादच्या गल्बताला&lt;br /&gt;रत्नजडीत संदुकेला&lt;br /&gt;एकडोळ्या चाच्याला&lt;br /&gt;दूर क्षितिजावर झुलवत राहतो&lt;br /&gt;सागर सतत बोलवत राहतो !&lt;br /&gt;उधाणलेल्या लाटांनी,&lt;br /&gt;उसळणाया तुषारांनी,&lt;br /&gt;मत्त धुंद गाजेनी,&lt;br /&gt;चिंब आवेगाने खुणावत राहतो&lt;br /&gt;सागर सतत बोलवत राहतो !&lt;br /&gt;अस्ताच्या रक्तवर्ण मित्रासह,&lt;br /&gt;काजळणाया धूम्रवर्ण नभासह,&lt;br /&gt;किनायाशी फ़ुटणाया फ़ेनपुष्पासह&lt;br /&gt;थोपटत शांतवत राहतो&lt;br /&gt;सागर सतत बोलवत राहतो !&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-2488042723877149679?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/2488042723877149679/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=2488042723877149679' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/2488042723877149679'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/2488042723877149679'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2007/02/blog-post_21.html' title='सागर'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-5755453804920808956</id><published>2007-02-04T19:59:00.000-08:00</published><updated>2007-02-04T20:02:55.187-08:00</updated><title type='text'>अंधार सर्वसाक्षी</title><content type='html'>अंधार गर्भवासी,&lt;br /&gt; अंधार बीजरक्षी!&lt;br /&gt;अंधारल्या उबदार कोषी, &lt;br /&gt;पहुडल्या रक्तपेशी&lt;br /&gt; स्पर्शण्या उन्मुक्त प्राची,वाट पाहती उद्याची!&lt;br /&gt;अंधार सर्वसाक्षी&lt;br /&gt; अंधार सर्वभक्षी !&lt;br /&gt;अंधारल्या कालकोठी, &lt;br /&gt;विसावल्या विदीर्ण पेशी&lt;br /&gt;आसावल्या भयभीत नेत्री, वाट पाहती उद्याची!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-5755453804920808956?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/5755453804920808956/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=5755453804920808956' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/5755453804920808956'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/5755453804920808956'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2007/02/blog-post_2504.html' title='अंधार सर्वसाक्षी'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-8240692545989755589</id><published>2007-02-04T19:51:00.000-08:00</published><updated>2007-02-04T19:55:21.177-08:00</updated><title type='text'>कातरवेळी</title><content type='html'>&lt;a href="http://www.orkut.com/Profile.aspx?uid=9878055892371978975"&gt;Radhika&lt;/a&gt;&lt;br /&gt;दिव्याच्या उजे्डाचा एक एक ठिपका,  अंधार अधिकच गडद करत जातो,&lt;br /&gt;पावलांच्या गलबल्याचं मैदान रिक्त, रिक्तसं होत जातं,&lt;br /&gt;दारात उभी राहते मायमाउली, बाहू पसरून पिलासाठी! &lt;br /&gt;' एक घास काऊचा, एक चिऊचा&lt;br /&gt;साथीला विळखा उबदार मायेचा."&lt;br /&gt;उसळे तरंग काळजात परतल्या बाळपावलांसाठी !&lt;br /&gt;दिव्याच्या उजेडाचा एक एक ठिपका,  अंधार अधिकच गडद करत जातो,&lt;br /&gt;पावलांच्या गलबल्याचं मैदान रिक्त रिक्तसं होत जातं,&lt;br /&gt;दारात उभी राहते मायमाउली , बाहू पसरून पिलासाठी !&lt;br /&gt;"रंग विलोल नेत्रांनी, धुंद मत्त गात्रांनी,"&lt;br /&gt;दडपे कल्लोळ काळजात परत फ़िरल्या बाळपावलासाठी !&lt;br /&gt;&lt;br /&gt;delete&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-8240692545989755589?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/8240692545989755589/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=8240692545989755589' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/8240692545989755589'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/8240692545989755589'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2007/02/blog-post_04.html' title='कातरवेळी'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-7229180739541604055</id><published>2007-02-04T19:40:00.000-08:00</published><updated>2007-02-04T19:46:21.181-08:00</updated><title type='text'>सोबती</title><content type='html'>अंधारही कधी कधी सखा बनतो, बंद पापणी आडचे अश्रू टिपून घेतो.&lt;br /&gt;सुसाटणाया वायात,&lt;br /&gt; भिरभिरणाया पाचोळ्यात,&lt;br /&gt;गरगरणाया चक्रात&lt;br /&gt;अंधारच सोबतीला येतो.&lt;br /&gt;अशा वेळी दारं खिडक्या बंद कराव्यात, हवं तर गदद पडदेही सो्डावेत&lt;br /&gt;गरगरणारं चक्र,&lt;br /&gt;भिरभिरणारा पाचोळा&lt;br /&gt; सुसाटणारा वारा&lt;br /&gt;सगळं बाहेर ठेवावं&lt;br /&gt;आत फ़क्त निस्तब्ध अंधार आणि साथीला विरह गंधार!&lt;br /&gt;मग उधळून द्यावं स्वत:ला अश्रूवाटे नि:शंकपणे&lt;br /&gt;खात्री असते&lt;br /&gt;&lt;br /&gt;सोबतीचा अंधार टिपून घेइल अश्रू अलगद ह्ळूवारपणे&lt;br /&gt;कारण... तेव्हाही तोच होता ना साथीला&lt;br /&gt;सुसाटणाया वायात&lt;br /&gt;भिरभिरणाया पाचोळ्यात&lt;br /&gt;गरगरणाया चक्राच्या तप्त रंगोत्सवात !&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-7229180739541604055?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/7229180739541604055/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=7229180739541604055' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/7229180739541604055'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/7229180739541604055'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2007/02/blog-post.html' title='सोबती'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-1376628150963319575</id><published>2007-01-24T02:01:00.000-08:00</published><updated>2007-01-24T02:02:39.228-08:00</updated><title type='text'>काही सूर काही नाद</title><content type='html'>आवाजाचं, गंधाचं आपल्या स्म्रुतीशी नातं असतं. रोजच्या धावपळीत ते लक्षातही येत नाही, पण असा अचानक एखादा क्षण येतो, त्या आवाजाने मनाची तार झंकारते, आणि वढाय मन कुठल्या कुठे जाऊन पोचतं. त्या दिवशी पडद्याला लावलेल्या घुंगरांच्या आवाजाने माझी गत अशीच झाली.त्याचं काय झालं, लेकीकडे गेले होते, सकाळच्या गार वायाने झोप चाळवली. पडदाही थोडा हलला असावा.कारण एक वेगळीच किणकिण कानावर आली. झोपाळलेल्या डोळ्यांनीच समोर बघितलं. पूर्व उजळली होती कानात मघाची किण किण होती, पण कसली ते कळत नव्हतं. परत तोच आवाज आला. हे म्हणजे खूप वर्षांनी शाळेतल्या मैत्रिणीचा फ़ोन यावा आणि तिचा चेहरा धूसरपणे तरळत रहावा तसं झालं. डोळ्यावरची झोप उडवून नीट पाहिलं, सकाळच्या मंद वायाने पडदा हलत होता आणि पडद्याला लावलेले घुंगरू वाजत होते. नेहमीचे छोटे घुंगरू नव्हेत, बैलांच्या गळ्यात असतात तसे भले थोरले पितळेचे घुंगरू. त्या आवाजाने आणि सकाळच्या झुळकीने माझं मन परकया पोरीगत धावत माहेरी, कोल्हापूरला पोचले.कोल्हापूर हे शहर, गूळ, कुस्त्या, फ़ताड्या शिंगांच्या म्हशी, यासाठी जसं प्रसिध्द आहे तसं माझ्या लहानपणी , म्हणजे ४५-५० वर्षांपूर्वी दारात म्हशी पिळून घेण्याबद्दलही प्रसिध्द होतं. म्हणजे काय तर जवळपासची २-४ घर मिळून एक गवळी ठरवायचे. त्याने एका कोणाच्यातरी दारात म्हैस घेऊन यायचं आणि तिथेच म्हस पिळून दूध काढून द्यायचं. सगळाच संस्थानी खाक्या. तसा आमचा दूधवाला होता मधू आणि त्याची आई ' लक्क्षुंबाई'. दोघांपैकी कोणीतरी एकजण तांबडं फ़ुटता फ़ुटता दारात हजर. 'दोअईध' अशी त्याची आरोळी आली की समोरच्या मालुताई, शेजारच्या अक्का, वरच्या मजल्यावरच्या जाधवमामी आपापली भांडी घेऊन लगबगीनं यायच्या. मधूने म्हस पान्हवायला घेतली की अक्का हमखास म्हणणारच, " मधू, चरवी नीट पालथी करायचं बघ हं का ! नाहीतर तिरकी धरून वाटीभर पाणी घालचील बग." यावर मधूही मिशीला पीळ देत म्हणनार, " काय अक्का, इतकी वर्सं दूध घालायलोय तरी अजून विश्वास इना होय तुमास्नी ? काय एवड्या तेवड्यानं माडी बांदनार हाय काय ?" त्यावर जाधवमामीही त्याला चिडवायच्या, " कुनाला दक्कल माडी बांदतोस का बंगला ते! आमाला वास्तुकाला बोलीव म्हंजी जालं. ' चरवीत धारेचं पहिलं चुळुक वाजलं म्हणेपर्यंत चरवी दुधानं भरून जायची अणि धारोष्ण दूध प्रत्येकीच्या पातेल्यात मापाप्रमाणे ओतलं जायचं.तसं तुम्ही कधी डोंगरमाथ्यावर गेलाय ? गाडी वळणावळणाने वरवर चढता चढता आसमंताशी आपण कणाकणाने एकरूप व्हायला लागतो. गाडी बंद करून आपण जर विसावतो, सभोवार असते नि:शब्द शांतता! अस्पष्टशी कुठेतरी दुसरी गाडी वर चढते असं वाटत असतं, पण बाकी वेढून असते ती फ़क्त निरव शांती. अशा वेळी दूर झा्डीत कोणी एक पक्षी शीळ घालत असतो. शांतता चिरत तो स्वरांचा बाण आपल्या उरात घुसतो, अगदी " काबुलीवाल्याच्या ' ऐ मेरे प्यारे वतन' च्या अरेबिक सुरावटीसारखा.कधी घेतला आहे असा अनुभव ?आणखी एका आवाजाचा अनुभव मात्र मी कल्पनेतच घेतला आहे. नाताळातल्या नाताळबाबाच्या हो हो हो अशा आरोळीचा. आधीच जगाच्या एका थंड टोकाकडून नाताळबाबा रेनडियरच्या गाडीतून आपल्या घरी येणार ही कल्पनाच किती रोमांचक ! त्यात आणखी गंमत म्हणजे तो आपल्यासाठी गिफ़्ट आणणार !मला तर हा लाल डगल्याचा लाल टोपीवाला नाताळबाबा माझ्या आजोबांसारखाच वाटतो. कोकणातून ५ - ६ तासांचा प्रवास करून हे १०० वर्षांचे आजोबा जेव्हा टांग्यातून आमच्या दारात उतरत, तेव्हा त्यांचे मुळचे धुवट पांढरे कपडेही कोकणचा लाल मातीने लालेलाल झालेले असत. कारण ५०, ६० वर्षांपूर्वी कोकणात कुठली आली आहे डांबरी सडक ? पण त्यांना बघून त्यांचं सामान घ्यायला आम्ही पुढे धावलो की त्यांच्या चेहयावरही तसंच प्रेमळ हसू असे. आणि मग हात पाय धुतल्यावर ट्रंकेतू्न फ़णसपोळी, खाजं, साटं असं काही आमच्या हातावर ठेवताना त्यांचे डोळे चाळशीमागून मिष्कीलपणे लुकलुक त.किती नाद, किती स्वर आपण मनात साठवून ठेवलेले असतात ते आपल्यालाच माहीत नसतं. कधीतरी तार झंकारते आणि आनंदाची वलयं उठतात, आपल्याला वास्तवापासून दूर नेतात .... परत वास्तवात आनंदाने परतण्यासाठी !&lt;br /&gt;draft&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-1376628150963319575?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/1376628150963319575/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=1376628150963319575' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/1376628150963319575'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/1376628150963319575'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2007/01/blog-post_24.html' title='काही सूर काही नाद'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-6522327387606092526</id><published>2007-01-21T15:41:00.001-08:00</published><updated>2007-01-29T18:23:18.802-08:00</updated><title type='text'>शून्यातून शून्याकडे</title><content type='html'>महाराष्ट्राच्या नकाशात नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरपासून आठ कि. मी. अंतरावरील हरेगाव हा छोटासा ठिपका. दुष्काळी भागातील कमी पावसावर जगणारी शेतीभाती करून इथला शेतकरी जीव जगवत असतो. अशा या भागात विसाव्या शतकाच्या दुसया दशकाच्या आसपास महाराष्ट्रातला पहिला साखरकारखाना उभा राहिला. भंडारदरा धरणाच्या पाण्याचा वापर करून इथे ऊस पिकवण्याची जिद्द काही तरुणांनी मनाशी बाळगली आणि स्थानिक शेतकर्यांना हाताशी धरून त्यांना ऊस लागवडीचे शिक्षण देण्यास सुरवात केली.जावाहून 'पुष्ट उष्ट जावा ' बियाणे आणून ऊस लागवडीला प्रारंभ झाला आणि पाहता पाहता हरेगाव येथे 'बेलापूर कंपनी लिमिटेड ' उभी राहिली. लोकमान्य टिळकांचे भाचे कै. महाजन हे या साखरकारखान्याचे पहिले इस्टेट मनेजर होते. पुण्यातील शेतकी महाविद्यालयातील पदवीधारकांच्या पहिल्या तुकडीत त्यांचा समावेश होता. त्यांनी आपले द्यान स्वजनहितार्थ वापरले.छोट्या छोट्या चाळवजा घरात राहून इथला अधिकारी वर्ग शेतकर्याण्ना शेतीचे अद्यावत द्यान देऊ लागला. कारखान्यातील तांत्रिकी माहिती सांगू लागला. कारखान्याने चांगलेच मूळ धरले. जो शेतकरी शेतीवर कशीबशी गुजराण करत होता, त्याला कारखान्यामुळे कामधेनूच दारात आल्यागत झाले.कारखान्यात काम करून कामगार चार पैसे कमवू लागला.१९५४ साली जगप्रसिध्द वास्तुशास्त्रद्य जे. जे. बोधे यांच्या आराखड्यानुसार सुप्रसिध्द शापुरजी पालनजी आणि कंपनीने कारखान्याची दिमाखदार वसाहत उभी केली. एक नंबर बंगला कारखान्याच्या ब्रिटिश मनेजरसाठी असे,. अनेक खोल्या असलेली ही इमारत सभोवार देशी विदेशी फ़ळाफ़ुलांनी बहरलेल्या बगिच्यात एखाद्या गढीप्रमाणे शोभत असे. डायरक्टरचा बंगला, मनेजरचा बंगला व इतर वरिष्ठ अधिकार्यांचे बंगले म्हणजे वास्तुशास्त्राचे उत्क्रूष्ट नमुने होते.ए., बी, सी, डी अशा टाइपमध्ये विभागलेल्या या सुबक , रेखीव वसाहतीवर उंच उंच व्रुक्षांनी सावली धरली होती. मध्यभागी जिमखाना होता. त्यामध्ये होणाया टेबल टेनिस, बडमिंटन यांच्या स्पर्धांमध्ये राष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू भाग घेत असत.&lt;br /&gt;draft&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2817643027810800740-6522327387606092526?l=radhikaredkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://radhikaredkar.blogspot.com/feeds/6522327387606092526/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2817643027810800740&amp;postID=6522327387606092526' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/6522327387606092526'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2817643027810800740/posts/default/6522327387606092526'/><link rel='alternate' type='text/html' href='http://radhikaredkar.blogspot.com/2007/01/blog-post_21.html' title='शून्यातून शून्याकडे'/><author><name>Radhika</name><uri>http://www.blogger.com/profile/13709928254856739286</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2817643027810800740.post-6961639942133436235</id><published>2007-01-20T21:06:00.000-08:00</published><updated>2007-01-20T21:57:06.437-08:00</updated><title type='text'>ज्याच त्याचा बोधिसत्व</title><content type='html'>राजपुत्र सिध्दार्थ बोधिव्रुक्षाखाली बसला आणि त्याचा भगवान बुध्द झाला. आपण सामान्य माणसं, पण मला वाटतं बोधिव्रुक्ष हे आत्मद्यानाचं प्रतीक मानलं तर आपल्या प्रत्येकाच्याच मनात एक बोधी असतो साध्या साध्या घटनांतून तो आपल्याला अशी अनुभूती देतो की एका अनमिक आनंदाने मन भरून येतं.&lt;br /&gt;मी तेव्हा एका संस्थेमध्ये शिकवण्याचं काम करत होते. मे महिन्याची सुट्टी संपून मी रोजच्या वाटेने निघाले. दुतर्फ़ा शेतं असलेल्या वाटेने चालत मी नेहमीच्या वळणावर आले. मनात सुट्तीतल्या गमतीचे विचार होते तसेच भेटणाया सहकायांची ओढही होती. वळण पार करून मी समोर बघितलं, --- वाहनांना पाठीवर घेऊन रस्ता नेहमीच्या वेगाने पळत होता.त्या क्षणी माझं मन एक सेकंद, फ़क्त एक सेकंद अवाक होवून थबकलं, आणि एका अगम्य अनुभूतीनं भरून आलं. रस्ता नेहमीसारखाच धावत होता, मी न येण्याने त्यात काही फ़र
